शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

परभणी : वळण रस्त्यासाठी ६७ कोंटीची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 00:58 IST

कल्याण- निर्मल या राष्ट्रीय महामार्गासाठी परभणी शहराजवळून १४.५ कि.मी. अंतराचा बाह्यवळण रस्ता प्रस्तावित केला असून या रस्त्याच्या भूसंपादनासाठी ६७ कोटी ६३ लाख १५ हजार ९४७ रुपयांची आवश्यकता आहे. हा प्रस्ताव राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे पाठविण्यात आला. परंतु, निधी उपलब्ध नसल्याने भूसंपादनाची कामे ठप्प पडली आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : कल्याण- निर्मल या राष्ट्रीय महामार्गासाठी परभणी शहराजवळून १४.५ कि.मी. अंतराचा बाह्यवळण रस्ता प्रस्तावित केला असून या रस्त्याच्या भूसंपादनासाठी ६७ कोटी ६३ लाख १५ हजार ९४७ रुपयांची आवश्यकता आहे. हा प्रस्ताव राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे पाठविण्यात आला. परंतु, निधी उपलब्ध नसल्याने भूसंपादनाची कामे ठप्प पडली आहेत.कल्याण- निर्मल हा राष्ट्रीय महामार्ग परभणी शहरातून पुढे नांदेडकडे जातो. परभणी शहरातील अरुंद रस्ते आणि वाढलेली वसाहत लक्षात घेऊन राष्ट्रीय महामार्गाला शहराबाहेरुन बाह्यवळण रस्ता मंजूर करण्यात आला. पाथरी रोडवरील सरस्वती धन्वंतरी डेंटल कॉलेजजवळून निघणारा हा बाह्यवळण रस्ता पुढे असोला पाटी जवळ वसमत रस्त्याला मिळणार आहे. १४.५ कि.मी. अंतराच्या या रस्त्यासाठी सुमारे २०० एकर जमीन संपादित करणे गरजेचे आहे. या जमिनीची मोजणी, शेतकऱ्यांच्या नावासह जमिनीच्या याद्या तयार करण्यात आल्या आहेत. येथील भूसंपादन विभागाने जमीन संपादनासाठीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केली आहे.शेतकरी निहाय जमिनीचे मूल्यमापन काढून भूसंपादनासाठी लागणाºया रक्कमेचा प्रस्ताव राष्ट्रीय महामार्ग नांदेड विभागाकडे पाठविला आहे. ही सर्व जमीन संपादित करण्यासाठी जिल्हा प्रशासनाला ६७ कोटी ६३ लाख १५ हजार ९४७ रुपयांची आवश्यकता आहे. हा निधी अद्याप उपलब्ध झाला नसल्याने जमीन संपादनाची प्रक्रिया सध्या थांबली आहे. त्यामुळे रस्त्याच्या कामालाही सुरुवात झालेली नाही. मागील अनेक वर्षांपासून रखडलेल्या या रस्त्याच्या कामासाठी जमीन संपादनासाठी लागणारा निधी तत्काळ मंजूर करावा, अशी मागणी होत आहे.ंभूसंपादन विभागाने काढले मूल्यांकनबाह्य वळण रस्त्यासाठी ८४ हेक्टर जमिनीच्या मूल्यांकनाची प्रक्रिया पूर्ण उपजिल्हाधिकारी डॉ.संजय कुंडेटकर यांनी केली आहे. पाचही गावांच्या शिवारातील जमीन संपादनासाठी ६५ कोटी ९८ लाख २० हजार ४३६ रुपये लागणार आहेत. ही प्रक्रिया राबविण्यासाठी अस्थापना खर्च ९८ लाख ९७ हजार ३०७ रूपये, सुविधांसाठी ६५ लाख ९८ हजार २०४ रुपये असे एकूण ६७ कोटी ६३ लाख १५ हजार ९४७ रुपयांची आवश्यकता आहे. ही रक्कम भूसंपादन विभागास प्राप्त झाल्यानंतर लाभार्थ्यांना मावेजा वितरित करुन प्रत्यक्ष जमीन शासनाच्या ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरु होणार आहे. सध्या तरी निधी नसल्याने राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनाचे काम ठप्प पडले आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीhighwayमहामार्ग