शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
2
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
3
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
4
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
5
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
6
Health Tips: शरीरावर असलेले लाल तीळ कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
7
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका
8
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
9
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
10
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
11
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
12
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
13
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
14
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
15
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
16
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये सलमान खानची एन्ट्री, 'या' भूमिकेत दिसणार भाईजान
18
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
19
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
20
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी

परभणी : अधिग्रहण अनुदानात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2018 01:00 IST

टंचाई काळात पाण्याचे खाजगी स्त्रोत अधिग्रहित केल्यानंतर अधिग्रहणधारकाला दिल्या जाणाऱ्या अनुदानामध्ये वाढ करण्याचा निर्णय राज्य शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने घेतला असून या निर्णयामुळे जिल्ह्यातील विहीर, बोअर मालकांना आर्थिक लाभ मिळणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी: टंचाई काळात पाण्याचे खाजगी स्त्रोत अधिग्रहित केल्यानंतर अधिग्रहणधारकाला दिल्या जाणाऱ्या अनुदानामध्ये वाढ करण्याचा निर्णय राज्य शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने घेतला असून या निर्णयामुळे जिल्ह्यातील विहीर, बोअर मालकांना आर्थिक लाभ मिळणार आहे.पाण्याची टंचाई निर्माण झाल्यास संबंधित गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी शासनाकडून खाजगी विहिरी, बोअर अधिग्रहित करुन त्या गावांचा पाणीप्रश्न सोडविला जातो. दरवर्षी विहिरी आणि बोअरचे अधिग्रहण जिल्ह्यामध्ये केले जाते. यावर्षी मागील काही वर्षांच्या तुलनेत पाणीटंचाईची तीव्रता अधिक आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने जलस्त्रोत अधिग्रहण करण्याची वेळ प्रशासनावर येणार असून याच काळात अधिग्रहणासाठी अनुदान वाढविल्यामुळे विहीर, बोअर मालकांना यावर्षी आगाऊ रक्कम हाती पडणार आहे.शासनाच्या पाणी स्त्रोत अधिग्रहण करण्याच्या अधिनियमातील कलम ३ मधील तरतुदीनुसार पाणीटंचाई काळात ग्रामीण भागात विहिरी, जलाशयातून पाणी उपलब्ध करुन देण्याची तरतूद करण्यात आली आहे.खाजगी मालकांनी पाणी उपलब्ध करुन दिल्यास त्यांना शासनाकडून मोबदला दिला जातो. सध्या खाजगी विहीर अधिग्रहित केल्यानंतर विहीर मालकांनी पाणी काढण्यासाठी विद्युत, डिझेलपंप, वीज जोडणीसह उपलब्ध करुन दिली नाही तर त्या मालकाला ३०० रुपये प्रति दिन आणि विद्युतपंप, वीज जोडणीसह साधन सामुग्री दिली तर प्रति दिन ४०० रुपये मोबदला दिला जातो. पाणीपुरवठा विभागाचे अव्वर सचिव पी.आर. खोटरे यांनी काढलेल्या आदेशानुसार आता विहीर, बोअर अधिग्रहणासाठी विहीर मालकांना प्रति दिन ४५० रुपये (विद्युत पंप, जोडणी नसल्यास) तसेच प्रतिदिन व जोडणी असल्यास प्रति दिन ६०० रुपये मोबदला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.जिल्हाधिकाºयांना अधिग्रहणाचे अधिकार४पाणीटंचाई परिस्थितीमध्ये विहीर व बोअर अधिग्रहण करण्याचे अधिकार जिल्हाधिकाºयांना देण्यात आले आहेत किंवा जिल्हाधिकाºयांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाºयामार्फतही अधिग्रहण केले जावू शकते. विहीर मालकांकडून कायदेशीर करार केला जावा, अधिग्रहण मोबदल्याची रक्कम प्रत्येक तीन महिन्यांनी वेळेच्या वेळी अदा करावी. मोबदल्याची मागणी ग्रामपंचायत, गटविकास अधिकारी यांच्यामार्फत येण्याची प्रतीक्षा न करता संबंधितांना मोबदला प्रदान करावा, असेही या आदेशात नमूद केले आहे.मोबदला रखडल्याने उदासिनता४परभणी जिल्ह्यात मागील काही वर्षांच्या टंचाईचा अनुभव लक्षात घेता खाजगी विहीर, बोअर मालकांमध्ये उदासिनता आहे. टंचाईच्या काळात ग्रामस्थांना पाणीपुरवठा केल्यानंतरही मोबदला मिळत नाही. मोबदल्यासाठी विहीर अधिग्रहणधारकांना प्रशासन दफ्तरी वारंवार चकरा माराव्या लागतात. तरीही त्यांना मोबदला अदा करण्यासाठी विलंब लागल्याचे यापूर्वीचे अनुभव आहेत. त्यामुळे विहीर, बोअर मालकांमध्ये अधिग्रहणासंदर्भात उदासिनता दिसून येत आहे. दोन वर्षानंतर मोबदला वितरित झाल्याचाही अनुभव आहे. तेव्हा यावर्षी वेळेत मोबदला अदा करावा, अशी मागणी होत आहे.४मागील वर्षीच्या उन्हाळ्यात जिल्हा प्रशासनाला खाजगी स्त्रोत अधिग्रहीत करावे लागले होते. यावर्षी पावसाचे प्रमाण कमी झाल्याने आॅक्टोबर महिन्यापासूनच टंचाई जाणवत आहे. त्यामुळे टंचाई दूर करण्यासाठी सहा महिन्यांपर्यंत जलस्त्रोत अधिग्रहीत करावे लागणार आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीwater scarcityपाणी टंचाई