शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
2
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
3
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
4
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
5
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
6
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
7
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
8
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
9
एफडी विसरा, हायवेमध्ये करा गुंतवणूक! १०% पर्यंत मिळेल परतावा; 'राजमार्ग इनविट'ला सेबीची मंजुरी
10
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
11
'३ इडियट्स'च्या सीक्वलमधून शर्मन जोशीचा पत्ता कट?, अभिनेता म्हणाला- "मला तर..."
12
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
13
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
14
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
15
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
16
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
17
सीक्रेट सांतानं कर्मचाऱ्याला दिलेलं गिफ्ट पाहून तरुणी भलत्याच खूश झाल्या, असं काय मिळालं?
18
Travel : जगातील एक 'असे' ठिकाण, जिथे वेळेचे कोणतेच बंधन नाही! घड्याळ तर कुणी वापरतच नाही
19
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
20
'खेलरत्न'साठी हार्दिक! दिव्या देशमुखसह २४ खेळाडू अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित; इथं पाहा संपूर्ण यादी
Daily Top 2Weekly Top 5

परभणी-मुदखेड दुहेरी रेल्वे मार्ग शासन दरबारी बेदखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2019 23:59 IST

परभणी- मुदखेड या ८१ कि.मी. रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाच्या कामावर तीन वर्षात तब्बल २४४ कोटी रुपयांचा खर्च झाला असताना या रेल्वे मार्गाच्या कामाची महाराष्ट्र शासनाच्या आर्थिक पाहणी अहवालात साधी नोंदही घेण्यात आलेली नाही. त्यामुळे राज्यशासन दरबारी सध्या तरी हा रेल्वे मार्ग बेदखल असल्याचे दिसून येत आहे.

अभिमन्यू कांबळे ।लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : परभणी- मुदखेड या ८१ कि.मी. रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाच्या कामावर तीन वर्षात तब्बल २४४ कोटी रुपयांचा खर्च झाला असताना या रेल्वे मार्गाच्या कामाची महाराष्ट्र शासनाच्या आर्थिक पाहणी अहवालात साधी नोंदही घेण्यात आलेली नाही. त्यामुळे राज्यशासन दरबारी सध्या तरी हा रेल्वे मार्ग बेदखल असल्याचे दिसून येत आहे.राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनास १७ जूनपासून सुरुवात झाली आहे. सोमवारी पहिल्याच दिवशी राज्याचा २०१८-१९ चा आर्थिक पाहणी अहवाल जाहीर करण्यात आला. या अहवालामध्ये राज्यात सुरु असलेल्या रेल्वे कामांची सद्यस्थिती दर्शविणारी माहिती देण्यात आली आहे. त्यामध्ये राज्यातील ९ प्रमुख रेल्वेमार्गांच्या प्रकल्पाची एकूण किंमत व झालेल्या कामाची भौतिक प्रगती याबाबतची माहिती देण्यात आली आहे. या माहितीमध्ये परभणी- मुदखेड या ८१ कि.मी.च्या रेल्वे मार्गाची माहितीच देण्यात आली नाही. २०१२-१३ या वर्षात या रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाला मंजुरी देण्यात आली. यासाठीचा अंदाजित ३९० कोटी ६० लाख रुपयांचा खर्च होता. गेल्या तीन वर्षात यापैकी २४४ कोटी रुपये खर्च करण्यात आले असून एप्रिल ते नोव्हेंबर २०१८ या कालावधीत ५५ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. परभणी ते मिरखेल या १७ कि.मी. रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचे काम जून २०१७ मध्ये पूर्ण झाले असून या रेल्वेमार्गाचा वापर सुरु झाला आहे. याशिवाय नांदेड जिल्ह्यातील मुगट ते मुदखेड ९.३ कि.मी. व लिंबगाव-नांदेड- मालटेकडी या १४.१० रेल्वे मार्गाचेही दुहेरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. एकूणच परभणी ते मिरखेल या रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचे काम वेगाने पूर्ण झाल्यास त्याचा या भागाला मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे या दुहेरीकरणाच्या कामाला गती मिळणे आवश्यक असताना दक्षिणमध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. परभणी-पूर्णा मार्गावरील पूर्णा नदीवरील रेल्वे पुलाचे काम मंद गतीने सुरु असून हे काम पूर्ण होण्यास आणखी ६ महिन्यांचा कालावधी लागणार आहे. तर लिंबगाव येथील भुयारी रेल्वेमार्गाचे काम अंतिम टप्प्यात आहे. जमीन अधिग्रहण प्रक्रियेमुळे हे काम रखडण्याची शक्यता आहे. या कामासंदर्भात मराठवाड्यातील काही लोकप्रतिनिधींकडून पाठपुरावा होत असला तरी दक्षिण मध्य रेल्वेचे सिकंदराबाद येथील अधिकारी याकडे लक्ष देण्यास तयार नाहीत. परिणामी या रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचे काम कधी पूर्ण होईल, हे ही अनिश्चित आहे. राज्य शासनाच्या आर्थिक पाहणी अहवालात या रेल्वे मार्गाची नोंद झाल्यास त्यावर चर्चा होईल आणि कामाला गती मिळेल, अशी अपेक्षा होती; परंतु, याबाबत राज्य शासनालाच गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शासन दरबारी हा रेल्वेमार्ग का बेदखल करण्यात आला आहे, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.गतवर्षीच्या अहवालातीलच माहिती केली कॉपी-पेस्ट४राज्याच्या २०१८-१९ च्या आर्थिक पाहणी अहवालात राज्यात सुरु असलेल्या रेल्वे कामांची सद्यस्थिती दर्शविणारी माहिती दिली आहे. त्यात एकूण ९ कामांचा समावेश असून एकूण रेल्वेमार्गाची लांबी, प्रकल्पाची किंमत, कामाची भौतिक प्रगती (टक्के) या बाबींचा उल्लेख आहे. विशेष म्हणजे २०१७-१८ च्या अहवालात जी माहिती देण्यात आली होती. तीच माहिती २०१८-१९ च्या १७ जून रोजी जाहीर करण्यात आलेल्या अहवालात जशाच तशी कॉपी करुन देण्यात आली आहे.४त्या आकडेवारीमध्ये कुठल्याही प्रकारचा बदल झालेला दिसून येत नाही. त्यामुळे हा अहवाल सादर करताना अधिकाऱ्यांकडून किती गांभीर्य बाळगले जाते, याचाही नमुना यानिमित्ताने समोर आला आहे. जर २०१८-१९ चा अहवाल खरा धरला तर मग गेल्या वर्षभरात नऊही रेल्वे मार्गावर काहीच काम झाले नाही का? असा सवाल उपस्थित होत आहे.सलग तीन वर्षांपासून नोंदच नाही४राज्य शासनाच्या २०१६-१७, २०१७-१८ व २०१८-१९ या तिन्ही आर्थिक अहवालामध्ये परभणी- मुदखेड या ८१ कि.मी. रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरण कामाची नोंदच घेण्यात आली नाही.४ त्यामुळे या कामाची भौतिक प्रगती किती होत आहे, याची अधिकृत माहितीच शासन दरबारी नोंदविली जात नाही. परिणामी कामाला गती देण्याच्या अनुषंगाने चर्चाही होत नाही.

टॅग्स :parabhaniपरभणीrailwayरेल्वेGovernmentसरकार