शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : नगरपालिकेने उचलेले पाणी कपातीचे पाऊल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2019 00:55 IST

अत्यल्प पाऊस झाल्याने व निम्न दुधना प्रकल्पात जीवंत साठा कमी असल्याने आगामी जून महिन्यापर्यंत सेलू शहराला पाणी पुरेल या दृष्टीने सेलू पालिकेने पाणी कपातीचे पाऊल उचलले आहे. १५ डिसेंबरपासून पाण्याचा १५ मिनीट वेळ कमी करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू (परभणी): अत्यल्प पाऊस झाल्याने व निम्न दुधना प्रकल्पात जीवंत साठा कमी असल्याने आगामी जून महिन्यापर्यंत सेलू शहराला पाणी पुरेल या दृष्टीने सेलू पालिकेने पाणी कपातीचे पाऊल उचलले आहे. १५ डिसेंबरपासून पाण्याचा १५ मिनीट वेळ कमी करण्यात आला आहे.सेलू शहराला निम्न दुधना प्रकल्पातून पाणीपुरवठा केला जातो. दुधना प्रकल्पात समाधानकारक पाणीसाठा झाल्यानंतर सेलू पालिकेकडून मूबलक पाणी सोडल्या जाते; परंतु, दुुष्काळी परिस्थितीमुळे निम्न दुधना प्रकल्पात जेमतेम पाणीसाठा असल्याने पाणीटंचाईचे संकट निर्माण होण्यापूर्वीच सेलू पालिकेने पाणी कपातीचा निर्णय घेतला आहे.शहरात जवळपास ४ हजार नळ जोडणी आहेत. दररोज शहराला ४ दलघमी पाणी लागते. पाण्याचे वितरण ७ झोनमधून होते. शहरातील विविध प्रभागाला दोन दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो. निम्न दुधना प्रकल्पातून परतूर, मंठा आठगाव पाणीपुरवठा योजना या शहरांनाही पाणीपुरवठा केला जातो. आगामी जूनपर्यंत प्रकल्पातील पाणी काटकसरीने वापरण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. दुधनेच्या पाण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय शहरासाठी शिल्लक नसल्याने दुधनात असलेले पाणी जूनपर्यंत पुरविण्यासाठी पालिकेलाही कसरत करावी लागणार आहे. शहरात दोन दिवसाआड मूबलक पाणीपुरवठा केला जात असल्याने अनेक भागांमध्ये पाण्याचा अपव्यय होत असल्याचे निदर्शनास आले आहे. पाणीटंचाई लक्षात घेऊन नगरपालिकेने पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी ५०० तोट्या आणि वॉल बसविण्याचे काम सुरू केले आहे.दुधनातील पाणीसाठ्याचा विचार करून शहराला पाणीटंचाई भासणार नाही. तसेच पाणी काटकसरीने वापरण्यासंंदर्भात येथील मोरया प्रतिष्ठानने शहरात जनजागृती मोहीम हाती घेतील आहे. सद्य स्थितीत निम्न दुधना प्रकल्पात जीवंत पाणीसाठा केवळ ६ टक्के आहे. आगामी काळात जालना आणि परभणी जिल्ह्यातील काही शहरांना दुधनेतून पाणी घेण्याची वेळ येणार आहे. त्यामुळे लागणारे पाणी आणि उपलब्ध पाणी यामध्ये तफावत निर्माण झाली आहे. एप्रिल, मे महिन्यात दुधनेच्या मृत साठ्यातून देखील पाणी घ्यावे लागणार आहे. त्यामुळे सेलू पालिकेने पाणी कपातीचा निर्णय घेतला आहे.आणखी १५ मिनीटे पाणी कपात होण्याची शक्यता४शहरात काही भागात ४५ मिनिटे तर काही भागात एक तास पाणीपुरवठा दोन दिवसाआड केला जातो. नगरपालिकेने १५ डिसेंबरपासून सोडल्या जाणाऱ्या पाण्याची वेळ १५ मिनीटे कमी केली आहे. आगामी काळात पाणीटंचाई लक्षात घेऊन पालिका प्रशासन आणखी १५ मिनिटांचा कालावधी कमी करण्याची शक्यता आहे.४सेलू येथील नगर पालिकेने पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी ५०० तोट्या व पाण्याची गळती रोखण्यासाठी काही वॉल बसविण्याचे काम हाती घेतले असल्याची माहिती न.प.चे मुख्याधिकारी देविदास जाधव यांनी दिली.

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणीDamधरण