शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
2
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
3
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
4
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
5
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
6
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
7
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
8
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
9
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
10
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
11
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
12
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
13
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
14
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
15
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
16
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
17
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
18
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
19
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
20
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."

परभणी: चौदा मंडळांमध्ये तीस टक्क्यांपेक्षा कमी पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 23:58 IST

यावर्षीच्या पावसाळी हंगामात जिल्ह्यात आतापर्यंत २८६ मिमी पाऊस झाला असून, जिल्ह्यातील ३९ मंडळांपैकी १४ मंडळांमध्ये ३० टक्क्यांपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे़ त्यामुळे या मंडळात समाविष्ट असलेल्या गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासह चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : यावर्षीच्या पावसाळी हंगामात जिल्ह्यात आतापर्यंत २८६ मिमी पाऊस झाला असून, जिल्ह्यातील ३९ मंडळांपैकी १४ मंडळांमध्ये ३० टक्क्यांपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे़ त्यामुळे या मंडळात समाविष्ट असलेल्या गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासह चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे़मागील वर्षी परतीचा पाऊस झाला नाही़ त्यामुळे आॅक्टोबर महिन्यापासून जिल्हावासिय दुष्काळी परिस्थितीचा सामना करीत आहेत़ यावर्षीच्या पावसाळ्यात नागरिकांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा होती; परंतु, पावसाने जिल्ह्याकडे पाठ फिरविली़ परभणी जिल्ह्याची वार्षिक सरासरी ७७४ मिमी एवढी असून, पावसाळ्यातील अडीच महिने संपल्यानंतर सरासरी ३७ टक्के पाऊस झाल्याची नोंद महसूल प्रशासनाने घेतली आहे़ १ जून ते २५ आॅगस्टपर्यंत जिल्ह्यात ५०८ मिमी पाऊस होणे अपेक्षित होते़ प्रत्यक्षात २८६़८४ मिमी पाऊस झाला आहे़ त्यामुळे अपेक्षित पावसाच्या तुलनेतही ४४ टक्के पावसाची तूट आहे़ या पावसाळ्यातील महत्त्वाची नक्षत्रे संपली असून, सद्यस्थितीला जिल्ह्यात दुष्काळीसदृश स्थिती निर्माण झाली आहे़ जिल्ह्यात एकूण ३९ मंडळे असून, या मंडळांमध्ये झालेल्या पावसाची नोंद महसूल प्रशासनाकडून घेतली जाते़ ३९ मंडळांपैकी १४ मंडळांत ३० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे.़ परभणी तालुक्यातील परभणी शहर, परभणी ग्रामीण, सिंगणापूर, दैठणा, पिंगळी आणि जांब या मंडळांमध्ये ३० टक्क्यांपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे़ पालम तालुक्यात चाटोरी, सेलू तालुक्यात कुपटा, वालूर, चिकलठाणा, पाथरी तालुक्यात बाभळगाव, हादगाव, जिंतूर तालुक्यात जिंतूर, बोरी, चारठाणा, आडगाव आणि मानवत तालुक्यात केकरजवळा या मंडळांमध्ये ३० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे़ या पावसाळी हंगामात झालेला पाऊस केवळ पिकांना दिलासा देणारा ठरला़ एकही मोठा वाहवनी पाऊस झाला नसल्याने जिल्ह्यातील सर्व प्रकल्प कोरडेठाक आहेत़ परिणामी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे़चुडावा मंडळात सर्वाधिक पाऊस४पूर्णा तालुक्यातील चुडावा मंडळामध्ये सर्वाधिक ६७़८ टक्के पावसाची नोंद झाली आहे़ या मंडळात सरासरी ८०४ मिमी पाऊस होतो़४आतापर्यंत ५४५ मिमी पाऊस मंडळामध्ये झाला आहे़ त्याचप्रमाणे १ जून ते २५ आॅगस्ट या काळात या मंडळात ५०९़५६ मिमी पाऊस होणे अपेक्षित होते़ प्रत्यक्षात ५४५ मिमी म्हणजे अपेक्षित पावसाच्या १०७ टक्के पावसाची नोंद झाली आहे़बोरी मंडळात सर्वात कमी पाऊस१४ मंडळांमध्ये ३० टक्क्यांपेक्षा कमी पावसाची नोंद झाली असली तरी जिंतूर तालुक्यातील बोरी मंडळात जिल्ह्यातील सर्वात कमी म्हणजे २०़८ टक्के पावसाची नोंद झाली आहे़ या मंडळामध्ये सरासरी ८११़७० मिमी पाऊस होतो़ प्रत्यक्षात १६९ मिमी पाऊस मंडळात झाला असून, सरासरीच्या तुलनेत केवळ २० टक्के पावसाची नोंद झाली आहे़ त्यानंतर पाथरी तालुक्यातील हादगाव मंडळात २३़८ टक्के, सेलू तालुक्यातमील चिकलठाणा मंडळात २४़५ टक्के तर परभणी ग्रामीण मंडळामध्ये २५ टक्के पाऊस झाला आहे़परतीच्या पावसाकडे डोळे४जिल्ह्यात पावसाळी हंगामात मोठा पाऊस झाला नाही़ झालेला पाऊस केवळ पिकांसाठी जीवदान देणारा ठरला असून, पावसातील खंडही शेतकऱ्यांना चिंतेचा ठरत आहे़४सद्यस्थितीला दोन आठवड्यांपासून पाऊस गायब झाला असून, पिके कोमेजत आहेत़ तर दुसरीकडे प्रकल्पांच्या लाभक्षेत्रात पाऊस नसल्याने एकाही प्रकल्पामध्ये समाधानकारक पाण्याची आवक झाली नाही़ यामुळे या भागात पाण्याचा प्रश्न निर्माण झाला असून, भविष्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे़४गतवर्षी मृतसाठ्यात असलेले प्रकल्प अजूनही बाहेर पडले नाहीत़ त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघण्यासाठी मोठ्या पावसाची आवश्यकता असून, नागरिकांच्या नजरा परतीच्या पावसाकडे लागल्या आहेत़

टॅग्स :parabhaniपरभणीRainपाऊसdroughtदुष्काळ