शहरं
Join us  
Trending Stories
1
"भाजपाने आमच्या पाठीत खंजीर खुपसला, मतदारांचाही विश्वासघात करेल"; राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मुळीक यांचे टीकास्त्र
2
राजकारण पेटलं! कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकारची बुलडोझर कारवाई; ४०० हून अधिक घरं पाडली
3
जिवलग जीवाचा... विराट कोहली!! स्वत:चीच विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला दिलं एकदम खास 'गिफ्ट'
4
सोन्या-चांदीची भरारी, विदेशींची माघार अन् भारतीयांचा एल्गार! हे वर्ष कोणासाठी ठरलं फायद्याचं
5
जिममध्ये जाणाऱ्यांनो सावधान! १९ वर्षीय विद्यार्थ्याचा प्रोटीन शेक प्यायल्याने मृत्यू; नेमकं काय घडलं?
6
प्रशासनाचा गलथान कारभार! निवडणूक एका ठिकाणी, अधिकाऱ्यांनी प्रक्रिया केली दुसरीकडे; उमेदवाराच्या विजयानंतर शासनाला आली जाग
7
बांगलादेशमध्ये उलटफेर! शेख हसीना यांना विरोध करणारा पक्ष फुटला,जमातमध्ये आश्रय घेतला
8
TATA Steel विरोधात खटला दाखल; १४८ अब्ज रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी, प्रकरण काय?
9
IT Manager Gang Rape: हॉटेलमध्ये आले, दीड वाजेपर्यंत पार्टी आणि गुप्तांगावर जखमा; मॅनेजर सामूहिक बलात्कार प्रकरणाची Inside Story
10
Ashes मध्ये तुफान राडा! जो रूटने मार्नस लाबुशेनचा कॅच घेण्यावरून मैदानात गोंधळ, पाहा VIDEO
11
क्रूरतेचा कळस! जावई झाला हैवान; सासू-सासरे आणि बायकोवर तलवारीने केले सपासप वार
12
एकावर मिळणार ४ बोनस शेअर्स; रेकॉर्ड डेट २०२६ च्या पहिल्या आठवड्यात, वर्षभरात 'या' शेअरनं केलाय पैसा दुप्पट
13
VIDEO: डिटर्जंट, युरिया अन् रिफाईंड तेल; अंधेरीत नामांकित ब्रँड्सच्या पिशव्यांमध्ये भरलं भेसळयुक्त दूध, घरात सुरु होतं रॅकेट
14
"फक्त बांगलादेशातच नाही, तर बंगालमध्येही हिंदू सुरक्षित नाहीत"; भाजपाचा ममता बॅनर्जींवर गंभीर आरोप
15
दोन वर्षांत २९००० डॉक्टर, अभियंते, अकाउंटंट्सनी पाकिस्तान सोडले, जगभरात आसिम मुनीर यांची नामुष्की
16
PMC Elections : दोन्ही राष्ट्रवादीची चर्चा फिस्कटली;शरद पवार गटाची काँग्रेस, उद्ववसेनेशी चर्चा सुरू
17
बॉक्सिंग डे कसोटीतील विजयासह इंग्लंडनं साधला मोठा डाव; ऑस्ट्रेलियाला धक्का देत टीम इंडियाशी बरोबरी
18
प्रेयसीच्या नादात हिमांशू भारद्वाजने आधी विकली स्वतःची किडनी, नंतर रॅकेटमध्ये झाला सामील
19
४० किलो स्फोटकांचा वापर आणि २०२३ पासून सुरू होती तयारी; लाल किल्ला स्फोट प्रकरणात खळबळजनक खुलासा!
20
शाकंभरी नवरात्र २०२५: पौषात रविवारपासून सुरु होतोय शाकंभरी नवरात्रोत्सव; काय आहे महत्त्व आणि कुलाचार?
Daily Top 2Weekly Top 5

परभणी:अनियमित शिक्षक भरतीची चौकशी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 00:00 IST

राज्यात २ मे २०१२ च्या शासन निर्णयान्वये शिक्षक भरतीला बंदी असताना अनेक संस्थांनी शिक्षक भरती प्रक्रिया राबविल्या प्रकरणाची शिक्षण आयुक्तांमार्फत चौकशी सुरु असून या भरती प्रक्रियेला मंजुरी देणाऱ्या शिक्षणाधिकाऱ्यांवरही शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेत राज्य शासनाने दिले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : राज्यात २ मे २०१२ च्या शासन निर्णयान्वये शिक्षक भरतीला बंदी असताना अनेक संस्थांनी शिक्षक भरती प्रक्रिया राबविल्या प्रकरणाची शिक्षण आयुक्तांमार्फत चौकशी सुरु असून या भरती प्रक्रियेला मंजुरी देणाऱ्या शिक्षणाधिकाऱ्यांवरही शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेत राज्य शासनाने दिले आहेत.राज्यात २ मे २०१२ रोजीच्या शासन निर्णयाद्वारे शिक्षक भरतीवर बंदी घालण्यात आली होती. असे असताना शासनाचे निर्णय ढाब्यावर बसवून विविध खाजगी संस्थांनी जवळपास २ हजार शिक्षकांची भरती केल्याची तक्रार करण्यात आली होती. त्या अनुषंगाने करण्यात आलेल्या चौकशीत या तक्रारीत तथ्य आढळले. विशेष म्हणजे शासनाचे नियम डावलून भरती झाली असताना काही शिक्षणाधिकाऱ्यांनी भरती करण्यात आलेल्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाºयांना वैयक्तिक मान्यता देण्याचा पराक्रमही केला होता.यामध्ये लाखो रुपयांची उलाढाल झाल्याची चर्चा होती. त्या अनुषंगाने तक्रारीनंतर राज्याच्या शिक्षण आयुक्तांमार्फत या प्रक्रियेची चौकशी सुरु करण्यात आली असून दोषींविरुद्ध शिस्तभंगविषयक कारवाईचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश वरिष्ठ अधिकाºयांना देण्यात आल्याचे पत्र राज्याच्या शिक्षण विभागाने काढले आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. नियमबाह्यरित्या भरती करण्यात आलेल्या शिक्षकांना देण्यात आलेल्या वेतनाची वसुलीही शासनाकडून करण्यात येणार आहे.दरम्यान, परभणी जिल्ह्यातही अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात नियुक्त्या देण्याचा प्रकार घडला आहे. याबाबतही राज्य शासनाकडे तक्रार करण्यात आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून जिल्ह्यात ठाण मांडून बसलेल्या काही अधिकाºयांनी हा प्रकार केला असताना या प्रकाराकडे औरंगाबाद येथील उपसंचालक कार्यालयाकडून दुर्लक्ष करण्यात आले.आता राज्यस्तरावरुनच या प्रकाराची चौकशी सुरु करण्यात आल्याने अनियमितता केलेल्या अधिकाºयांमध्ये खळबळ उडाली आहे. शिवाय ज्या खाजगी शिक्षण संस्थामध्ये अशा प्रकारे भरती प्रक्रिया राबविण्यात आली आहे, त्या खाजगी शिक्षण संस्थाचालकांचेही ढाबे दणाणले आहेत. त्यामुळे या प्रकरणी शिक्षण विभागाने कडक भूमिका घेऊन शिक्षण विभागाला फसविणाºयांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी शिक्षण वर्तुळातून होत आहे.शिक्षक- शिक्षकेतर कर्मचाºयांची संचमान्यता अंतिम करणे सुरु४राज्यातील ७५ हजार ३८ शाळांमध्ये विद्यार्थी संख्येच्या प्रमाणात शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाºयांची आकडेवारी शिक्षण विभागाकडे उपलब्ध नाही. ३० सप्टेंबर २०१४ पर्यंत सर्व शाळांनी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी संख्येची माहिती विभागीय शिक्षण अधिकाºयांना दिली. मात्र शिक्षणाधिकाºयांनी काही शाळांचा अहवाल प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडे सादर केला नसल्याने २०१४-१५ ची संचमान्यता होऊ शकली नाही. डिसेंबर २०१५ मध्ये ही बाब निदर्शनास आली. ही माहिती सादर करण्यास विलंब करणाºया शिक्षणाधिकाºयांवरही शिक्षण विभागाच्या वतीने कारवाई करण्यात येणार आहे. तसेच राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांची संचमान्यता अंतिम करण्याची कारवाई सुरु असल्याचे शिक्षण विभागाच्या वतीने सांगण्यात आले.

टॅग्स :parabhaniपरभणीTeacherशिक्षकStudentविद्यार्थीGovernmentसरकार