शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
ट्रम्प यांनी दंड थोपटले! अमेरिकेच्या तीन युद्ध नौका व्हेनेझुएलाच्या दिशेने रवाना; ४००० सैन्यही सज्ज
3
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
4
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
5
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
6
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
7
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
8
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
9
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
10
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
11
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
12
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
13
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
14
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
15
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
16
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
17
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
18
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
19
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
20
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा

परभणी:सिंचनाचे पाणी तोडून खळी ग्रामस्थांची भागविली जातेय तहान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2019 00:26 IST

खळी गावात निर्माण झालेल्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी येथील रामेश्वर पवार या शेतकऱ्याने पिकाचे पाणी तोडून ग्रामस्थांसाठी हे पाणी उपलब्ध करून दिले आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड (परभणी) : खळी गावात निर्माण झालेल्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी येथील रामेश्वर पवार या शेतकऱ्याने पिकाचे पाणी तोडून ग्रामस्थांसाठी हे पाणी उपलब्ध करून दिले आहे़तालुक्यात यावर्षी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे़ पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सर्वच गावांमध्ये सतावत आहे़ शहरापासून काही अंतरावर असलेल्या गोदावरी नदीकाठावरील खळी गावातही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे़ ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे़ विशेष म्हणजे नदीपात्र जवळच असतानाही ग्रामस्थांची ही भटकंती सुरू आहे़नदीपात्रात पाणी शिल्लक नाही़ भूजल पातळी घटल्याने गावातील विहीर, बोअर आटले आहेत़ त्यामुळे खळी ग्रामस्थांना पाणी पुरवठा योजनेच्या लिकेजवरून पाणी भरावे लागते़ ही अवस्था पाहून येथील शेतकरी रमेशराव माधवराव पवार यांनी शेतातील विहिरीचे पाणी गावकऱ्यांना उपलब्ध करून दिले आहे़ या विहिरीच्या पाण्यावर उन्हाळी पिके घेण्याचे नियोजन त्यांनी केले होते; परंतु, गावात निर्माण झालेली पाणीटंचाई लक्षात घेऊन पिकांना पाणी न देता ते पाणी ग्रामस्थांसाठी उपलब्ध करून दिले आहे़ शेतातील विहिरीवर गावापासून एक ते दीड किमी अंतरापर्यंत पाईपलाईन करून त्या ठिकाणी पाणी आणून सोडले आहे़ त्यामुळे मागील काही दिवसांपासून ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे़ दररोज या ठिकाणी पाणी भरण्यासाठी गर्दी होत आहे़ या पाण्याच्या माध्यमातून खळी गावातील जवळपास ४० कुटूंबांना पाणी उपलब्ध झले आहे़ या कुटुंबियांची तहान भागविण्याचे काम रमेशराव पवार यांनी केले आहे़खळी गावासाठी पाणी पुरवठा योजनाही उपलब्ध आहे़ गोदावरी नदीपात्रात या योजनेसाठी विहीर घेण्यात आली आहे़ मात्र या विहिरीलाही पाणी नसल्याने पाणीपुरवठा योजना सद्यस्थितीत कुचकामी ठरली आहे़ गावातील टंचाई परिस्थितीत पवार यांनी केलेल्या उपाययोजनेमुळे टंचाईपासून दिलासा मिळाला आहे़पाण्यासाठी सालगड्याचे सहकार्यरमेशराव पवार यांच्या शेतातील विहीर जुनी आणि खोल आहे़ या विहिरीतूनही काही ग्रामस्थ पाणी नेतात़ त्यामुळे ग्रामस्थांची गैरसोय होऊ नये, यासाठी या ठिकाणी सालगड्याची व्यवस्था केली असून, सालगड्याच्या माध्यमातून विहिरीचे पाणी गावकºयांना उपलब्ध करून दिले जात आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीwater scarcityपाणी टंचाईdroughtदुष्काळ