शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

परभणी : आंतर जिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना परत जाता येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2018 00:11 IST

आंतर जिल्हा बदलीनंतर समाधानकारक ठिकाण न मिळाल्याने रुजू झाले नसलेल्या जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना ते ज्या जिल्ह्यातून आले, त्या जिल्ह्यात त्यांना परत जाण्याची संधी शिक्षण विभागाने दिली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : आंतर जिल्हा बदलीनंतर समाधानकारक ठिकाण न मिळाल्याने रुजू झाले नसलेल्या जिल्हा परिषदेच्याशिक्षकांना ते ज्या जिल्ह्यातून आले, त्या जिल्ह्यात त्यांना परत जाण्याची संधी शिक्षण विभागाने दिली आहे़या संदर्भात राज्याच्या ग्रामीण विकास विभागाचे अव्वर सचिव पी़एस़ कांबळे यांच्या स्वाक्षरीने नुकताच एक आदेश काढण्यात आला आहे़ त्यात म्हटले आहे की, २०१७ व २०१८ या वर्षामध्ये राज्यातील ८ हजार ५०० शिक्षकांच्या आंतर जिल्हा बदल्या करण्यात आल्या आहेत़ काही शिक्षकांनी त्यांच्या इच्छेनुसार बदली होवूनही कौटुंबिक अडचणी तसेच जोडीदाराची त्यांच्यासोबत बदली न झाल्याने व अन्य कारणामुळे बदली रद्द करण्याची मागणी केली आहे़ त्यामुळे त्यांना त्यांच्या मूळ जिल्ह्यात जाण्याची परवानगी देण्यात आली आहे़ यासाठी काही अटी घालून देण्यात आल्या आहेत़ त्यामध्ये संबंधितांना अद्याप कार्यमुक्त केले नसल्यास त्यांना त्याच जिल्हा परिषदेमध्ये ठेवण्यात यावे, त्यांची बदली रद्द झाल्याचे आदेश संबंधित सीईओंनी काढावेत, संबंधितांना कार्यमुक्त केले असल्यास व त्यांना बदली नको असल्यास त्यांना ज्या जिल्हा परिषदेमध्ये परत जायचे आहे, तेथे संबंधित शिक्षक धारण करीत असलेल्या प्रवर्गात पद रिक्त असणे आवश्यक आहे़ संबंधित शिक्षकाने आंतर जिल्हा बदली रद्द केल्यानंतर पुढील पाच वर्षे त्यांना आंतर जिल्हा बदली मागण्याचा अधिकार राहणार नाही, या शिक्षकांना पुन्हा त्यांच्या मुळ जिल्ह्यात परत पाठविल्यास त्यांची सेवा ज्येष्ठता बाधित होणार नाही, असेही या संदर्भातील आदेशात नमूद करण्यात आले आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीTeacherशिक्षकTransferबदलीzpजिल्हा परिषद