शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
4
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
5
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
6
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
7
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
8
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
9
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
10
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
11
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
12
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
13
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
14
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
15
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
16
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
17
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
18
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
19
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
20
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल

परभणी : हमीभाव केंद्राकडे शेतकऱ्यांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 23:53 IST

येथील शासकीय हमीभाव केंद्रावर तूर विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे. मागील १५ दिवसांत ९ मार्चपर्यंत ६६ शेतकऱ्यांची केवळ ४३३ क्विंटल ५० किलो तूर खरेदी करण्यात आली आहे. तर बाजार समितीच्या यार्डात २७ फेब्रुवारीपर्यंत १२ हजार ५२५ क्विंटल तूर शेतकºयांनी खाजगी व्यापाºयांना विक्री केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमानवत (परभणी) : येथील शासकीय हमीभाव केंद्रावर तूर विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे. मागील १५ दिवसांत ९ मार्चपर्यंत ६६ शेतकऱ्यांची केवळ ४३३ क्विंटल ५० किलो तूर खरेदी करण्यात आली आहे. तर बाजार समितीच्या यार्डात २७ फेब्रुवारीपर्यंत १२ हजार ५२५ क्विंटल तूर शेतकºयांनी खाजगी व्यापाºयांना विक्री केली आहे.मानवत तालुक्यात २०१७ यावर्षात एकूण ३६०० हेक्टर क्षेत्रावर तुरीची पेरणी झाली होती. मात्र २०१८ मध्ये खरीप हंगामात तूर या पिकाच्या पेरणी क्षेत्रात घट झाल्याचे दिसून आले. मानवत मंडळात १२०५ हेक्टर, कोल्हा मंडळात ६३७ हेक्टर तर केकरजवळा मंडळात ९५९ हेक्टर अशा एकूण २८०१ हेक्टर क्षेत्रावर तुरीची पेरणी झाली होती. पावसाळ्याच्या सुरुवातीला बºयापैकी पाऊस झाल्याने शेतकरी समाधानी होते. मात्र शेवटच्या दीड महिन्यात पावसाने खंड दिल्याचा याचा फटका तालुक्यातील तूर उत्पादक शेतकºयांना बसला. यामुळे शेतकºयांना अनंत अडचणीला तोंड द्यावे लागले. डिसेंबर महिन्यात शेतकºयांनी बाजारपेठेत तूर विक्रीसाठी आणण्यास सुरवात केली होती.सुरुवातीच्या काळात तुरीला ४७०० रुपये दर मिळाला होता. त्यामुळे शेतकºयांमध्ये नाराजी दिसून येत होती. यामुळे शेतकºयांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. सद्यस्थितीत तुरीला बाजार पेठेत ५१०० ते ५२०० रुपये दर मिळत आहे. खरेदी विक्री संघामार्फत शासकीय हमीभाव केंद्र सुरु करण्यात आले आहे. विदर्भ फेडरेशनच्या वतीने २७ फेब्रुवारीपासून ५६७५ हमीदराने तूर खरेदीला सुरवात केली आहे. तालुक्यातील ४८३ शेतकºयांनी तूर विक्री करण्यासाठी आॅनलाईन नोंदणी केली आहे. यापैकी १११ जणांना तूर विक्री करण्यासाठी संदेश पाठविण्यात आले होते. या पैकी केवळ ६६ शेतकºयांनी तूर विक्रीसाठी हमीभाव केंद्रावर आणली आहे. एकूणच शासकीय हमीभाव केंद्राकडे शेतकºयांनी पाठ फिरवल्याचे चित्र आहे.शेतकºयांची खाजगी व्यापाºयांना पसंतीकृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डात डिसेंबरपासून २७ फेब्रुवारीपर्यंत १२ हजार ५२५ क्विंटल तूर शेतकºयांनी खाजगी व्यापाºयांना विक्री केली आहे. शासकीय हमीभाव केंद्रावर तूर विक्री करण्यासाठी करावी लागणारी धावपळ तसेच तूर विक्री केल्यानंतर आपल्या हक्काच्या पैशाची वाट पाहावी लागत असल्याने शेतकरी खाजगी व्यापाºयांना माल विक्री करण्यासाठी पसंती देत आहेत. तुरीचे भाव वाढतील, या आशेने अनेक शेतकºयांनी तूर घरातच ठेवली आहे. दुसरीकडे हरभराही शेतकरी विक्री करीत आहेत. आतापर्यंत ६११७ क्विंटल हरभरा शेतकºयांनी खाजगी व्यापाºयांना विक्री केल्याची नोंद बाजार समिती कडे झाली आहे.कापसाच्या भावाततेजीबाजार समितीच्या यार्डात कापसाची आवक वाढली असून ११ मार्च रोजी लिलाव यार्डात २०० गाड्यांची आवक होती. यावेळी झालेल्या लिलावात कापसाला ५६८० रुपये दर मिळाला. पंधरा दिवसानंतर सरकीचे भाव वधारल्याने कापसाच्या दरात तेजी पहावयास मिळाली. भाव वाढल्याने शेतकºयांमध्ये आनंद व्यक्त होत आहे. ११ मार्चपर्यंत ३ लाख २० हजार क्विंटल कापसाची खरेदी झाल्याची नोंद बाजार समितीकडे झाली आहे. यामध्ये सीसीआयने १५ हजार क्विंटल कापूस खरेदी केला आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरी