शहरं
Join us  
Trending Stories
1
हिमाचल प्रदेश: बिलासपूरमध्ये बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला, १५ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
3
भूस्खलन होऊन बसवर कोसळली दरड, १८ जणांचा मृत्यू, पण ३ मुलं आश्चर्यकारकरीत्या बचावली  
4
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
5
Bigg Bossचं घर सील, सर्व स्पर्धकांना लवकरच काढणार बाहेर, समोर आलं असं कारण 
6
ICC Womens World Cup 2025 : हेदर नाइटचा हिट शो! इंग्लंडनं बांगलादेशला पराभूत करत भारताला दिला धक्का
7
कस्तुरबा रुग्णालयातील पुस्तक वाटप प्रकरणाला वेगळं वळण, किशोरी पेडणेकरांचा तक्रारदारालाच प्रतिप्रश्न, म्हणाल्या...
8
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
9
अभिषेक शर्मा ICC पुरस्काराच्या शर्यतीत; त्याला कुलदीपसह झिम्बाब्वेचा गडी देणार टक्कर!
10
भर वर्गात महिलेसोबत आक्षेपार्ह चाळे करताना सापडला शिक्षक, मुलांनी रेकॉर्डे केला व्हिडीओ, कुठे घडली घटना
11
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
13
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
14
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
15
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
16
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
17
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
18
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
19
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
20
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण

परभणी : दमदार पावसाने जिल्ह्यातील पिकांना मिळाले जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2019 00:17 IST

दोन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर जिल्ह्यात दाखल झालेल्या पावसाने खरीप हंगामातील पिकांना जीवदान मिळाले आहे़ पाण्याअभावी माना टाकणारी पिके भीज पावसाने तरारली आहेत़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : दोन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर जिल्ह्यात दाखल झालेल्या पावसाने खरीप हंगामातील पिकांना जीवदान मिळाले आहे़ पाण्याअभावी माना टाकणारी पिके भीज पावसाने तरारली आहेत़यावर्षीच्या पावसाळ्यात सुरुवातीपासूनच पावसाने ताण देण्यास सुुरुवात केली़ जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पाऊस झाल्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी पेरणी उरकून घेतली़ कापूस, सोयाबीन, तूर, मूग, उडीद या पिकांची पेरणी झाली़ जिल्हाभरात पेरणीचे क्षेत्र १०० टक्क्यापर्यंत पोहचले नसले तरी ८४ ते ८५ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली असून, पावसाअभावी ही पिके कोमेजत असल्याची स्थिती निर्माण झाली होती़ त्यामुळे नागरिक पावसाची प्रतीक्षा करीत होते़ गावोगावी पावसासाठी देवाला साकडेही घालण्यात आले होते़अखेर शुक्रवारपासून जिल्ह्यातील वातावरणात बदल झाला असून, पावसाला सुरुवात झाली आहे़ शुक्रवारी जिल्हाभरात सर्वदूर पाऊस झाला़ शनिवारी सकाळपासूनच पावसाळी वातावरण होते़ परभणी शहर व परिसरात शनिवारी सूर्यदर्शन झाले नाही़ सकाळच्या सत्रात रिमझिम असणारा पाऊस दुपारी मात्र चांगलाच कोसळला़ दुपारी ३़३० वाजेपासून ते ५ वाजेपर्यंत मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला़ त्यामुळे शहरातील सखल भागात पाणी साचले होते़ अनेक दिवसानंतर रस्त्यावर पावसाचे पाणी वाहताना दिसून आले़ अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची मात्र धावपळ उडाली़शहरासह गंगाखेड तालुक्यात ४़१५ च्या सुमारास मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला़ पाथरी तालुक्यात दिवसभर रिमझिम सुरू होती़ दुपारी ४़३० वाजेच्या सुमारास अर्धा तास मध्यम स्वरुपाच्या पावसाने हजेरी लावली़ सोनपेठ, मानवत, पालम, पूर्णा तालुक्यांमध्ये पाऊस झाल्याने या तालुक्यांमधील पिकांना जीवदान मिळाले आहे़ साधारणत: दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर हा पाऊस झाला आहे़ १ जूनपासून ते आजपर्यंत होणाºया अपेक्षित पावसाच्या तुलनेत केवळ ५२ टक्के पाऊस झाला आहे़ आतापर्यंत सोनपेठ तालुक्यात सर्वाधिक ६३़९ टक्के तर मानवत तालुक्यात ६३़५ टक्के पावसाची नोंद झाली आहे़ जिल्ह्याची वार्षिक सरासरी ७७४ मिमी असून, आतापर्यंत सरासरी २१०़८२ मिमी पाऊस झाला आहे़ जिल्ह्यातील सर्वच प्रकल्प अजूनही कोरडेठाक आहेत़ त्यामुळे पाण्याची चिंता कायम आहे़पूर्णा तालुक्यात सर्वाधिक पाऊसशनिवारी सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी १९.७१ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. त्यात पूर्णा तालुक्यात सर्वाधिक २९.८० मि.मी., सेलू तालुक्यात २८.२० मि.मी., पाथरी २३.३३ मि.मी., मानवत तालुक्यात २५.३३ मि.मी., जिंतूर तालुक्यात २१.१७ मि.मी., परभणी १९.८८ मि.मी., सोनपेठ : १२ मि.मी., पालम १०.६७ मि.मी. आणि गंगाखेड तालुक्यात केवळ ७ मि.मी. पाऊस झाला आहे. परभणी जिल्ह्याची वार्षिक सरासरी ७७४.६२ मि.मी. असून, आतापर्यंत सरासरीच्या २०.९ टक्केच पाऊस जिल्ह्यात झाला आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीRainपाऊसFarmerशेतकरी