शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

परभणी: तंत्रनिकेतनच्या शाखांना अखेरची घरघर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 00:02 IST

एकेकाळी शहराचे वैभव असणारे येथील शासकीय तंत्रनिकेतन विद्यार्थ्यांअभावी बंद पडण्याच्या मार्गावर आहे. अनुविद्युत व उपकरणीकरण शाखेला विद्यार्थीच नसल्याने या शाखा बंद पडतात की काय? ंअसे वाटत आहे. हे जिंतूरचे वैभव वाचविण्यासाठी शिक्षण प्रेमी नागरिकांनी जनजागृती करण्याची गरज व्यक्त केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजिंतूर (परभणी): एकेकाळी शहराचे वैभव असणारे येथील शासकीय तंत्रनिकेतन विद्यार्थ्यांअभावी बंद पडण्याच्या मार्गावर आहे. अनुविद्युत व उपकरणीकरण शाखेला विद्यार्थीच नसल्याने या शाखा बंद पडतात की काय? ंअसे वाटत आहे. हे जिंतूरचे वैभव वाचविण्यासाठी शिक्षण प्रेमी नागरिकांनी जनजागृती करण्याची गरज व्यक्त केली आहे.जिंतूर शहराला शासकीय तंत्रनिकेतनमुळे नावलौकिक मिळाला आहे. एकेकाळी पुणे, मुंबई येथून मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यातील विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी येत होते. कालांतराने या महाविद्यालयांमध्ये प्राध्यापक व विविध सोयी-सुविधा नसल्याने विद्यार्थी संख्या रोडावली होती; परंतु, मागील दोन ते तीन वषार्पासून शासकीय तंत्रनिकेतनमध्ये विद्यार्थी संख्या भरपूर असल्याने महाविद्यालय फुलून गेले होते. यावर्षी मात्र महाविद्यालयाला अखेरची घरघर लागली आहे. महाविद्यालयामध्ये स्थापत्य अभियांत्रिकी, यंत्र अभियांत्रिकी, संगणक अभियांत्रिकी, अनुविद्युत अभियांत्रिकी, उपकरणीकरण अभियांत्रिकी या शाखा आहेत. प्रत्येक शाखेत ६० विद्यार्थी क्षमता आहे. यावर्षी तर अनेक शाखांमध्ये विद्यार्थीच नाहीत. उपकरणीकरण अभियांत्रिकी शाखेत प्रथम वर्षाला केवळएका विद्यार्थ्याने प्रवेश घेतला आहे. द्वितीय वर्षाला ८ विद्यार्थी व तृतीय वर्षाला १५ विद्यार्थी आहेत. पुढील वर्षीही शाखा चालू राहते की नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे. विद्युत अभियांत्रिकीमध्ये तर प्रथम वर्षाला विद्यार्थीच नाहीत. द्वितीय वर्षात ८ विद्यार्थी आहेत.संगणक अभियांत्रिकीकडेही विद्यार्थ्यांनी पाठ फिरवली आहे. या वर्षी प्रथम वर्षाला १४ विद्यार्थी, द्वितीय वर्षाला १४ विद्यार्थी, तृतीय वर्षाला ३३ विद्यार्थी आहेत. त्यामुळे या शाखेतील विद्यार्थी कमी होताना दिसत आहेत. यंत्र अभियांत्रिकी शाखेमध्ये जेमतेम विद्याथी ७ असून स्थापत्य अभियांत्रिकी शाखेमध्ये प्रथम वर्षाला केवळ २६ विद्यार्थी आहेत. तर द्वितीय वर्षात ४० विद्यार्थी संख्या आहे.भविष्यामध्ये उपकरणीकरण शाखा, अनुविद्युत अभियांत्रिकी व संगणक अभियांत्रिकी या शाखा बंद पडतात की काय? याबाबत संशय व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे महाविद्यालयांमध्ये मागील तीन वषार्पासून सर्व विषयाचे प्राध्यापक व तज्ञ असतानासुद्धा विद्यार्थी इकडे फिरकत नसल्याने शासकीय तंत्रनिकेतनचे भवितव्य धोक्यात आले आहे. यासाठी जिंतूरकरांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.नोकरीच्या संधी कमीएकेकाळी शासकीय तंत्रनिकेतनमधून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये तत्काळ नोकरीची संधी उपलब्ध होत होती; परंतु, मागील चार ते पाच वर्षांपासून नोकरीच्या संधी कमी झाल्याने शासकीय तंत्रनिकेतनमध्ये येणाऱ्या विद्यार्र्थ्यांची संख्या रोडावली आहे. विशेषत: संगणक अभियांत्रिकी शाखेला विद्यार्थी मिळत नाहीत. यावरून बेरोजगारी या क्षेत्रात किती प्रचंड आहे? हे दिसते.सद्य स्थितीत अनुविद्युत उपकरणीकरण शाखेस विद्यार्थ्यांचा कल कमी दिसते; परंतु, वाढते औद्योगिकरण व संगणकीय व्यवस्थेसाठीच दोन्ही शाखा महत्त्वाच्या आहेत. विशेष म्हणजे जिंतूर येथे जिल्ह्यातील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय आहे. या ठिकाणी शासनाच्या सर्व सुविधा मिळतात. गरजू विद्यार्थ्यांनी याचा फायदा घ्यावा.-डॉ. के.बी. लाढाणे, प्राचार्य शासकीय तंत्रनिकेतन

टॅग्स :parabhaniपरभणीiti collegeआयटीआय कॉलेजStudentविद्यार्थी