शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
5
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
6
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
7
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
8
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
9
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
10
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
11
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
12
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
13
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
14
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
15
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
16
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
17
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
18
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
19
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
20
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस

परभणी:सिंचनाचे पाणी तोडून खळी ग्रामस्थांची भागविली जातेय तहान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2019 00:26 IST

खळी गावात निर्माण झालेल्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी येथील रामेश्वर पवार या शेतकऱ्याने पिकाचे पाणी तोडून ग्रामस्थांसाठी हे पाणी उपलब्ध करून दिले आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड (परभणी) : खळी गावात निर्माण झालेल्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी येथील रामेश्वर पवार या शेतकऱ्याने पिकाचे पाणी तोडून ग्रामस्थांसाठी हे पाणी उपलब्ध करून दिले आहे़तालुक्यात यावर्षी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे़ पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सर्वच गावांमध्ये सतावत आहे़ शहरापासून काही अंतरावर असलेल्या गोदावरी नदीकाठावरील खळी गावातही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे़ ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे़ विशेष म्हणजे नदीपात्र जवळच असतानाही ग्रामस्थांची ही भटकंती सुरू आहे़नदीपात्रात पाणी शिल्लक नाही़ भूजल पातळी घटल्याने गावातील विहीर, बोअर आटले आहेत़ त्यामुळे खळी ग्रामस्थांना पाणी पुरवठा योजनेच्या लिकेजवरून पाणी भरावे लागते़ ही अवस्था पाहून येथील शेतकरी रमेशराव माधवराव पवार यांनी शेतातील विहिरीचे पाणी गावकऱ्यांना उपलब्ध करून दिले आहे़ या विहिरीच्या पाण्यावर उन्हाळी पिके घेण्याचे नियोजन त्यांनी केले होते; परंतु, गावात निर्माण झालेली पाणीटंचाई लक्षात घेऊन पिकांना पाणी न देता ते पाणी ग्रामस्थांसाठी उपलब्ध करून दिले आहे़ शेतातील विहिरीवर गावापासून एक ते दीड किमी अंतरापर्यंत पाईपलाईन करून त्या ठिकाणी पाणी आणून सोडले आहे़ त्यामुळे मागील काही दिवसांपासून ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे़ दररोज या ठिकाणी पाणी भरण्यासाठी गर्दी होत आहे़ या पाण्याच्या माध्यमातून खळी गावातील जवळपास ४० कुटूंबांना पाणी उपलब्ध झले आहे़ या कुटुंबियांची तहान भागविण्याचे काम रमेशराव पवार यांनी केले आहे़खळी गावासाठी पाणी पुरवठा योजनाही उपलब्ध आहे़ गोदावरी नदीपात्रात या योजनेसाठी विहीर घेण्यात आली आहे़ मात्र या विहिरीलाही पाणी नसल्याने पाणीपुरवठा योजना सद्यस्थितीत कुचकामी ठरली आहे़ गावातील टंचाई परिस्थितीत पवार यांनी केलेल्या उपाययोजनेमुळे टंचाईपासून दिलासा मिळाला आहे़पाण्यासाठी सालगड्याचे सहकार्यरमेशराव पवार यांच्या शेतातील विहीर जुनी आणि खोल आहे़ या विहिरीतूनही काही ग्रामस्थ पाणी नेतात़ त्यामुळे ग्रामस्थांची गैरसोय होऊ नये, यासाठी या ठिकाणी सालगड्याची व्यवस्था केली असून, सालगड्याच्या माध्यमातून विहिरीचे पाणी गावकºयांना उपलब्ध करून दिले जात आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीwater scarcityपाणी टंचाईdroughtदुष्काळ