शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

परभणी महानगरपालिका : बांधकाम परवान्याकडे नागरिकांचीच पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2018 00:08 IST

सर्वोच्च न्यायालयाने घनकचऱ्याच्या व्यवस्थेवरून राज्य सरकारला बांधकाम परवाने बंद करण्याचे आदेश दिले असताना परभणी शहरात मात्र नागरिकांनीच बांधकाम परवाना घेण्याकडे गेल्या महिनाभरापासून पाठ फिरविली असल्याचे समोर आले आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : सर्वोच्च न्यायालयाने घनकचऱ्याच्या व्यवस्थेवरून राज्य सरकारला बांधकाम परवाने बंद करण्याचे आदेश दिले असताना परभणी शहरात मात्र नागरिकांनीच बांधकाम परवाना घेण्याकडे गेल्या महिनाभरापासून पाठ फिरविली असल्याचे समोर आले आहे़महाराष्ट्र, मध्यप्रदेश, उत्तराखंड आदी राज्यांमध्ये घनकचरा व्यवस्थापना संदर्भात संबंधित राज्य सरकारने कोणतेच धोरण ठरविले नसल्याच्या कारणावरून सर्वोच्च न्यायालयाने संबंधित राज्य सरकारांना दंड ठोठावत तेथील बांधकाम परवाने त्वरित बंद करण्याचे आदेश ३१ आॅगस्ट रोजी दिले होते़ त्यामुळे रियल इस्टेट उद्योग क्षेत्रात खळबळ उडाली होती़ या पार्श्वभूमीवर औरंगाबाद व नांदेड महानगरपालिकेने बांधकाम परवाने देण्याचे काम सोमवारपासून बंद केले होते़ या अनुषंगाने परभणी महानगरपालिकेतील कारवाईबाबात माहिती घेतली असता, वेगळीच माहिती समोर आली़ १ आॅगस्टपासून महानगरपालिकेने आॅनलाईन बांधकाम परवाने देण्यास सुरुवात केली आहे; परंतु, आॅनलाईन बांधकाम परवान्यांसाठी गेल्या महिनाभरात एकही अर्ज मनपाकडे आलेला नाही़ महानगरपालिकेने गेल्या महिनाभरात ३२ एजन्सींना परवाने देण्यासाठी परवाना दिला आहे़ नागरिकांनी या एजन्सीमार्फतच आॅनलाईन पद्धतीने बांधकाम परवान्यासाठी अर्ज करायचे आहेत़ संबंधित एजन्सी परवानाधारकांच्या कागदपत्रांची पडताळणी करून याबाबतचा अर्ज महानगरपालिकेकडे आॅनलाईन सादर करेल़ त्यानंतर महानगरपालिका बांधकामांना परवानगी देणार आहे़ यापूर्वी थेट महानगरपालिकेतून परवानगी दिली जात होती, आता एजन्सीच्या माध्यमातून नागरिकांना परवानगी मिळविता येणार आहे़ असे असले तरी एकाही नागरिकाने गेल्या महिनाभरात मनपाकडे बांधकाम परवान्यासाठी अर्ज केलेला नाही़ अशातच सर्वोच्च न्यायालयाने जो आदेश दिलेला आहे़ त्या अनुषंगाने नगरविकास विभागाकडून कोणतेही पत्र महानगरपालिकेला प्राप्त झालेले नाही, अशी माहिती मनपातील सूत्रांनी दिली़ त्यामुळे तूर्तास तरी बांधकाम परवानगीचा प्रश्नच उद्भवत नाही, असेही सांगण्यात आले़जर एखाद्या व्यक्तीने बांधकाम परवानगीसाठी अर्ज दाखल केला तर या संदर्भात वरिष्ठ कार्यालयाशी चर्चा करूनच या अर्जावर निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती मनपाच्या नगरविकास विभागाच्या वतीने देण्यात आली़परवाना न घेताच बांधकाम सुरूशहरात अनेक ठिकाणी परवानगी न घेताच घरांची बांधकामे सुरू आहेत़ जेथे विना परवाना बांधकाम सुरू आहे, अशी बांधकामे थांबविण्याची कारवाई संबंधित वॉर्डच्या अधिकाºयांची असते़; परंतु, परभणी शहरात या बाबीकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे़ विशेष म्हणजे परभणी शहराकरीता मंजूर असलेल्या एफएसआयपेक्षा अधिक पटीने बांधकामे करण्यात आली आहेत़ सदरील बांधकामे प्रारंभी अनाधिकृतरित्या केली जातात़ नंतर ती अधिकृत करण्यासाठी असलेल्या कागदपत्रांची क्लिष्टता लक्षात घेऊन नियमित करण्याकडे दुर्लक्ष केले जाते़ यामध्ये महानगरपालिकेचे मात्र मोठे आर्थिक नुकसान होत आहे़ एकीकडे बांधकाम परवान्यापोटी मिळणारे उत्पन्न मनपाला गमवावे लागत आहे़ तर दुसरीकडे अनाधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी मिळणारे उत्पन्नही बुडत आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीParbhani Municipal Corporationपरभणी महानगरपालिकाSupreme Courtसर्वोच्च न्यायालयGarbage Disposal Issueकचरा प्रश्न