शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

परभणी : सहाशे विद्यार्थ्याचे जीव मुठीत घेऊन ज्ञानार्जन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 00:28 IST

जिंतूर तालुक्यातील येलदरी येथील साईबाबा माध्यमिक विद्यालयाची इमारत पूर्णत: मोडकळीस आली असून, या विद्यालयात शिक्षण घेणाऱ्या इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतच्या ६०० विद्यार्थ्यांना आपला जीव मुठीत घेऊन ज्ञानार्जन करावे लागत आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कयेलदरी (परभणी): जिंतूर तालुक्यातील येलदरी येथील साईबाबा माध्यमिक विद्यालयाची इमारत पूर्णत: मोडकळीस आली असून, या विद्यालयात शिक्षण घेणाऱ्या इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतच्या ६०० विद्यार्थ्यांना आपला जीव मुठीत घेऊन ज्ञानार्जन करावे लागत आहे़जिंतूर तालुक्यातील येलदरी परिसरात साईबाबा माध्यमिक विद्यालय आहे़ या विद्यालयात इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतचे ६०० विद्यार्थी शिक्षण घेतात़ या विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी १९ शिक्षक कार्यरत आहेत़ या विद्यालयाचा निकाल चांगला असल्याने येलदरीसह परिसरातील विद्यार्थी शिक्षणासाठी ये-जा करतात़ परंतु, गेल्या काही दिवसांपासून या शाळेची इमारत पूर्णपणे मोडकळीस आली आहे़ त्यामुळे विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन ज्ञानार्जन करावे लागत आहे़विशेष म्हणजे या शाळेच्या इमारतीच्या तीन वर्ग खोल्या पूर्णत: कोसळल्या आहेत़ तर उर्वरित वर्ग खोल्यांना तडे गेले आहेत़ विशेष म्हणजे याबाबत पालकवर्ग व विद्यार्थ्यांनी अनेकदा विद्यालय प्रशासनाकडे इमारत दुरुस्त करावी, अशी मागणी लावून धरली; परंतु, विद्यालय प्रशासनाने या विद्यार्थी व पालकांच्या मागणीला केराची टोपली दाखविली़ काही दिवसांत या शाळेची दुरुस्ती केली नाही तर मोठा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही़ त्यामुळे याकडे विद्यालय प्रशासनाने लक्ष देऊन विद्यार्थ्यांचा विचार करून नवीन वर्गखोल्यांमध्ये शाळा सुरू करावी, अशी मागणी होत आहे़प्रसाधनगृहाचीही दुरवस्था४येलदरी येथील साईबाबा विद्यालयाची इमारत पूर्णत: मोडकळीस आल्याने विद्यार्थ्यांना भीतीदायक वातावरणात शिक्षण घ्यावे लागत आहे़ त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी असलेले प्रसाधनगृह देखील पूर्णत: मोडकळीस आले आहे़ परिणामी, विद्यार्थ्यांना उघड्यावरच लघुशंका करावी लागत आहे़ त्यामुळे विद्यालय प्रशासन व शिक्षण विभागाने लक्ष देऊन विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय दूर करावी व पुढचा अनर्थ टाळावा, अशी मागणी पालकवर्गातून होत आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीSchoolशाळाStudentविद्यार्थी