शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
4
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
5
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
6
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
7
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
8
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
9
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
12
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
13
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
14
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
15
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
20
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

परभणी : हमीभाव केंद्राकडे शेतकऱ्यांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 23:53 IST

येथील शासकीय हमीभाव केंद्रावर तूर विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे. मागील १५ दिवसांत ९ मार्चपर्यंत ६६ शेतकऱ्यांची केवळ ४३३ क्विंटल ५० किलो तूर खरेदी करण्यात आली आहे. तर बाजार समितीच्या यार्डात २७ फेब्रुवारीपर्यंत १२ हजार ५२५ क्विंटल तूर शेतकºयांनी खाजगी व्यापाºयांना विक्री केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमानवत (परभणी) : येथील शासकीय हमीभाव केंद्रावर तूर विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे. मागील १५ दिवसांत ९ मार्चपर्यंत ६६ शेतकऱ्यांची केवळ ४३३ क्विंटल ५० किलो तूर खरेदी करण्यात आली आहे. तर बाजार समितीच्या यार्डात २७ फेब्रुवारीपर्यंत १२ हजार ५२५ क्विंटल तूर शेतकºयांनी खाजगी व्यापाºयांना विक्री केली आहे.मानवत तालुक्यात २०१७ यावर्षात एकूण ३६०० हेक्टर क्षेत्रावर तुरीची पेरणी झाली होती. मात्र २०१८ मध्ये खरीप हंगामात तूर या पिकाच्या पेरणी क्षेत्रात घट झाल्याचे दिसून आले. मानवत मंडळात १२०५ हेक्टर, कोल्हा मंडळात ६३७ हेक्टर तर केकरजवळा मंडळात ९५९ हेक्टर अशा एकूण २८०१ हेक्टर क्षेत्रावर तुरीची पेरणी झाली होती. पावसाळ्याच्या सुरुवातीला बºयापैकी पाऊस झाल्याने शेतकरी समाधानी होते. मात्र शेवटच्या दीड महिन्यात पावसाने खंड दिल्याचा याचा फटका तालुक्यातील तूर उत्पादक शेतकºयांना बसला. यामुळे शेतकºयांना अनंत अडचणीला तोंड द्यावे लागले. डिसेंबर महिन्यात शेतकºयांनी बाजारपेठेत तूर विक्रीसाठी आणण्यास सुरवात केली होती.सुरुवातीच्या काळात तुरीला ४७०० रुपये दर मिळाला होता. त्यामुळे शेतकºयांमध्ये नाराजी दिसून येत होती. यामुळे शेतकºयांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. सद्यस्थितीत तुरीला बाजार पेठेत ५१०० ते ५२०० रुपये दर मिळत आहे. खरेदी विक्री संघामार्फत शासकीय हमीभाव केंद्र सुरु करण्यात आले आहे. विदर्भ फेडरेशनच्या वतीने २७ फेब्रुवारीपासून ५६७५ हमीदराने तूर खरेदीला सुरवात केली आहे. तालुक्यातील ४८३ शेतकºयांनी तूर विक्री करण्यासाठी आॅनलाईन नोंदणी केली आहे. यापैकी १११ जणांना तूर विक्री करण्यासाठी संदेश पाठविण्यात आले होते. या पैकी केवळ ६६ शेतकºयांनी तूर विक्रीसाठी हमीभाव केंद्रावर आणली आहे. एकूणच शासकीय हमीभाव केंद्राकडे शेतकºयांनी पाठ फिरवल्याचे चित्र आहे.शेतकºयांची खाजगी व्यापाºयांना पसंतीकृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डात डिसेंबरपासून २७ फेब्रुवारीपर्यंत १२ हजार ५२५ क्विंटल तूर शेतकºयांनी खाजगी व्यापाºयांना विक्री केली आहे. शासकीय हमीभाव केंद्रावर तूर विक्री करण्यासाठी करावी लागणारी धावपळ तसेच तूर विक्री केल्यानंतर आपल्या हक्काच्या पैशाची वाट पाहावी लागत असल्याने शेतकरी खाजगी व्यापाºयांना माल विक्री करण्यासाठी पसंती देत आहेत. तुरीचे भाव वाढतील, या आशेने अनेक शेतकºयांनी तूर घरातच ठेवली आहे. दुसरीकडे हरभराही शेतकरी विक्री करीत आहेत. आतापर्यंत ६११७ क्विंटल हरभरा शेतकºयांनी खाजगी व्यापाºयांना विक्री केल्याची नोंद बाजार समिती कडे झाली आहे.कापसाच्या भावाततेजीबाजार समितीच्या यार्डात कापसाची आवक वाढली असून ११ मार्च रोजी लिलाव यार्डात २०० गाड्यांची आवक होती. यावेळी झालेल्या लिलावात कापसाला ५६८० रुपये दर मिळाला. पंधरा दिवसानंतर सरकीचे भाव वधारल्याने कापसाच्या दरात तेजी पहावयास मिळाली. भाव वाढल्याने शेतकºयांमध्ये आनंद व्यक्त होत आहे. ११ मार्चपर्यंत ३ लाख २० हजार क्विंटल कापसाची खरेदी झाल्याची नोंद बाजार समितीकडे झाली आहे. यामध्ये सीसीआयने १५ हजार क्विंटल कापूस खरेदी केला आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरी