शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
2
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
3
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
4
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
5
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
6
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
7
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
8
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
9
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
10
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
11
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
12
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
13
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
14
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
15
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
16
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
17
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
18
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
19
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
20
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

परभणी: चौदा मंडळांमध्ये तीस टक्क्यांपेक्षा कमी पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 23:58 IST

यावर्षीच्या पावसाळी हंगामात जिल्ह्यात आतापर्यंत २८६ मिमी पाऊस झाला असून, जिल्ह्यातील ३९ मंडळांपैकी १४ मंडळांमध्ये ३० टक्क्यांपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे़ त्यामुळे या मंडळात समाविष्ट असलेल्या गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासह चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : यावर्षीच्या पावसाळी हंगामात जिल्ह्यात आतापर्यंत २८६ मिमी पाऊस झाला असून, जिल्ह्यातील ३९ मंडळांपैकी १४ मंडळांमध्ये ३० टक्क्यांपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे़ त्यामुळे या मंडळात समाविष्ट असलेल्या गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासह चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे़मागील वर्षी परतीचा पाऊस झाला नाही़ त्यामुळे आॅक्टोबर महिन्यापासून जिल्हावासिय दुष्काळी परिस्थितीचा सामना करीत आहेत़ यावर्षीच्या पावसाळ्यात नागरिकांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा होती; परंतु, पावसाने जिल्ह्याकडे पाठ फिरविली़ परभणी जिल्ह्याची वार्षिक सरासरी ७७४ मिमी एवढी असून, पावसाळ्यातील अडीच महिने संपल्यानंतर सरासरी ३७ टक्के पाऊस झाल्याची नोंद महसूल प्रशासनाने घेतली आहे़ १ जून ते २५ आॅगस्टपर्यंत जिल्ह्यात ५०८ मिमी पाऊस होणे अपेक्षित होते़ प्रत्यक्षात २८६़८४ मिमी पाऊस झाला आहे़ त्यामुळे अपेक्षित पावसाच्या तुलनेतही ४४ टक्के पावसाची तूट आहे़ या पावसाळ्यातील महत्त्वाची नक्षत्रे संपली असून, सद्यस्थितीला जिल्ह्यात दुष्काळीसदृश स्थिती निर्माण झाली आहे़ जिल्ह्यात एकूण ३९ मंडळे असून, या मंडळांमध्ये झालेल्या पावसाची नोंद महसूल प्रशासनाकडून घेतली जाते़ ३९ मंडळांपैकी १४ मंडळांत ३० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे.़ परभणी तालुक्यातील परभणी शहर, परभणी ग्रामीण, सिंगणापूर, दैठणा, पिंगळी आणि जांब या मंडळांमध्ये ३० टक्क्यांपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे़ पालम तालुक्यात चाटोरी, सेलू तालुक्यात कुपटा, वालूर, चिकलठाणा, पाथरी तालुक्यात बाभळगाव, हादगाव, जिंतूर तालुक्यात जिंतूर, बोरी, चारठाणा, आडगाव आणि मानवत तालुक्यात केकरजवळा या मंडळांमध्ये ३० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे़ या पावसाळी हंगामात झालेला पाऊस केवळ पिकांना दिलासा देणारा ठरला़ एकही मोठा वाहवनी पाऊस झाला नसल्याने जिल्ह्यातील सर्व प्रकल्प कोरडेठाक आहेत़ परिणामी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे़चुडावा मंडळात सर्वाधिक पाऊस४पूर्णा तालुक्यातील चुडावा मंडळामध्ये सर्वाधिक ६७़८ टक्के पावसाची नोंद झाली आहे़ या मंडळात सरासरी ८०४ मिमी पाऊस होतो़४आतापर्यंत ५४५ मिमी पाऊस मंडळामध्ये झाला आहे़ त्याचप्रमाणे १ जून ते २५ आॅगस्ट या काळात या मंडळात ५०९़५६ मिमी पाऊस होणे अपेक्षित होते़ प्रत्यक्षात ५४५ मिमी म्हणजे अपेक्षित पावसाच्या १०७ टक्के पावसाची नोंद झाली आहे़बोरी मंडळात सर्वात कमी पाऊस१४ मंडळांमध्ये ३० टक्क्यांपेक्षा कमी पावसाची नोंद झाली असली तरी जिंतूर तालुक्यातील बोरी मंडळात जिल्ह्यातील सर्वात कमी म्हणजे २०़८ टक्के पावसाची नोंद झाली आहे़ या मंडळामध्ये सरासरी ८११़७० मिमी पाऊस होतो़ प्रत्यक्षात १६९ मिमी पाऊस मंडळात झाला असून, सरासरीच्या तुलनेत केवळ २० टक्के पावसाची नोंद झाली आहे़ त्यानंतर पाथरी तालुक्यातील हादगाव मंडळात २३़८ टक्के, सेलू तालुक्यातमील चिकलठाणा मंडळात २४़५ टक्के तर परभणी ग्रामीण मंडळामध्ये २५ टक्के पाऊस झाला आहे़परतीच्या पावसाकडे डोळे४जिल्ह्यात पावसाळी हंगामात मोठा पाऊस झाला नाही़ झालेला पाऊस केवळ पिकांसाठी जीवदान देणारा ठरला असून, पावसातील खंडही शेतकऱ्यांना चिंतेचा ठरत आहे़४सद्यस्थितीला दोन आठवड्यांपासून पाऊस गायब झाला असून, पिके कोमेजत आहेत़ तर दुसरीकडे प्रकल्पांच्या लाभक्षेत्रात पाऊस नसल्याने एकाही प्रकल्पामध्ये समाधानकारक पाण्याची आवक झाली नाही़ यामुळे या भागात पाण्याचा प्रश्न निर्माण झाला असून, भविष्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे़४गतवर्षी मृतसाठ्यात असलेले प्रकल्प अजूनही बाहेर पडले नाहीत़ त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघण्यासाठी मोठ्या पावसाची आवश्यकता असून, नागरिकांच्या नजरा परतीच्या पावसाकडे लागल्या आहेत़

टॅग्स :parabhaniपरभणीRainपाऊसdroughtदुष्काळ