शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसेची ताकद मुंबईत जास्त; राज ठाकरेंच्या दाव्यावर CM फडणवीसांनी आकेडवारीच दिली
2
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
3
ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून आली...! अ‍ॅप्पल, टेस्लानंतर या कंपनीची भारतात एन्ट्री, बिग टेकने घोषणा केली...
4
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
5
राहुल गांधींवर खोटी साक्ष दिल्याचा आरोप, सावरकरांच्या पणतूने  कोर्टात दिलेल्या अर्जाने अडचणी वाढणार? 
6
गोकुळाष्टमीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status ला शेअर करा;कृष्ण भक्तांना द्या हार्दिक शुभेच्छा!
7
सचिन तेंडुलकरहून ५ वर्षांनी मोठी अंजली; आता अर्जुनची होणारी पत्नीही मोठीच...किती आहे अंतर?
8
बाजारात संमिश्र कल! विप्रो-इन्फोसिस वधारले; पण, टाटासह 'या' स्टॉक्समध्ये मोठी घसरण
9
मतदार यादीतून काढलेल्या ६५ लाख लोकांची नावे सार्वजनिक करा; SC चे निवडणूक आयोगाला निर्देश
10
Rapido देणार Zomato, Swiggy ला टक्कर, पोहोचवणार जेवण; काय आहे कंपनीचा प्लान?
11
'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लान सांगितला
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मुळे कंपनीची चांदी! शेअरमध्ये १०% वाढ, ३ महिन्यात ६२ टक्के परतावा
13
ट्रम्प यांनी डेड इकॉनॉमी म्हटलेलं, आता अमेरिकेच्याच एजन्सीनं भारताचं रेटिंग केलं अपग्रेड
14
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
15
'लव्ह अँड वॉर', 'अल्फा'च नाही तर आलिया भट आणखी एका सिनेमाच्या तयारित, वाचा सविस्तर
16
गोकुळाष्टमी स्पेशल: गोकुळाष्टमीला करा सात्त्विक चवीचा पंचामृत केक; घरचे बालगोपाळ होतील खुश
17
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
18
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
19
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
20
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...

परभणी : पाच लाख शेतकऱ्यांनी भरला पीक विमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 00:37 IST

प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ५ लाख २५ हजार ४८४ शेतकºयांनी यावर्षीच्या खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, मूग, उडीद आदी पिकांचा विमा इफ्को टोकियो विमा कंपनीकडे ३१ जुलैपर्यंत भरला आहे. जिल्हाबंद, सर्व्हर डाऊन आदी कारणांनी जिल्ह्यातील अनेक शेतकरी पीक विमा भरण्यापासून वंचित राहिल्याचे दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी: प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ५ लाख २५ हजार ४८४ शेतकºयांनी यावर्षीच्या खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, मूग, उडीद आदी पिकांचा विमा इफ्को टोकियो विमा कंपनीकडे ३१ जुलैपर्यंत भरला आहे. जिल्हाबंद, सर्व्हर डाऊन आदी कारणांनी जिल्ह्यातील अनेक शेतकरीपीक विमा भरण्यापासून वंचित राहिल्याचे दिसून येत आहे.जिल्ह्यातील शेतकºयांची भिस्त ही खरीप हंगामातील पिकांवर अवलंबून असते; परंतु, गेल्या चार वर्षापासून सुलतानी व अस्मानी संकटामुळे शेतकºयांनी खरीप हंगामात पेरणी व लागवड केलेल्या पिकावर केलेला खर्चही उत्पन्नातून निघत नाही.शेतकºयांना आर्थिक बळ देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१५ मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना अंमलात आणली. या योजनेंतर्गत पिकांच्या नुकसानीपोटी शेतकºयांना नुकसान भरपाई दिली जाते.२०१६ मध्ये जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच ४२९ कोटी रुपयांच्या पीक विम्याची रक्कम प्राप्त झाली होती. त्यामुळे नैसर्गिक संकटाने शेतकºयांची पिके हिरावून नेली असली तरी विमा कंपनीने केलेल्या मदतीमुळे अनेक शेतकºयांना आर्थिक पाठबळ मिळाले; परंतु, २०१७ मध्ये रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीने शेतकºयांच्या पिकांचे नुकसान होऊनही मदत नाकारली. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकºयांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत होता. त्यानंतर राज्य शासनाने याची दखल घेऊन रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीकडून जिल्ह्याचे काम काढून २०१८ वर्षासाठी या खरीप हंगामातील पिकांचा विमा उतरविण्यासाठी इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनीकडे देण्यात आला. त्यासाठी १ ते ३१ जुलै अशी मुदत देण्यात आली. अखेरच्या दिवशी मंगळवारपर्यंत जिल्ह्यातील ५ लाख २५ हजार ४८४ शेतकºयांनी आपल्या पिकाचा विमा उतरविला आहे. दरम्यान, जिल्हाबंद, सर्व्हर डाऊन या तांत्रिक कारणामुळे जिल्ह्यातील अनेक शेतकरी विमा कंपनीने दिलेल्या मुदतीत आपले प्रस्ताव दाखल करु शकले नाहीत. त्यामुळे विमा कंपनीने किमान ८ आॅगस्टपर्यंत विमा प्रस्ताव सादर करण्यासाठी मुदत द्यावी, अशी मागणी जिल्ह्यातील शेतकºयांमधून होत आहे.सीएससी केंद्रांचा पुढाकारप्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत यावर्षीपासून आॅनलाईन अर्ज दाखल करण्याचे आवाहन विमा कंपनीने केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत आतापर्यंत ५ लाख २५ हजार ४८४ शेतकºयांनी विमा प्रस्ताव दाखल केले आहेत. सीएससी केंद्रांनी ४ लाख ६८ हजार ५४७ शेतकºयांचा २१ कोटी २२ लाख ४४ हजार ८५५ रुपयांचा पीक विमा भरुन घेतला आहे. त्या पाठोपाठ जिल्ह्यातील बँकांनी ४४ हजार ४९५ शेतकºयांचा २ कोटी ९४ लाख ४८ हजार ४४३ रुपयांचा पीक विमा भरुन घेतला आहे. तर १२ हजार ४४२ शेतकºयांनी डिजीटल यंत्रणेचा वापर करुन ६५ लाख ८४ हजार ७३१ रुपयांचा विमा भरला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सीएसीसी केंद्रांनी पीक विमा प्रस्ताव स्वीकारण्यास पुढाकार घेतल्याचे वरील आकडेवारीवरुन दिसून येत आहे.मंगळवारी शेतकºयांनी केली गर्दीजिल्ह्यातील पीक विम्याचे काम पाहणाºया इफ्को टोकियो या कंपनीने ३१ जुलै ही विमा प्रस्ताव सादर करण्यास मुदत दिली होती. गेल्या काही दिवसांपासून कापूस पिकावर विविध अळ्यांनी हल्ला चढविला आहे. त्यामुळे शेवटच्या दिवशीच म्हणजे मंगळवारी अनेक शेतकºयांनी अळ्यांची धास्ती घेऊन कापूस पिकाचा पीक विमा उतरविण्यासाठी सीएसी केंद्र, बँक व डिजीटल यंत्रणेकडे गर्दी केल्याचे दिसून आले.

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीCrop Insuranceपीक विमा