शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
4
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
5
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
6
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
7
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
8
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
9
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
10
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
11
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
12
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
13
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
14
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
15
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
16
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
17
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
18
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
19
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
20
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य

परभणी : जिंतूरमध्ये प्लास्टिक बंदीला प्रशासनाचा खो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2018 12:05 AM

शासनाने बंदी घातलेल्या प्लास्टिकचे साहित्य बाजारपेठेत सहज उपलब्ध होत असून, उलट बंदीनंतर साहित्याची विक्री बंदीच्या नावावर चढ्या दराने होत आहे़ प्रशासनाच्या प्लास्टिक मुक्तीचा निर्णय शहरामध्ये सध्या तरी फुसका बार ठरल्याचे दिसून येत आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कजिंतूर (परभणी) : शासनाने बंदी घातलेल्या प्लास्टिकचे साहित्य बाजारपेठेत सहज उपलब्ध होत असून, उलट बंदीनंतर साहित्याची विक्री बंदीच्या नावावर चढ्या दराने होत आहे़ प्रशासनाच्या प्लास्टिक मुक्तीचा निर्णय शहरामध्ये सध्या तरी फुसका बार ठरल्याचे दिसून येत आहे़महाराष्ट्र शासनाने वर्षभरापूर्वी प्लास्टिकच्या वस्तुवर बंदी घातली होती़ कॅरीबॅग, पाणी पाऊच, प्लास्टिक ग्लास, द्रोण तसेच इतर प्लास्टिक वस्तू वापरू नयेत, असे आदेश असतानाही या वस्तुंची जिंतूर शहरासह तालुक्यात सर्रास विक्री होत असताना बाजारपेठेत दिसून येत आहे़ प्लास्टिक बंदीची घोषणा झाल्यानंतर बाजारपेठेत खळबळ उडाली होती़ प्रशासनाने तीन महिन्यांची सलवत दिली़ मात्र बंदीचा फारसा परिणाम जाणवला नाही़ ५१ मायक्रॉनपेक्षा कमी मॉयक्रॉनचे प्लास्टिक वापरावे, असे आदेश असतानाही या आदेशाचे खुलेआम उल्लंघन होत आहे़ बाजारपेठेतील ७५ टक्के व्यापारी आजही ग्राहकांना कॅरीबॅग उपलब्ध करून देत आहेत़विशेष म्हणजे ग्राहकसुद्धा कॅरीबॅगशिवाय माल घेण्यास तयार नाहीत़ परिणामी बंदीची पर्वा न करता व्यापारी ग्राहकांना कॅरीबॅग उपलब्ध करून देत आहेत़ शिवाय प्लास्टिक ग्लास, द्रोण, पाणी पाऊच व इतर साहित्यांना वापरावयाचे प्लास्टिक सहजपणे उपलब्ध होत असल्याने प्लास्टिक बंदी नसल्याचेच चित्र जिंतूर शहरात दिसून येत आहे़ रस्त्याच्या दुतर्फा पडलेले प्लास्टिकचे साहित्य, कॅरीबॅग, प्लास्टिक ग्लास हे बंदी नसल्याचेच द्योतक आहे़ एकीकडे पर्यावरण वाचवा म्हणणारे कॅरीबॅग व प्लास्टिक मुक्तीचा संदेश देत असताना म्हणावा तसा प्रतिसाद व्यापारी, प्रशासन व नागरिकांकडून मिळत नाही, नव्हे तर त्यांची मानसिकताही नसल्याचे दिसून येते़ परिणामी शासनाचा कितीही चांगला निर्णय असला तरी लोकजागृती व प्रशासनाचा उदासिनपणा यामुळे हा निर्णय कागदावरच राहत आहे़रात्रीच्या वेळी होते वाहतूकप्लास्टिक बंदीचा कोणताही धाक न ठेवता कॅरीबॅग, प्लास्टिक ग्लासची रात्रीच्या वेळी वाहनातून सहजपणे वाहतूक केली जाते़ विशेष म्हणजे जालना व नांदेड येथून सर्वाधिक माल शहरात दाखल होतो़ प्लास्टिक बंदीच्या नावावर मोठी भाववाढही झाल्याचे बोलले जात आहे़पर्यावरणाच्या दृष्टीने प्लास्टिकचा वापर बंद होणे गरजेचे आहे़ प्लास्टिकमुळे कॅन्सरसारख्या आजाराचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे़ प्रशासनाने कठोर पावले उचलून कार्यवाही केली तर त्याचा परिणाम होवू शकतो़ शिवाय जनजागृती होणेही गरजेचे आहे़-अ‍ॅड़ मनोज सारडा, पर्यावरणप्रेमी

टॅग्स :parabhaniपरभणीPlastic banप्लॅस्टिक बंदी