शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ दावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकूण वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
2
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
3
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
4
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
5
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
7
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
8
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
9
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
10
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
11
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
12
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
13
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
14
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
15
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
16
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
17
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
18
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
19
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
20
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”

परभणी : दमदार पावसाने जिल्ह्यातील पिकांना मिळाले जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2019 00:17 IST

दोन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर जिल्ह्यात दाखल झालेल्या पावसाने खरीप हंगामातील पिकांना जीवदान मिळाले आहे़ पाण्याअभावी माना टाकणारी पिके भीज पावसाने तरारली आहेत़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : दोन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर जिल्ह्यात दाखल झालेल्या पावसाने खरीप हंगामातील पिकांना जीवदान मिळाले आहे़ पाण्याअभावी माना टाकणारी पिके भीज पावसाने तरारली आहेत़यावर्षीच्या पावसाळ्यात सुरुवातीपासूनच पावसाने ताण देण्यास सुुरुवात केली़ जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पाऊस झाल्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी पेरणी उरकून घेतली़ कापूस, सोयाबीन, तूर, मूग, उडीद या पिकांची पेरणी झाली़ जिल्हाभरात पेरणीचे क्षेत्र १०० टक्क्यापर्यंत पोहचले नसले तरी ८४ ते ८५ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली असून, पावसाअभावी ही पिके कोमेजत असल्याची स्थिती निर्माण झाली होती़ त्यामुळे नागरिक पावसाची प्रतीक्षा करीत होते़ गावोगावी पावसासाठी देवाला साकडेही घालण्यात आले होते़अखेर शुक्रवारपासून जिल्ह्यातील वातावरणात बदल झाला असून, पावसाला सुरुवात झाली आहे़ शुक्रवारी जिल्हाभरात सर्वदूर पाऊस झाला़ शनिवारी सकाळपासूनच पावसाळी वातावरण होते़ परभणी शहर व परिसरात शनिवारी सूर्यदर्शन झाले नाही़ सकाळच्या सत्रात रिमझिम असणारा पाऊस दुपारी मात्र चांगलाच कोसळला़ दुपारी ३़३० वाजेपासून ते ५ वाजेपर्यंत मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला़ त्यामुळे शहरातील सखल भागात पाणी साचले होते़ अनेक दिवसानंतर रस्त्यावर पावसाचे पाणी वाहताना दिसून आले़ अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची मात्र धावपळ उडाली़शहरासह गंगाखेड तालुक्यात ४़१५ च्या सुमारास मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला़ पाथरी तालुक्यात दिवसभर रिमझिम सुरू होती़ दुपारी ४़३० वाजेच्या सुमारास अर्धा तास मध्यम स्वरुपाच्या पावसाने हजेरी लावली़ सोनपेठ, मानवत, पालम, पूर्णा तालुक्यांमध्ये पाऊस झाल्याने या तालुक्यांमधील पिकांना जीवदान मिळाले आहे़ साधारणत: दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर हा पाऊस झाला आहे़ १ जूनपासून ते आजपर्यंत होणाºया अपेक्षित पावसाच्या तुलनेत केवळ ५२ टक्के पाऊस झाला आहे़ आतापर्यंत सोनपेठ तालुक्यात सर्वाधिक ६३़९ टक्के तर मानवत तालुक्यात ६३़५ टक्के पावसाची नोंद झाली आहे़ जिल्ह्याची वार्षिक सरासरी ७७४ मिमी असून, आतापर्यंत सरासरी २१०़८२ मिमी पाऊस झाला आहे़ जिल्ह्यातील सर्वच प्रकल्प अजूनही कोरडेठाक आहेत़ त्यामुळे पाण्याची चिंता कायम आहे़पूर्णा तालुक्यात सर्वाधिक पाऊसशनिवारी सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी १९.७१ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. त्यात पूर्णा तालुक्यात सर्वाधिक २९.८० मि.मी., सेलू तालुक्यात २८.२० मि.मी., पाथरी २३.३३ मि.मी., मानवत तालुक्यात २५.३३ मि.मी., जिंतूर तालुक्यात २१.१७ मि.मी., परभणी १९.८८ मि.मी., सोनपेठ : १२ मि.मी., पालम १०.६७ मि.मी. आणि गंगाखेड तालुक्यात केवळ ७ मि.मी. पाऊस झाला आहे. परभणी जिल्ह्याची वार्षिक सरासरी ७७४.६२ मि.मी. असून, आतापर्यंत सरासरीच्या २०.९ टक्केच पाऊस जिल्ह्यात झाला आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीRainपाऊसFarmerशेतकरी