शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

परभणी : अधिग्रहण अनुदानात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2018 01:00 IST

टंचाई काळात पाण्याचे खाजगी स्त्रोत अधिग्रहित केल्यानंतर अधिग्रहणधारकाला दिल्या जाणाऱ्या अनुदानामध्ये वाढ करण्याचा निर्णय राज्य शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने घेतला असून या निर्णयामुळे जिल्ह्यातील विहीर, बोअर मालकांना आर्थिक लाभ मिळणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी: टंचाई काळात पाण्याचे खाजगी स्त्रोत अधिग्रहित केल्यानंतर अधिग्रहणधारकाला दिल्या जाणाऱ्या अनुदानामध्ये वाढ करण्याचा निर्णय राज्य शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने घेतला असून या निर्णयामुळे जिल्ह्यातील विहीर, बोअर मालकांना आर्थिक लाभ मिळणार आहे.पाण्याची टंचाई निर्माण झाल्यास संबंधित गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी शासनाकडून खाजगी विहिरी, बोअर अधिग्रहित करुन त्या गावांचा पाणीप्रश्न सोडविला जातो. दरवर्षी विहिरी आणि बोअरचे अधिग्रहण जिल्ह्यामध्ये केले जाते. यावर्षी मागील काही वर्षांच्या तुलनेत पाणीटंचाईची तीव्रता अधिक आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने जलस्त्रोत अधिग्रहण करण्याची वेळ प्रशासनावर येणार असून याच काळात अधिग्रहणासाठी अनुदान वाढविल्यामुळे विहीर, बोअर मालकांना यावर्षी आगाऊ रक्कम हाती पडणार आहे.शासनाच्या पाणी स्त्रोत अधिग्रहण करण्याच्या अधिनियमातील कलम ३ मधील तरतुदीनुसार पाणीटंचाई काळात ग्रामीण भागात विहिरी, जलाशयातून पाणी उपलब्ध करुन देण्याची तरतूद करण्यात आली आहे.खाजगी मालकांनी पाणी उपलब्ध करुन दिल्यास त्यांना शासनाकडून मोबदला दिला जातो. सध्या खाजगी विहीर अधिग्रहित केल्यानंतर विहीर मालकांनी पाणी काढण्यासाठी विद्युत, डिझेलपंप, वीज जोडणीसह उपलब्ध करुन दिली नाही तर त्या मालकाला ३०० रुपये प्रति दिन आणि विद्युतपंप, वीज जोडणीसह साधन सामुग्री दिली तर प्रति दिन ४०० रुपये मोबदला दिला जातो. पाणीपुरवठा विभागाचे अव्वर सचिव पी.आर. खोटरे यांनी काढलेल्या आदेशानुसार आता विहीर, बोअर अधिग्रहणासाठी विहीर मालकांना प्रति दिन ४५० रुपये (विद्युत पंप, जोडणी नसल्यास) तसेच प्रतिदिन व जोडणी असल्यास प्रति दिन ६०० रुपये मोबदला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.जिल्हाधिकाºयांना अधिग्रहणाचे अधिकार४पाणीटंचाई परिस्थितीमध्ये विहीर व बोअर अधिग्रहण करण्याचे अधिकार जिल्हाधिकाºयांना देण्यात आले आहेत किंवा जिल्हाधिकाºयांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाºयामार्फतही अधिग्रहण केले जावू शकते. विहीर मालकांकडून कायदेशीर करार केला जावा, अधिग्रहण मोबदल्याची रक्कम प्रत्येक तीन महिन्यांनी वेळेच्या वेळी अदा करावी. मोबदल्याची मागणी ग्रामपंचायत, गटविकास अधिकारी यांच्यामार्फत येण्याची प्रतीक्षा न करता संबंधितांना मोबदला प्रदान करावा, असेही या आदेशात नमूद केले आहे.मोबदला रखडल्याने उदासिनता४परभणी जिल्ह्यात मागील काही वर्षांच्या टंचाईचा अनुभव लक्षात घेता खाजगी विहीर, बोअर मालकांमध्ये उदासिनता आहे. टंचाईच्या काळात ग्रामस्थांना पाणीपुरवठा केल्यानंतरही मोबदला मिळत नाही. मोबदल्यासाठी विहीर अधिग्रहणधारकांना प्रशासन दफ्तरी वारंवार चकरा माराव्या लागतात. तरीही त्यांना मोबदला अदा करण्यासाठी विलंब लागल्याचे यापूर्वीचे अनुभव आहेत. त्यामुळे विहीर, बोअर मालकांमध्ये अधिग्रहणासंदर्भात उदासिनता दिसून येत आहे. दोन वर्षानंतर मोबदला वितरित झाल्याचाही अनुभव आहे. तेव्हा यावर्षी वेळेत मोबदला अदा करावा, अशी मागणी होत आहे.४मागील वर्षीच्या उन्हाळ्यात जिल्हा प्रशासनाला खाजगी स्त्रोत अधिग्रहीत करावे लागले होते. यावर्षी पावसाचे प्रमाण कमी झाल्याने आॅक्टोबर महिन्यापासूनच टंचाई जाणवत आहे. त्यामुळे टंचाई दूर करण्यासाठी सहा महिन्यांपर्यंत जलस्त्रोत अधिग्रहीत करावे लागणार आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीwater scarcityपाणी टंचाई