शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

परभणी : वळण रस्त्यासाठी ६७ कोंटीची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 00:58 IST

कल्याण- निर्मल या राष्ट्रीय महामार्गासाठी परभणी शहराजवळून १४.५ कि.मी. अंतराचा बाह्यवळण रस्ता प्रस्तावित केला असून या रस्त्याच्या भूसंपादनासाठी ६७ कोटी ६३ लाख १५ हजार ९४७ रुपयांची आवश्यकता आहे. हा प्रस्ताव राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे पाठविण्यात आला. परंतु, निधी उपलब्ध नसल्याने भूसंपादनाची कामे ठप्प पडली आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : कल्याण- निर्मल या राष्ट्रीय महामार्गासाठी परभणी शहराजवळून १४.५ कि.मी. अंतराचा बाह्यवळण रस्ता प्रस्तावित केला असून या रस्त्याच्या भूसंपादनासाठी ६७ कोटी ६३ लाख १५ हजार ९४७ रुपयांची आवश्यकता आहे. हा प्रस्ताव राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे पाठविण्यात आला. परंतु, निधी उपलब्ध नसल्याने भूसंपादनाची कामे ठप्प पडली आहेत.कल्याण- निर्मल हा राष्ट्रीय महामार्ग परभणी शहरातून पुढे नांदेडकडे जातो. परभणी शहरातील अरुंद रस्ते आणि वाढलेली वसाहत लक्षात घेऊन राष्ट्रीय महामार्गाला शहराबाहेरुन बाह्यवळण रस्ता मंजूर करण्यात आला. पाथरी रोडवरील सरस्वती धन्वंतरी डेंटल कॉलेजजवळून निघणारा हा बाह्यवळण रस्ता पुढे असोला पाटी जवळ वसमत रस्त्याला मिळणार आहे. १४.५ कि.मी. अंतराच्या या रस्त्यासाठी सुमारे २०० एकर जमीन संपादित करणे गरजेचे आहे. या जमिनीची मोजणी, शेतकऱ्यांच्या नावासह जमिनीच्या याद्या तयार करण्यात आल्या आहेत. येथील भूसंपादन विभागाने जमीन संपादनासाठीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केली आहे.शेतकरी निहाय जमिनीचे मूल्यमापन काढून भूसंपादनासाठी लागणाºया रक्कमेचा प्रस्ताव राष्ट्रीय महामार्ग नांदेड विभागाकडे पाठविला आहे. ही सर्व जमीन संपादित करण्यासाठी जिल्हा प्रशासनाला ६७ कोटी ६३ लाख १५ हजार ९४७ रुपयांची आवश्यकता आहे. हा निधी अद्याप उपलब्ध झाला नसल्याने जमीन संपादनाची प्रक्रिया सध्या थांबली आहे. त्यामुळे रस्त्याच्या कामालाही सुरुवात झालेली नाही. मागील अनेक वर्षांपासून रखडलेल्या या रस्त्याच्या कामासाठी जमीन संपादनासाठी लागणारा निधी तत्काळ मंजूर करावा, अशी मागणी होत आहे.ंभूसंपादन विभागाने काढले मूल्यांकनबाह्य वळण रस्त्यासाठी ८४ हेक्टर जमिनीच्या मूल्यांकनाची प्रक्रिया पूर्ण उपजिल्हाधिकारी डॉ.संजय कुंडेटकर यांनी केली आहे. पाचही गावांच्या शिवारातील जमीन संपादनासाठी ६५ कोटी ९८ लाख २० हजार ४३६ रुपये लागणार आहेत. ही प्रक्रिया राबविण्यासाठी अस्थापना खर्च ९८ लाख ९७ हजार ३०७ रूपये, सुविधांसाठी ६५ लाख ९८ हजार २०४ रुपये असे एकूण ६७ कोटी ६३ लाख १५ हजार ९४७ रुपयांची आवश्यकता आहे. ही रक्कम भूसंपादन विभागास प्राप्त झाल्यानंतर लाभार्थ्यांना मावेजा वितरित करुन प्रत्यक्ष जमीन शासनाच्या ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरु होणार आहे. सध्या तरी निधी नसल्याने राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनाचे काम ठप्प पडले आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीhighwayमहामार्ग