शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

परभणी : आंतर जिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना परत जाता येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2018 00:11 IST

आंतर जिल्हा बदलीनंतर समाधानकारक ठिकाण न मिळाल्याने रुजू झाले नसलेल्या जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना ते ज्या जिल्ह्यातून आले, त्या जिल्ह्यात त्यांना परत जाण्याची संधी शिक्षण विभागाने दिली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : आंतर जिल्हा बदलीनंतर समाधानकारक ठिकाण न मिळाल्याने रुजू झाले नसलेल्या जिल्हा परिषदेच्याशिक्षकांना ते ज्या जिल्ह्यातून आले, त्या जिल्ह्यात त्यांना परत जाण्याची संधी शिक्षण विभागाने दिली आहे़या संदर्भात राज्याच्या ग्रामीण विकास विभागाचे अव्वर सचिव पी़एस़ कांबळे यांच्या स्वाक्षरीने नुकताच एक आदेश काढण्यात आला आहे़ त्यात म्हटले आहे की, २०१७ व २०१८ या वर्षामध्ये राज्यातील ८ हजार ५०० शिक्षकांच्या आंतर जिल्हा बदल्या करण्यात आल्या आहेत़ काही शिक्षकांनी त्यांच्या इच्छेनुसार बदली होवूनही कौटुंबिक अडचणी तसेच जोडीदाराची त्यांच्यासोबत बदली न झाल्याने व अन्य कारणामुळे बदली रद्द करण्याची मागणी केली आहे़ त्यामुळे त्यांना त्यांच्या मूळ जिल्ह्यात जाण्याची परवानगी देण्यात आली आहे़ यासाठी काही अटी घालून देण्यात आल्या आहेत़ त्यामध्ये संबंधितांना अद्याप कार्यमुक्त केले नसल्यास त्यांना त्याच जिल्हा परिषदेमध्ये ठेवण्यात यावे, त्यांची बदली रद्द झाल्याचे आदेश संबंधित सीईओंनी काढावेत, संबंधितांना कार्यमुक्त केले असल्यास व त्यांना बदली नको असल्यास त्यांना ज्या जिल्हा परिषदेमध्ये परत जायचे आहे, तेथे संबंधित शिक्षक धारण करीत असलेल्या प्रवर्गात पद रिक्त असणे आवश्यक आहे़ संबंधित शिक्षकाने आंतर जिल्हा बदली रद्द केल्यानंतर पुढील पाच वर्षे त्यांना आंतर जिल्हा बदली मागण्याचा अधिकार राहणार नाही, या शिक्षकांना पुन्हा त्यांच्या मुळ जिल्ह्यात परत पाठविल्यास त्यांची सेवा ज्येष्ठता बाधित होणार नाही, असेही या संदर्भातील आदेशात नमूद करण्यात आले आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीTeacherशिक्षकTransferबदलीzpजिल्हा परिषद