शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

परभणी : पाणी, स्वच्छतेच्या प्रश्नावर गाजली सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2018 00:08 IST

जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीचा परिणाम मनपाच्या स्थायी समितीच्या बैठकीतही दिसून आला़ शनिवारी पार पडलेल्या बैठकीत पाणी प्रश्नाबरोबरच स्वच्छतेच्या प्रश्नावर नगरसेवकांनी प्रश्न उपस्थित करून पाणी पुरवठ्याची तरतूद करण्याची मागणी केली़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीचा परिणाम मनपाच्या स्थायी समितीच्या बैठकीतही दिसून आला़ शनिवारी पार पडलेल्या बैठकीत पाणी प्रश्नाबरोबरच स्वच्छतेच्या प्रश्नावर नगरसेवकांनी प्रश्न उपस्थित करून पाणी पुरवठ्याची तरतूद करण्याची मागणी केली़येथील बी़ रघुनाथ सभागृहात ३ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता स्थायी समितीचे सभापती सुनील देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली सभेला प्रारंभ झाला़ यावेळी आयुक्त रमेख पवार, प्रभारी नगरसचिव विकास रत्नपारखे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती़ प्रारंभी निलाबाई भास्करराव देशमुख, कवि जरताज हाश्मी, मनपाचे कर्मचारी के़बी़ हैबत्ते यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली़ नगरसेविका स़समरीन बेगम फारुख यांनी प्रभाग क्रमांक १६ मधील पाणीटंचाईचा प्रश्न उपस्थित केला़ या प्रभागात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून, टँकर सुरू करण्याची मागणी त्यांनी केली़ वारंवार मागणी करूनही टँकर सुरू होत नसल्याने नागरिकांना टंचाईला सामोरे जावे लागत आहे, असे त्यांनी सांगितले़ त्यावर सभापती सुनील देशमुख यांनी पाण्याचे टँकर सुरू केले जाईल, असे आश्वासन दिले़नगरसेविका डॉ़ विद्या पाटील यांनीही खानापूर, सिद्धीविनायकनगर, आरोग्य कॉलनी, मातोश्रीनगर, विश्वजीवन सोसायटी, क्रांतीनगर या भागात जलवाहिनी नसल्याने पाणीटंचाई निर्माण झाली आहे़ तेव्हा टँकर सुरू करण्याची मागणी पाटील यांनी केली़ त्यामुळे सभेत पाणीप्रश्न चांगलाच गाजला़ तसेच स्वच्छतेच्या प्रश्नावरही नगरसेवकांनी प्रश्न उपस्थित केले़ प्रभाग क्रमांक १५ मध्ये नियमित साफसफाई होत नाही, असे नगरसेविका पाटील यांनी सांगितले तर नगरसेवक एस़एम़ अली पाशा, गुलमीर खान, नाजनीन शेख शकील यांनीही नियमित स्वच्छता होत नसल्याचे सभागृहासमोर सांगितले़ नगरसेवक इम्रान हुसैनी यांनी आॅगस्टमध्ये प्रभागातील स्वच्छतेसाठी जेसीबीची मागणी केली होती़ अद्यापपर्यंत जेसीबी मिळाला नाही़ एवढे दुर्लक्ष का? असा सवाल केला असता अधिकारी निरुत्तर झाले़ शौचालयांच्या झालेल्या दुरवस्थेविषयी नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली़ त्यावर सार्वजनिक शौचालय स्वच्छ ठेवा आणि त्याचा दररोज अहवाल द्यावा, अशा सूचना आयुक्तांनी दिल्या़ या सभेत शहरी आरोग्य अभियानांतर्गत शंकरनगर येथील स्थलांतरित व धाररोडवरील प्रस्तावित नागरी आरोग्य केंद्राच्या बांधकामास परवानगी देण्यात आली़ महापालिकेसाठी विधी अधिकारी म्हणून वकिलाची नियुक्ती करण्याचा ठरावही मंजूर करण्यात आला़ सभेमध्ये नगरसेवक इम्रान लाला, एस़एम़ अली पाशा, गुलमीर खान, गणेश देशमुख, आदींनी चर्चेत सहभाग नोंदविला़परभणीतील सर्व मोबाईल टॉवर अनधिकृत४शहरातील मोबाईल टॉवरचा विषय या सभेत चर्चेत आला़ मोबाईल टॉवर संदर्भात खाजगी एजन्सीमार्फत सर्वेक्षण करण्याच्या ठरावावर चर्चा झाली़ यावर शहरात एकूण टॉवर किती आहेत आणि महापालिकेला टॉवरच्या माध्यमातून किती उत्पन्न मिळते, असा प्रश्न सदस्यांनी उपस्थित केला़ त्यावर मनपाचे सहाय्यक आयुक्त अल्केश देशमुख यांनी शहरातील टॉवरची माहिती दिली़ शहरात एकूण ११५ मोबाईल टॉवर आहेत़ त्यातील साधारणत: ९ टॉवर बंद असून, उर्वरित सर्वच्या सर्व टॉवर अनधिकृत असल्याचे त्यांनी सांगितले़ या टॉवरधारकांकडून प्रत्येक वर्षी ३० हजार रुपयांच्या वसुलीची मागणी महापालिका करीत आहे़ टॉवरच्या सर्वेक्षण आणि वसुलीसाठी एजन्सी नेमण्याचा ठराव आहे़ मनपाला अपेक्षित उत्पन्नापेक्षा अधिक उत्पन्न एजन्सीकडून मिळाले तर एजन्सीची नियुक्ती करण्यासंदर्भातही चर्चा झाली़ विशेषत: एका टॉवर विविध पाच ते सहा कंपन्यांचे कामकाज चालते़ त्यामुळे एजन्सीमार्फत सर्वे करून घ्यावा, असे नगरसेवक इम्रान हुसेन यांनी सांगितले़ या ठरावावर पुढील बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे़नगरसेविकेचे आंदोलनप्रभाग क्रमांक १६ मधील नगरसेविका समरीन बेगम स़ फारूख यांनी त्यांच्या प्रभागात टँकर सुरू करण्याच्या मागणीसाठी खाली बसून आंदोलन केले़ साखला प्लॉट भागात जलवाहिनी नसल्याने पाण्याचा प्रश्न निर्माण झाला असून, वारंवार मागणी करूनही टँकर मिळत नसल्याने त्यांनी हे आंदोलन केले़ त्याचप्रमाणे उड्डाणपुलाच्या परिसरात गायरान जमिनीवर असलेले अतिक्रमण आदेश देऊनही काढले नाही़ तसेच गंगाखेड नाक्यावरील पेट्रोल पंपधारकाने केलेले अतिक्रमणही काढण्यात आले नाही़ या तिन्ही प्रश्नावर समरीन बेगम यांनी हे आंदोलन केले़ त्यावर सभापती सुनील देशमुख व आयुक्त रमेश पवार यांनी आश्वासन दिल्यानंतर अर्ध्या तासाने आंदोलन मागे घेण्यात आले़

टॅग्स :parabhaniपरभणीParbhani Municipal Corporationपरभणी महानगरपालिकाWaterपाणी