शहरं
Join us  
Trending Stories
1
छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
2
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
3
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
4
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
5
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
6
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
7
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
8
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
9
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
10
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
11
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
12
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
13
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
14
Mehbooba Mufti: "गांधी- नेहरूंचा हिंदुस्थान आता 'लिंचिस्तान' झालाय!", मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर प्रहार
15
जेवण आणि झोप यामध्ये नेमकं किती अंतर असावं? निरोगी आयुष्यासाठी पाळा 'हा' सोपा नियम
16
सावधान! तुमची एक छोटी चूक आणि बँक खाते रिकामे; UPI वापरताना 'हे' ५ डिजिटल नियम पाळणे आता अनिवार्य
17
'बंकरमध्ये लपण्याची वेळ आलेली...', ऑपरेशन सिंदूरवर पाकिस्तानी राष्ट्रपती झरदारींचा मोठा खुलासा
18
Navneet Rana: "अजित पवारांचं भाजपसोबत जाणं, हा शरद पवारांचाच प्लॅन!" नवनीत राणा असं का म्हणाल्या?
19
"गिरीजा ओकला पाहून इम्रान हाश्मीही झालेला दंग", प्रसिद्ध निर्मातीने सांगितला 'तो' किस्सा
20
नव्या पर्वाला सुरुवात; मुंबई महानगरपालिकेसाठी काँग्रेस-‘वंचित’ची आघाडी, जागावाटपही ठरले!
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : प्रशासनाकडे उपलब्ध नाही चाऱ्याची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 00:19 IST

परतीच्या पावसाने दगा दिल्याने तालुक्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्हा प्रशासन दुष्काळाच्या अनुषंगाने माहिती संकलित करण्यासाठी धडपड करीत असताना दुसरीकडे तालुक्यातील अधिकाºयांकडे उपलब्ध चाºयाची माहिती नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे दुष्काळा संदर्भातील उदासिनताच समोर येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसोनपेठ : परतीच्या पावसाने दगा दिल्याने तालुक्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्हा प्रशासन दुष्काळाच्या अनुषंगाने माहिती संकलित करण्यासाठी धडपड करीत असताना दुसरीकडे तालुक्यातील अधिकाºयांकडे उपलब्ध चाºयाची माहिती नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे दुष्काळा संदर्भातील उदासिनताच समोर येत आहे.तालुक्यात दोन महिन्यांपासून पावसाचा ताण पडला आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. तर दुसरीकडे ओला चारा कमी होत असल्याने जनावरांचीही उपासमार होण्याची शक्यता आहे. तालुक्यात एकूण किती चारा उपलब्ध आहे. आगामी काळात चारा संपला तर काय नियोजन करावे लागले, याचे आराखडे आतापासूनच तयार होणे अपेक्षित आहे. मात्र प्रशासनाकडे चाºयाची आकडेवारीच उपलब्ध नसल्याचे दिसून आले.तालुक्यात मागील रबी हंगाम आणि चालू वर्षीच्या खरीप हंगामात किती चारा शिल्लक आहे. याची माहिती घेतली असता पशूसंवर्धन विभागाने आमच्याकडे माहिती उपलब्ध नसून कृषी विभागाकडे ही माहिती मिळेल, असे सांगून हात वर केले.कृषी विभागाकडे चाºयाची माहिती विचारली तेव्हा त्यांच्याकडेही ही माहिती नाही. त्यामुळे तालुक्यात एकीकडे दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असताना दुसरीकडे तालुका कृषी कार्यालय आणि पशू संवर्धन विभाग मात्र चाºयाबाबत अनभिज्ञ असल्याचे दिसून आले. जर अधिकाºयांना चाºयाची माहितीच नसेल तर दुष्काळाचे नियोजन करणार कसे? असा प्रश्न निर्माण होत आहे.दररोज लागतो दीड लाख किलो चाराएकोणविसाव्या पशूगणनेनुसार तालुक्यात ३५ हजार ६७१ जनावरे आहेत. या जनावरांना दररोज १ लाख ४४ हजार ७८० किलो सरासरी चारा लागतो. तालुक्यात गाय, म्हैस आणि बैल या जनावरांची संख्या १६८९६ तर शेळ्या आणि मेंढ्यांची संख्या ८ हजार ५३ एवढी आहे.याशिवाय ६४१५ लहान जनावरे आहेत. लहान जनावरांना सरासरी ३ किलो आणि मोठ्या जनावरांना सहा किलो चारा लागतो. या अंदाजानुसार तालुक्याला दररोज १ लाख ४४ हजार ७८० किलो चाºयाची आवश्यकता आहे.सद्यस्थितीत यापैकी किती चारा शिल्लक आहे, याचा मात्र अंदाज बांधण्याचे कामही प्रशासनातील अधिकारी करीत नसल्याने नियोजन कसे करणार? असा प्रश्न निर्माण होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीRainपाऊसWaterपाणीFarmerशेतकरी