शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
3
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
4
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
5
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
6
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
7
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
8
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
9
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
10
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
11
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
12
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
13
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
14
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
15
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
16
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
17
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
18
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
19
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
20
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले

परभणी-मुदखेड दुहेरी रेल्वे मार्ग शासन दरबारी बेदखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2019 23:59 IST

परभणी- मुदखेड या ८१ कि.मी. रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाच्या कामावर तीन वर्षात तब्बल २४४ कोटी रुपयांचा खर्च झाला असताना या रेल्वे मार्गाच्या कामाची महाराष्ट्र शासनाच्या आर्थिक पाहणी अहवालात साधी नोंदही घेण्यात आलेली नाही. त्यामुळे राज्यशासन दरबारी सध्या तरी हा रेल्वे मार्ग बेदखल असल्याचे दिसून येत आहे.

अभिमन्यू कांबळे ।लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : परभणी- मुदखेड या ८१ कि.मी. रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाच्या कामावर तीन वर्षात तब्बल २४४ कोटी रुपयांचा खर्च झाला असताना या रेल्वे मार्गाच्या कामाची महाराष्ट्र शासनाच्या आर्थिक पाहणी अहवालात साधी नोंदही घेण्यात आलेली नाही. त्यामुळे राज्यशासन दरबारी सध्या तरी हा रेल्वे मार्ग बेदखल असल्याचे दिसून येत आहे.राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनास १७ जूनपासून सुरुवात झाली आहे. सोमवारी पहिल्याच दिवशी राज्याचा २०१८-१९ चा आर्थिक पाहणी अहवाल जाहीर करण्यात आला. या अहवालामध्ये राज्यात सुरु असलेल्या रेल्वे कामांची सद्यस्थिती दर्शविणारी माहिती देण्यात आली आहे. त्यामध्ये राज्यातील ९ प्रमुख रेल्वेमार्गांच्या प्रकल्पाची एकूण किंमत व झालेल्या कामाची भौतिक प्रगती याबाबतची माहिती देण्यात आली आहे. या माहितीमध्ये परभणी- मुदखेड या ८१ कि.मी.च्या रेल्वे मार्गाची माहितीच देण्यात आली नाही. २०१२-१३ या वर्षात या रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाला मंजुरी देण्यात आली. यासाठीचा अंदाजित ३९० कोटी ६० लाख रुपयांचा खर्च होता. गेल्या तीन वर्षात यापैकी २४४ कोटी रुपये खर्च करण्यात आले असून एप्रिल ते नोव्हेंबर २०१८ या कालावधीत ५५ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. परभणी ते मिरखेल या १७ कि.मी. रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचे काम जून २०१७ मध्ये पूर्ण झाले असून या रेल्वेमार्गाचा वापर सुरु झाला आहे. याशिवाय नांदेड जिल्ह्यातील मुगट ते मुदखेड ९.३ कि.मी. व लिंबगाव-नांदेड- मालटेकडी या १४.१० रेल्वे मार्गाचेही दुहेरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. एकूणच परभणी ते मिरखेल या रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचे काम वेगाने पूर्ण झाल्यास त्याचा या भागाला मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे या दुहेरीकरणाच्या कामाला गती मिळणे आवश्यक असताना दक्षिणमध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. परभणी-पूर्णा मार्गावरील पूर्णा नदीवरील रेल्वे पुलाचे काम मंद गतीने सुरु असून हे काम पूर्ण होण्यास आणखी ६ महिन्यांचा कालावधी लागणार आहे. तर लिंबगाव येथील भुयारी रेल्वेमार्गाचे काम अंतिम टप्प्यात आहे. जमीन अधिग्रहण प्रक्रियेमुळे हे काम रखडण्याची शक्यता आहे. या कामासंदर्भात मराठवाड्यातील काही लोकप्रतिनिधींकडून पाठपुरावा होत असला तरी दक्षिण मध्य रेल्वेचे सिकंदराबाद येथील अधिकारी याकडे लक्ष देण्यास तयार नाहीत. परिणामी या रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचे काम कधी पूर्ण होईल, हे ही अनिश्चित आहे. राज्य शासनाच्या आर्थिक पाहणी अहवालात या रेल्वे मार्गाची नोंद झाल्यास त्यावर चर्चा होईल आणि कामाला गती मिळेल, अशी अपेक्षा होती; परंतु, याबाबत राज्य शासनालाच गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शासन दरबारी हा रेल्वेमार्ग का बेदखल करण्यात आला आहे, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.गतवर्षीच्या अहवालातीलच माहिती केली कॉपी-पेस्ट४राज्याच्या २०१८-१९ च्या आर्थिक पाहणी अहवालात राज्यात सुरु असलेल्या रेल्वे कामांची सद्यस्थिती दर्शविणारी माहिती दिली आहे. त्यात एकूण ९ कामांचा समावेश असून एकूण रेल्वेमार्गाची लांबी, प्रकल्पाची किंमत, कामाची भौतिक प्रगती (टक्के) या बाबींचा उल्लेख आहे. विशेष म्हणजे २०१७-१८ च्या अहवालात जी माहिती देण्यात आली होती. तीच माहिती २०१८-१९ च्या १७ जून रोजी जाहीर करण्यात आलेल्या अहवालात जशाच तशी कॉपी करुन देण्यात आली आहे.४त्या आकडेवारीमध्ये कुठल्याही प्रकारचा बदल झालेला दिसून येत नाही. त्यामुळे हा अहवाल सादर करताना अधिकाऱ्यांकडून किती गांभीर्य बाळगले जाते, याचाही नमुना यानिमित्ताने समोर आला आहे. जर २०१८-१९ चा अहवाल खरा धरला तर मग गेल्या वर्षभरात नऊही रेल्वे मार्गावर काहीच काम झाले नाही का? असा सवाल उपस्थित होत आहे.सलग तीन वर्षांपासून नोंदच नाही४राज्य शासनाच्या २०१६-१७, २०१७-१८ व २०१८-१९ या तिन्ही आर्थिक अहवालामध्ये परभणी- मुदखेड या ८१ कि.मी. रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरण कामाची नोंदच घेण्यात आली नाही.४ त्यामुळे या कामाची भौतिक प्रगती किती होत आहे, याची अधिकृत माहितीच शासन दरबारी नोंदविली जात नाही. परिणामी कामाला गती देण्याच्या अनुषंगाने चर्चाही होत नाही.

टॅग्स :parabhaniपरभणीrailwayरेल्वेGovernmentसरकार