शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

परभणी: इरळदची जि.प. शाळा झाली आंतरराष्ट्रीय !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 00:29 IST

महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळातर्फे जिल्ह्यातील नोंदणी झालेल्या १५२ पैकी निवडलेल्या ५ शाळांचे मूल्यांकन करून जागतिक महिला दिनी मानवत तालुक्यातील इरळद येथील जि.प. प्राथमिक शाळेला आंतरराष्ट्रीय शाळेचा दर्जा बहाल केला आहे. टप्या टप्याने या शाळांना विशेष तरतूद उपलब्ध करून भौतिक व शैक्षणिक दर्जा उंचविण्यासाठी शासन पुढाकार घेणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमानवत (परभणी) : महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळातर्फे जिल्ह्यातील नोंदणी झालेल्या १५२ पैकी निवडलेल्या ५ शाळांचे मूल्यांकन करून जागतिक महिला दिनी मानवत तालुक्यातील इरळद येथील जि.प. प्राथमिक शाळेला आंतरराष्ट्रीय शाळेचा दर्जा बहाल केला आहे. टप्या टप्याने या शाळांना विशेष तरतूद उपलब्ध करून भौतिक व शैक्षणिक दर्जा उंचविण्यासाठी शासन पुढाकार घेणार आहे.मानवत तालुक्यातील इरळद शाळेतील विविध उपक्रम, विद्यार्थ्यांची गुणवत्ता, आदर्श लोकसहभाग, सुसज्ज इमारत, शाळेचा परिसर, क्रीडांगण, अद्ययावत स्वतंत्र स्वच्छतागृह, फिल्टर पाणीपुरवठा, हॅन्ड वॉश स्टेशन, बोलक्या भिंती, डिजिटल वर्गखोल्या, एबीएल पद्धतीची पाहणी पथकाद्वारे करण्यात आली.इरळद शाळेचा नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा तयारी पॅटर्न, विविध स्पर्धा परीक्षा तयारी वर्ग आणि गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचा आलेख, शाळेची पट व उपस्थिती, रोपवाटिका, कचरा व्यवस्थापन, सुंदर बगीचा, सुसज्ज प्रयोगशाळा, माझे वाचनालय, विद्यार्थी बचत बँक, रात्र अभ्यासगट, झांजपथक असे अनेक उपक्रम प्रभावित करणारे ठरले. शालेय व्यवस्थापन समितींतर्गत आदर्श कामकाज, ग्रामपंचायत इरळद मार्फत शाळेत झालेल्या विविध कामांची प्रत्यक्ष पाहणी केली. त्याच बरोबर ग्रामस्थांशी प्रत्यक्ष संवाद, शिक्षक, विद्यार्थी, मुख्याध्यापक यांच्या आंतरक्रिया आदींचे परीक्षण करण्यात आले.मागील आठ ते दहा वर्षात लोकसहभागातून शाळेत जवळपास २२ लाख रुपये लोकवर्गणीद्वारे जमीन खरेदीसह शाळेत आदर्श कामे करण्यात आली. ग्रामस्थांचे शाळेविषयी असणारे प्रेम व समपर्णाची भावना पाहून पथक भारावून गेले होते. सलग अकरा वर्षात २० विद्यार्थी नवोदय धारक तर २२ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले आहेत.या उपक्रमातूनच महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाच्या संलग्नतेसाठी शाळेला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळवून देण्यात उपयुक्त ठरला. त्यामुळे जून २०१९ पासून इरळदच्या शाळेत पूर्वप्राथमिक ते इयत्ता चौथी पर्यंत आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण महाराष्ट्र शासनामार्फत उपलब्ध होणार आहे. याचा लाभ या शाळसोबत शेजारील दहा ते पंधरा गावांतील विद्यार्थ्यांना होणार आहे. तसेच ग्रामीण भागातील वंचित घटकाला हक्काचे, दर्जेदार, शिक्षण मिळणार आहे.दहावीच्या वर्र्गालाही मिळाली मान्यता४पुढील वर्षापासून शाळेत नववी ते दहावी वर्ग सुरु करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने इरळद येथील शाळेला विशेष शासकीय निर्णयाद्वारे मान्यता दिली आहे. शाळेला प्राप्त झालेल्या घवघवीत यशाच्या बहुमानाला येथील आजी-माजी मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांची मागील १५ वर्षांची कठोर मेहनत, जिद्द आणि लोकसहभागासह योग्य मार्गदर्शन ही त्रिसूत्री यशाचे गमक ठरली आहे.४परभणी जिल्ह्यातील इतर शाळांसमोर दैदिप्यमान आदर्श ठेवला आहे. इरळद गावासह मानवत पंचायत समिती आणि परभणी जिल्ह्याच्या शैक्षणिक उत्कर्षाचा गौरव इरळद शाळेने राज्यस्तरावर दिमाखात वाढवला आहे. याबद्दल शाळेतील शिक्षक, विद्यार्थी, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य व ग्रामस्थांचे कौतुक होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीSchoolशाळाInternationalआंतरराष्ट्रीय