शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

परभणी: जिंतूर येथील गोदामात धान्य घोटाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 00:06 IST

जिंतूरसह बोरी येथील शासकीय धान्य गोदामात ४ लाख १२ हजार रुपयांच्या धान्याचा अपहार झाल्याचे प्रकरण पुढे आले असून या प्रकरणी दोषी आढळलेल्या तहसीलदार, नायब तहसीलदार आणि गोदामपालाकडून रक्कम वसूल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांनी दिले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कजिंतूर (परभणी) : जिंतूरसह बोरी येथील शासकीय धान्य गोदामात ४ लाख १२ हजार रुपयांच्या धान्याचा अपहार झाल्याचे प्रकरण पुढे आले असून या प्रकरणी दोषी आढळलेल्या तहसीलदार, नायब तहसीलदार आणि गोदामपालाकडून रक्कम वसूल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांनी दिले आहेत.उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांनी ३१ जानेवारी रोजी जिंतूर येथील शासकीय धान्य गोदामाची तपासणी केली होती. रॅडम पद्धतीने तांदळाचे १५ आणि गव्हाणे २० पोते तपासण्यात आले. यामध्ये प्रति क्विंटल १६२० ग्रॅम तांदुळ आणि ११३० ग्रॅम गहू कमी भरला. तपासणीच्या वेळी या गोदामात २६६६ क्विंटल तांदुळ आणि ४३०९ क्विंटल गहू होता. त्यात १ लाख ४२ हजार ९६९ रुपये किंमतीचे ४३ क्विंटल तांदुळ आणि १ लाख २१ हजार ५३५ रुपयांचे ४९ क्विंटल गहू कमी असल्याचे निष्पन्न झाले. तसा अहवाल पारधी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला होता. त्यानंतर २९ मार्च रोजी जिंतूर गोदामातील २ लाख ६४ हजार ५१४ रुपयांच्या अपहाराची प्रत्येकी ८८ हजार १७१ रुपये वसुली तहसीलदार सुरेश शेजूळ, पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार रामदास बोटे व गोदामपाल सोमनाथ काळे यांच्याकडून करण्याचे आदेश दिले आहेत. या गोदामाबरोबरच पारधी यांनी बोरी येथील शासकीय गोदामाचीही तपासणी केली होती. त्या ठिकणाी प्रति क्विंटल ११६० ग्रॅम तांदुळ आणि १२०० ग्रॅम गहू कमी भरला. तपासणीच्या वेळी गोदामात ८०१ क्विंटल तांदुळ आणि २ हजार ९७८ क्विंटल गहू उपलब्ध होते. त्यात ९ क्विंटल २९ किलो तांदुळ आणि ४७ क्विंटल ७४ किलो गहू कमी भरल्याचे निष्पन्न झाले.१ लाख ४७ हजार ५६० रुपये एवढी या धान्याची किंमत होते. दोन्ही गोदामात मिळून ४ लाख १२ हजार २२१ रुपयांचा अपहार झाल्याचे स्पष्ट झाले असून तहसीलदार सुरेश शेजूळ , नायब तहसीलदार रामदास बोटे व गोदामपाल सोमनाथ काळे यांच्याकडून प्रत्येकी १ लाख ३७ हजार ४०७ रुपये वसूल करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.केवळ रक्कम वसुलीचीच कारवाई४जिंतूर येथील शासकीय गोदामात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले होते. त्यानंतर उपविभागीय अधिकाऱ्यांनी गोदामाची तपासणी केली. त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला. मात्र या प्रकरणी गैरप्रकार करणाºयांविरुद्ध कठोर कारवाई करण्याऐवजी केवळ आर्थिक वसुली करुन संबंधितांना क्लीनचीट देण्याचा प्रशासनाचा निर्णय अफरातफर करणाºयांसाठी सोयीचा ठरत आहे. यापूर्वीही शासकीय गोदामात अनेक घोटाळे झाले; परंतु, प्रशासनाने गैरव्यवहार करणाºयांनाच पाठिशी घातल्याने घोटाळेबाज पुन्हा डोके वर काढत असल्याचे दिसत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीTahasildarतहसीलदारcollectorजिल्हाधिकारी