शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
5
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
8
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
9
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
10
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
11
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
12
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
13
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
14
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
15
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
16
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
17
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
18
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
19
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
20
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान

परभणी : आंतर जिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना परत जाता येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2018 00:11 IST

आंतर जिल्हा बदलीनंतर समाधानकारक ठिकाण न मिळाल्याने रुजू झाले नसलेल्या जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना ते ज्या जिल्ह्यातून आले, त्या जिल्ह्यात त्यांना परत जाण्याची संधी शिक्षण विभागाने दिली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : आंतर जिल्हा बदलीनंतर समाधानकारक ठिकाण न मिळाल्याने रुजू झाले नसलेल्या जिल्हा परिषदेच्याशिक्षकांना ते ज्या जिल्ह्यातून आले, त्या जिल्ह्यात त्यांना परत जाण्याची संधी शिक्षण विभागाने दिली आहे़या संदर्भात राज्याच्या ग्रामीण विकास विभागाचे अव्वर सचिव पी़एस़ कांबळे यांच्या स्वाक्षरीने नुकताच एक आदेश काढण्यात आला आहे़ त्यात म्हटले आहे की, २०१७ व २०१८ या वर्षामध्ये राज्यातील ८ हजार ५०० शिक्षकांच्या आंतर जिल्हा बदल्या करण्यात आल्या आहेत़ काही शिक्षकांनी त्यांच्या इच्छेनुसार बदली होवूनही कौटुंबिक अडचणी तसेच जोडीदाराची त्यांच्यासोबत बदली न झाल्याने व अन्य कारणामुळे बदली रद्द करण्याची मागणी केली आहे़ त्यामुळे त्यांना त्यांच्या मूळ जिल्ह्यात जाण्याची परवानगी देण्यात आली आहे़ यासाठी काही अटी घालून देण्यात आल्या आहेत़ त्यामध्ये संबंधितांना अद्याप कार्यमुक्त केले नसल्यास त्यांना त्याच जिल्हा परिषदेमध्ये ठेवण्यात यावे, त्यांची बदली रद्द झाल्याचे आदेश संबंधित सीईओंनी काढावेत, संबंधितांना कार्यमुक्त केले असल्यास व त्यांना बदली नको असल्यास त्यांना ज्या जिल्हा परिषदेमध्ये परत जायचे आहे, तेथे संबंधित शिक्षक धारण करीत असलेल्या प्रवर्गात पद रिक्त असणे आवश्यक आहे़ संबंधित शिक्षकाने आंतर जिल्हा बदली रद्द केल्यानंतर पुढील पाच वर्षे त्यांना आंतर जिल्हा बदली मागण्याचा अधिकार राहणार नाही, या शिक्षकांना पुन्हा त्यांच्या मुळ जिल्ह्यात परत पाठविल्यास त्यांची सेवा ज्येष्ठता बाधित होणार नाही, असेही या संदर्भातील आदेशात नमूद करण्यात आले आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीTeacherशिक्षकTransferबदलीzpजिल्हा परिषद