शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
2
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
3
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
4
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
5
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
6
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
7
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
8
बापासमोरच दोन वर्षाच्या मुलाला जबड्यात धरून बिबट्या पसार; १५० जवानांकडून शोधमोहिम, मृतदेह सापडला
9
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
10
लवकरच बाजारात येतेय Toyota ची Mini Fortuner! महाराष्ट्रातल्या 'या' शहरात होणार उत्पादन; किती असू शकते किंमत? जाणून घ्या
11
तंत्रज्ञानाची किमया! सॅमसंगने AI Home केलं लाँच; आता घर होईल स्मार्ट, फक्त एक क्लिक अन्...
12
तांत्रिक बिघाड की मोसादचा हात? संयुक्त राष्ट्रांत पॅलेस्टाईनवर चर्चा होताच ४ बड्या नेत्यांचा माईक बंद  
13
पद्मश्री ज्येष्ठ लेखक एस. एल. भैरप्पा काळाच्या पडद्याआड; पंतप्रधान मोदींसह राष्ट्रपतींनी वाहिली श्रद्धांजली
14
लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, लेहमध्ये ४ जणांचा मृत्यू, ७० जण जखमी 
15
हलगर्जीपणाचा कळस! सरकारी रुग्णालयात दुसऱ्याच पायाची सर्जरी, ऑक्सिजन मास्क काढला अन्...
16
"फायनलमध्ये बघून घेऊ’’, दोन वेळा मार खाल्यानंतर शाहीन शाह आफ्रिदीचं भारताला आव्हान    
17
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
18
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
19
समृद्धी महामार्गावर दुहेरी उत्पन्नाचा स्रोत; सौरऊर्जा निर्मिती करणारा देशातील पहिला 'एक्सप्रेसवे' !
20
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?

परभणी : प्रशासनाकडे उपलब्ध नाही चाऱ्याची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 00:19 IST

परतीच्या पावसाने दगा दिल्याने तालुक्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्हा प्रशासन दुष्काळाच्या अनुषंगाने माहिती संकलित करण्यासाठी धडपड करीत असताना दुसरीकडे तालुक्यातील अधिकाºयांकडे उपलब्ध चाºयाची माहिती नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे दुष्काळा संदर्भातील उदासिनताच समोर येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसोनपेठ : परतीच्या पावसाने दगा दिल्याने तालुक्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्हा प्रशासन दुष्काळाच्या अनुषंगाने माहिती संकलित करण्यासाठी धडपड करीत असताना दुसरीकडे तालुक्यातील अधिकाºयांकडे उपलब्ध चाºयाची माहिती नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे दुष्काळा संदर्भातील उदासिनताच समोर येत आहे.तालुक्यात दोन महिन्यांपासून पावसाचा ताण पडला आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. तर दुसरीकडे ओला चारा कमी होत असल्याने जनावरांचीही उपासमार होण्याची शक्यता आहे. तालुक्यात एकूण किती चारा उपलब्ध आहे. आगामी काळात चारा संपला तर काय नियोजन करावे लागले, याचे आराखडे आतापासूनच तयार होणे अपेक्षित आहे. मात्र प्रशासनाकडे चाºयाची आकडेवारीच उपलब्ध नसल्याचे दिसून आले.तालुक्यात मागील रबी हंगाम आणि चालू वर्षीच्या खरीप हंगामात किती चारा शिल्लक आहे. याची माहिती घेतली असता पशूसंवर्धन विभागाने आमच्याकडे माहिती उपलब्ध नसून कृषी विभागाकडे ही माहिती मिळेल, असे सांगून हात वर केले.कृषी विभागाकडे चाºयाची माहिती विचारली तेव्हा त्यांच्याकडेही ही माहिती नाही. त्यामुळे तालुक्यात एकीकडे दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असताना दुसरीकडे तालुका कृषी कार्यालय आणि पशू संवर्धन विभाग मात्र चाºयाबाबत अनभिज्ञ असल्याचे दिसून आले. जर अधिकाºयांना चाºयाची माहितीच नसेल तर दुष्काळाचे नियोजन करणार कसे? असा प्रश्न निर्माण होत आहे.दररोज लागतो दीड लाख किलो चाराएकोणविसाव्या पशूगणनेनुसार तालुक्यात ३५ हजार ६७१ जनावरे आहेत. या जनावरांना दररोज १ लाख ४४ हजार ७८० किलो सरासरी चारा लागतो. तालुक्यात गाय, म्हैस आणि बैल या जनावरांची संख्या १६८९६ तर शेळ्या आणि मेंढ्यांची संख्या ८ हजार ५३ एवढी आहे.याशिवाय ६४१५ लहान जनावरे आहेत. लहान जनावरांना सरासरी ३ किलो आणि मोठ्या जनावरांना सहा किलो चारा लागतो. या अंदाजानुसार तालुक्याला दररोज १ लाख ४४ हजार ७८० किलो चाºयाची आवश्यकता आहे.सद्यस्थितीत यापैकी किती चारा शिल्लक आहे, याचा मात्र अंदाज बांधण्याचे कामही प्रशासनातील अधिकारी करीत नसल्याने नियोजन कसे करणार? असा प्रश्न निर्माण होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीRainपाऊसWaterपाणीFarmerशेतकरी