शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

परभणी :जायकवाडीच्या पाण्यासाठी कार्यालयास ठोकले टाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 00:43 IST

जायकवाडीच्या डाव्या कालव्यातून टेलपर्यंत पाणी पोहचत नसल्याने या पाण्यासाठी तालुक्यातील लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी बुधवारी पाटबंधारे विभागाच्या कार्यालयास कुलूप ठोकले़ दोन तासानंतर पाणी सोडण्याची कारवाई सुरू झाल्याने हे आंदोलन मागे घेण्यात आले़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जायकवाडीच्या डाव्या कालव्यातून टेलपर्यंत पाणी पोहचत नसल्याने या पाण्यासाठी तालुक्यातील लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी बुधवारी पाटबंधारे विभागाच्या कार्यालयास कुलूप ठोकले़ दोन तासानंतर पाणी सोडण्याची कारवाई सुरू झाल्याने हे आंदोलन मागे घेण्यात आले़जायकवाडी प्रकल्पाचा डावा कालवा परभणी तालुक्यातून प्रवाही झाला आहे़ सध्या या कालव्याला पाणी सोडण्यात आले़ मात्र कालव्याच्या ६७ क्रमांकाच्या वितरिकेला पाणी सोडले नव्हते तर ६४ क्रमांकाच्या वितरिकेला कमी पाणी सोडल्याने हे पाणी टेलपर्यंत पोहचत नव्हते़ परिणामी शेतकºयांची मोठी गैरसोय होत होती़ जायकवाडीच्या कालव्याचे पाणी मिळावे, यासाठी २४ आॅक्टोबर रोजी बाजार समितीचे माजी सभापती गणेश घाटगे यांच्या नेतृत्वाखाली शेतकºयांनी जायकवाडी पाटबंधारे विभागाचे कार्यालय गाठले़ यावेळी कार्यकारी अभियंता उपस्थित नसल्याने संतप्त शेतकºयांनी सकाळी ११ वाजता कार्यालयास कुलूप ठोकले़दरम्यान, गणेश घाटगे यांनी या प्रश्नी जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांच्याशी चर्चा केली़ त्यांच्या सुचनेनंतर अधिकाºयांनी आंदोलकांचे म्हणणे ऐकून घेतले़ दुपारी १ वाजेच्या सुमारास कार्यकारी अभियंत्यांनी ६४ क्रमांकाच्या वितरिकेला जास्त क्षमतेने पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन दिले तर ६७ क्रमांकाच्या वितरिकेलाही पाणी देण्याचे त्यांनी मान्य केले़ दुपारपर्यंत पाणीही सोडण्यात आले़ ६४ क्रमांकाच्या वितरिकेला ८० क्युसेसवरून १३० क्युसेस पाणी सोडण्यात आले़ त्यामुळे शेतकºयांनी आंदोलन मागे घेतले़या आंदोलनात माळसोन्ना, धसाडी, पोरवड, ठोळा, दामपुरी, आंबेटाकळी, इंदेवाडी, ब्रह्मपुरी, साळापुरी, पेगरगव्हाण, दैठणा आदी गावांमधील शेतकरी सहभागी झाले होेते़ त्यात गणेश घाटगे यांच्यासह मधुकर लाड, प्रल्हादराव लाड, तुकाराम गिराम, विठ्ठल पुर्णे, भगवान पुर्णे, प्रभाकर महाजन, मनिषा चव्हाण, शेख दाऊद, संजय लाड, शंकर जाधव, भगवान भिसे, अर्जुन जाधव, पांडूरंग लाड, बाळासाहेब टेकाळे आदींचा समावेश होता़

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीJayakwadi Damजायकवाडी धरणWaterपाणीagitationआंदोलन