शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

परभणी: शेकडो ट्रॅक्टरने रात्रंदिवस वाळूउपसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2019 00:50 IST

तालुक्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदीपात्रातून शेकडो ट्रॅक्टरांच्या साह्याने रात्रं-दिवस वाळूचा बेसुमार अवैध उपसा सुरूच असल्याने वाळू चोरीला लगाम लावण्यात महसूल प्रशासन अपयशी ठरल्याचे दिसत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड (परभणी) : तालुक्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदीपात्रातून शेकडो ट्रॅक्टरांच्या साह्याने रात्रं-दिवस वाळूचा बेसुमार अवैध उपसा सुरूच असल्याने वाळू चोरीला लगाम लावण्यात महसूल प्रशासन अपयशी ठरल्याचे दिसत आहे.तालुक्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदीपात्रात अधिकृतरित्या असलेल्या वाळुच्या धक्याचा लिलाव झाला नाही. त्यामुळे वाळूमाफियांनी गोदावरी पात्रात चांगलाच धुमाकूळ घातला आहे. दररोज शेकडो ट्रॅक्टरच्या माध्यमातून गंगाखेड तालुक्यातील मैराळ सावंगी, चिंचटाकळी, गोंडगाव, खळी परिसर, महातपुरी, मुळी बंधारा परिसर, धारखेड, गंगाखेड शहर, रेल्वे पूल परिसर, झोला पिंपरी, मसला आदी ठिकाणाहून रात्रंदिवस वाळुचा उपसा सुरूच ठेवल्याने गोदावरी नदीपात्र वाळवंट झाल्याचे चित्र दिसून येत आहे.ट्रॅक्टरद्वारे वाळूचा उपसा करून नदी पात्राजवळ मोठ-मोठे वाळू साठे तयार करण्यात आले आहेत. महसूल प्रशासन व पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची नजर चूकवित हायवा, टिप्पर आदी वाहनांद्वारे वाळू साठ्यांमधील वाळू बाहेरील जिल्ह्यात वाहतूक केली जात आहे. सध्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने महसूलचे कर्मचारी निवडणुकीच्या कामात व्यस्त असताना वाळूमाफिया मात्र वाळू दिसेल त्या ठिकाणावरून चोरून नेत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.तालुक्यातील धारखेड शिवारातील सर्व्हे नंबर १८३, १८४, १८५ मधील शेत शिवाराजवळून झोला येथील वाळूमाफिया ट्रॅक्टरद्वारे रात्रंदिवस वाळूचा बेसुमार उपसा करीत आहेत. यामुळे गोदाकाठी असलेल्या शेतीला धोका निर्माण झाला आहे. तलाठी, सरपंच व पोलीस पाटील यांच्यासह शेतकºयांनीही वाळू माफियांना आवर घालण्याची मागणी जिल्हाधिकाºयांकडे केली आहे. तसेच सय्यद समीर सय्यद सलीम या शेतकºयानेही जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांच्याकडे लेखी तक्रार करून गोदावरी नदी परिसरातील वाळुची चोरी थांबवावी, अशी मागणी केली आहे.एका वाळू : धक्क्याचा लिलाव झाल्याची माहिती४गंगाखेड तालुक्यातील चिंचटाकळी व दुस्सलगाव येथील दोन वाळू धक्यांची लिलाव प्रक्रिया जिल्हा प्रशासनाने हाती घेतली होती. २१ फेब्रुवारीपासून ते १४ मार्चपर्यंत राबविण्यात आलेल्या या लिलाव प्रक्रियेत चिंचटाकळी येथील वाळू धक्का ६१ लाख ११०० रुपयांची बोली मिळाल्याने या धक्याचा लिलाव झाल्याची माहिती आहे. याबाबत तहसील कार्यालयातील संबंधित विभागाशी संपर्क साधला असता १६ मार्च रोजीपर्यंत वाळू धक्क्याचा लिलाव झाल्याची अधिकृत माहिती तहसील प्रशासनास मिळाली नसल्याचे सांगण्यात आले.हजारो ब्रास वाळूची चोरी४गंगाखेड तालुक्यातील १३ वाळू धक्क्यांपैकी सद्य स्थितीत एकाही वाळू धक्क्याचा लिलाव झाला नाही. यामुळे परिसरातील वाळू माफियांनी हजारो ब्रास वाळूची चोरी केल्याने शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. तालुक्यातील वाळू धक्क्यांचा लिलाव तत्काळ करून वाळू चोरी थांबविण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी तालुकावासियांतून होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीsandवाळूriverनदी