शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
8
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
9
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
10
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
11
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
12
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
13
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
14
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
15
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
16
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
17
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
18
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
19
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
20
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला

परभणीत सव्वाचारशे किलोमीटरची जलवाहिनी अंथरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2019 00:27 IST

मागील अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेली शहराची नवी पाणीपुरवठा योजना अंतिम टप्प्यात आली असून शहरातील विविध वसाहतींमध्ये ४३६ कि.मी. जलवाहिनी अंथरण्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे या योजनेतून लवकरच पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : मागील अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेली शहराची नवी पाणीपुरवठा योजना अंतिम टप्प्यात आली असून शहरातील विविध वसाहतींमध्ये ४३६ कि.मी. जलवाहिनी अंथरण्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे या योजनेतून लवकरच पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.जिंतूर तालुक्यातील येलदरी धरणातून जलवाहिनीच्या सहाय्याने परभणीकरांना पाणी उपलब्ध केले जाणार आहे़ या योजनेंतर्गत येलदरी येथे उद्भव विहीर, येलदरीपासून १५ किमी अंतरावर प्रक्रिया प्रकल्प त्यानंतर परभणी शहरानजिक धर्मापुरी येथे जलशुद्धीकरण प्रकल्प उभारणीचे काम पूर्ण झाले आहे़ त्याच प्रमाणे परभणी शहरातही जलवाहिनी टाकण्याचे काम जवळपास पूर्ण झाले असून, आता या योजनेंतर्गत चाचण्या घेणे तसेच इनलेट, आऊटलेट जोडणी ही कामे शिल्लक आहेत़धर्मापुरी येथे जलशुद्धीकरण केंद्राचे काम जवळपास ९० टक्के पूर्ण झाले आहे़ या जलशुद्धीकरण केंद्रासाठी लागणाऱ्या पंपांची मागणी नोंदविण्यात आली आहे़ मागणी प्रमाणे या पंपांचे डिझाईन तयार करून ते लवकरच प्राप्त होतील, त्यानंतर जलशुद्धीकरण केंद्रात पंप बसवून हे पाणी शहरातील खाजा कॉलनी आणि विद्यानगर येथे उभारलेल्या दोन एमडीआर जलकुंभामध्ये सोडले जाणार आहे़ या जलकुंभातून शहरातील विविध विभागात पाण्याचे वितरण करण्यासाठी एकूण १७ जलकुंभ उभारण्यात आले आहेत़ त्यामध्ये ६ जलकुंभ अमृत योजनेंतर्गत उभारण्यात आले असून, दोन जलकुंभ युआयडीएसएसएमटी योजनेंतर्गत उभारण्यात आले आहेत़परभणी शहरामध्ये युआयडीएसएसएमटी योजनेंतर्गत २६६ किमीची जलवाहिनी अंथरण्यात आली असून, अमृत योजनेंतर्गत १७० किमी अंतराची जलवाहिनी अंथरण्याचे काम पूर्ण झाले आहे़ त्यापैकी १४० किमी अंतरापर्यंत असलेल्या जलवाहिनीची हॅड्रोलिक टेस्टींगही पूर्ण झाली आहे़ काही भागात इनलेट, आऊटलेट क्रॉस कनेक्शन जोडण्याची कामे शिल्लक आहेत़ ती लवकरच पूर्ण होतील, अशी माहिती शहर अभियंता वसिम पठाण यांनी दिली़दरम्यान, येलदरी ते धर्मापुरी या ५२ किमी अंतरात जलवाहिनी अंथरण्यात आली होती; परंतु, त्यातील ७ किमी अंतराची जलवाहिनी महामार्गाच्या आड येत असल्याने ही जलवाहिनी काढून ती रस्त्याच्या कडेने टाकण्याचे कामही सध्या सुरू आहे़ महामार्ग प्राधिकरण हे काम करीत असून, येत्या महिनाभरात काम पूर्ण होईल, असे वसिम यांनी सांगितले़ एकंदर शहरातील नवीन नळ योजनेची कामे जवळपास पूर्ण झाली असून, फिनिसिंग आणि काही चाचण्या शिल्लक आहेत़ पुढील महिन्यात ही सर्व कामे पूर्ण करून सप्टेंबर अखेरपर्यंतच शहरवासियांना नवीन योजनेतून पाणी देण्याचा मानस महापालिकेने वर्तविला आहे़ २००८ मध्ये या योजनेला मंजुरी मिळाली होती़ ११ वर्षांपासून रखडलेली ही योजना आता दृष्टीक्षेपात येत असून, महापालिकेच्या प्रयत्नानुसार सप्टेंबर महिन्यापासून शहरवासियांना नव्या पाणीपुरवठा योजनेतून पाणी मिळाले तर शहराचा पाण्याचा प्रश्न निकाली निघणार आहे़ सध्या तरी शहरवासियांना आणखी एक महिना प्रतीक्षा करावी लागणार आहे.दरडोई १३५ लिटर पाणीनवीन पाणीपुरवठा योजनेचे काम प्राधान्याने हाती घेतले आहे़ ते सप्टेंबर अखेरपर्यंत पूर्ण करणारच आहोत़ त्यानंतर शहरवासियांना दर दिवशी दर डोई १३५ लिटर पाणी पुरविण्यात येईल़ यासाठी शहरातील व्हॉल्व्हचे नियोजन करण्यात आले असून, प्रत्येक नळाला मीटर बसविणे बंधनकारक केले जाणार आहे, असे मनपा आयुक्त रमेश पवार यांनी सांगितले़

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणी