शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
3
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
4
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
5
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
6
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
7
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
8
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
9
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
10
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
11
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
12
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
13
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
14
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
15
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
16
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
17
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
18
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
19
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
20
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा

परभणी : उरुसातून १८ लाखांचे उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 23:42 IST

येथील हजरत सय्यद शाह तुराबूल हक यांच्या ऊरुसामध्ये जिल्हा वक्फ बोर्डाला १८ लाख ४ हजार रुपयांचे उत्पन्न झाले आहे. परभणी येथील ऊरुस राज्यभरात प्रसिद्ध आहे. दरवर्षी ३१ जानेवारी ते १५ फेब्रुवारी या काळात शहरामध्ये ऊरुस भरविला जातो. ऊरुसासाठी देशभरातील व्यापारी परभणीत येऊन व्यवसाय करतात. या व्यापाऱ्यांना जिल्हा वक्फ बोर्डाच्या माध्यमातून दुकाने उपलब्ध करुन दिली जातात.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील हजरत सय्यद शाह तुराबूल हक यांच्या ऊरुसामध्ये जिल्हा वक्फ बोर्डाला १८ लाख ४ हजार रुपयांचे उत्पन्न झाले आहे.परभणी येथील ऊरुस राज्यभरात प्रसिद्ध आहे. दरवर्षी ३१ जानेवारी ते १५ फेब्रुवारी या काळात शहरामध्ये ऊरुस भरविला जातो. ऊरुसासाठी देशभरातील व्यापारी परभणीत येऊन व्यवसाय करतात. या व्यापाऱ्यांना जिल्हा वक्फ बोर्डाच्या माध्यमातून दुकाने उपलब्ध करुन दिली जातात. राहट पाळणे, गेम शो, मनोरंजनाची साधने, छोटे व्यावसायिक यांच्याकडूनही वक्फ बोर्ड किरायापोटी रक्कम वसूल करते. यावर्षीच्या ऊरुसामध्ये ५८० दुकाने भाडेतत्वावर देण्यात आली होती. तसेच या दुकानांशिवाय रस्त्यांवर स्टॉल लावलेल्या लघु विक्रेत्यांकडूनही वक्फ बोर्डाने भाडे वसूल केले आहे. शोलाईनसाठी १५ ब्लॉक किरायाणे दिले होते. या सर्व बाबींमधून जिल्हा वक्फ बोर्डाला ३० लाख ३० हजार १९७ रुपये प्राप्त झाले. त्यातून मीना बाजाराची उभारणी करण्यासाठी १२ लाख ७४ हजार रुपये, ऊरुसाच्या प्रसिद्धीसाठी ३० हजार रुपये, संदल व इतर कार्यक्रमांसाठी २५ हजार रुपये, दर्गा आणि मशिदीचे थकलेले वीज बिल अदा करण्यासाठी २ लाख ७५ हजार रुपये असा १५ लाख रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. खर्च वजा जाता जिल्हा वक्फ बोर्डाला १८ लाख ४ हजार रुपये निव्वळ उत्पन्न मिळाले असल्याची माहिती बोर्डाच्या वतीने देण्यात आली.दरम्यान, ऊरुस शांततेत पार पाडण्यासाठी वक्फ बोर्डाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अजीज अहमद, जिल्हा वक्फ अधिकारी शेख जिलानी, खुसरो खान, नखी अली, आयुब खान, रियाज अहमद, अल्ताफ खान, जमीर खान यांच्यासह जिल्हा वक्फ बोर्डातील अधिकारी, कर्मचारी, महापालिका व जिल्हा प्रशासनातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले.अनेक पटीने वाढले बोर्डाचे उत्पन्न४जिल्हा वक्फ बोर्डाला मागील वर्षी केवळ २ हजार रुपयांचे उत्पन्न ऊरुसातून मिळाले होते. यावर्षी ते १८ लाखापर्यंत पोहचले आहे. विशेष म्हणजे यावर्षी विद्युत कंत्राट घेतलेल्या कंत्राटदाराने मोफत सेवा दिली. त्यामुळे विद्युत सेवेवरील खर्चाची बचत झाली असून वक्फ बोर्डाच्या उत्पन्नात चांगलीच वाढ झाली आहे. या उत्पन्नातून दर्गामध्ये रंगरंगोटी करणे, दर्गा, मशिदीचे नियमित वीज बिल भरणे. तसेच वक्फ बोर्डातील अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा खर्च भागविला जाणार आहे.

टॅग्स :parabhaniपरभणी