शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
2
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
3
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
4
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
5
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
6
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
7
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
8
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
9
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
10
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
11
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
12
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
13
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
14
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
15
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
16
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
17
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
18
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
19
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
20
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...

परभणी: सिंचन विहिरी अडकल्या आचारसंहितेच्या कचाट्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 00:05 IST

तालुक्यात दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. रोहयोंतर्गत सिंचन विहिरींना मंजुरी मिळेल, अशी आशा लाभार्थ्यांना होती. मात्र जिल्हा परिषदेमधील रोहयो विभागाच्या अधिकाऱ्यांच्या गलथान कारभाराचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. पंचायत समितीकडे प्रस्ताव पाठविण्यासा़ठी २० दिवसांचा कालावधी लागल्याने सिंचन विहिरी आचारसंहितेच्या कचाट्यात अडकल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपालम (परभणी) : तालुक्यात दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. रोहयोंतर्गत सिंचन विहिरींना मंजुरी मिळेल, अशी आशा लाभार्थ्यांना होती. मात्र जिल्हा परिषदेमधील रोहयो विभागाच्या अधिकाऱ्यांच्या गलथान कारभाराचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. पंचायत समितीकडे प्रस्ताव पाठविण्यासा़ठी २० दिवसांचा कालावधी लागल्याने सिंचन विहिरी आचारसंहितेच्या कचाट्यात अडकल्या आहेत.पालम तालुक्यात मागील वर्षापासून एकही सिंचन विहरीला मंजुरी मिळालेली नाही. गंगाखेड येथील उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली छाननी समितीने गेल्यावर्षी ३८० विहिरींना मंजुरी दिली होती. हे प्रस्ताव गेल्या वर्षीच प्रशासकीय मंजुरीसाठी जिल्हा परिषदेकडे पाठविण्यात आले होते. दिवाळीनंतर प्रस्ताव मंजुरीसाठी हालचाली सुरू झाल्या. मात्र रोजगार हमी योजनेच्या परभणी जि.प. तील अधिकाºयांनी सुरुवातीपासूनच शेतकºयांच्या हिताच्या योजनेकडे दुर्लक्ष केले. नेहमीच काही ना काही त्रुटी काढून प्रस्ताव अडगळीत टाकण्यात आले. पंचायत समितीने प्रत्येक लाभार्थ्याची त्रुटी दूर करीत प्रस्ताव मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी बी.पी. पृथ्वीराज यांनी पुढाकार घेत ३५४ सिंचन विहिरींच्या यादीवर १८ फेब्रुवारी रोजी स्वाक्षरी केली होती.तातडीने प्रस्ताव पंचायत समितीकडे पाठवून अंतिम यादी तयार करून घ्यावी, असे आदेशित केले होते; परंतु, जिल्हा परिषदेच्या रोहयो विभागातील अधिकारी व कर्मचाºयांनी याकडे कानाडोळा केला. मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी कामात तत्परता दाखवूनही अधिकाºयांनी मात्र पंचायत समितीकडे हे प्रस्ताव २० दिवस विलंबाने ७ मार्च रोजी पाठवून दिले. ८ व ९ मार्च रोजी शासकीय सुट्या आल्या.१० मार्च रोजी उशिरा लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली. त्यामुळे पंचायत समितीला अंतिम यादी करण्यास वेळच मिळाला नाही. परिणामी ३५४ सिंचन विहिरींना मान्यता मिळूनही केवळ कामचुकार अधिकाºयांच्या उदासिन भूमिकेमुळे सिंचन विहिरींचा प्रश्न रखडला आहे. झारीतील शुक्राचाºयांनी दुष्काळाच्या काळात शेतकºयांच्या जखमेवर मीठ चोळत सिंचन विहिरींची कामे आचारसंहितेच्या कचाट्यात जाणून बुजून अडकविली असल्याची भावना लाभार्थ्यात निर्माण झाली आहे. जिल्हा परिषदेच्या गलथान कारभारावर पालम तालुक्यातील शेतकरी वर्ग नाराज झाला आहे. त्यामुळे आता सिंचन विहिरींच्या लाभासाठी आचारसंहिता संपण्याची लाभार्थ्यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.दोषी अधिकाºयांवर कारवाई करा४पालम तालुक्यात दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस वाढत आहे. दुष्काळावर मात करण्यासाठी लाभार्थी शेतकरी महात्मा गांधी राष्टÑीय रोजगार हमी योजनेंतर्गत सिंचन विहिरींसाठी प्रस्ताव दाखल करतात ; परंतु, अधिकारी व कर्मचाºयांच्या उदासिन भूमिकेमुळे लाभार्थ्यांचे प्रस्ताव सहा-सहा महिने एकाच ठिकाणी पडून राहतात. त्याचाच प्रत्यय पालम तालुक्यातील ३५४ लाभार्थ्यांना आला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी स्वाक्षरी करून ठेवलेले प्रस्ताव पालम पं.स.कडे येण्यासाठी २० दिवसांचा कालावधी लागला. परिणामी हे प्रस्ताव आचारसंहितेच्या कचाट्यात सापडले.४त्यामुळे कामात कुचराई करणाºया अधिकारी, कर्मचाºयांवर मुख्य कार्यकारी अधिकारी बी.पी. पृथ्वीराज यांनी कार्यवाही करण्याची मागणी होत आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीElectionनिवडणूकzpजिल्हा परिषद