शहरं
Join us  
Trending Stories
1
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
2
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
3
ठाकरे-शिंदेंनी प्रयत्न केले, पण अखेर काँग्रेसमध्ये गेले; प्रशांत जगताप यांची राजकीय कारकीर्द
4
भाजपानं 'या' राज्यात इतिहास रचला, पहिल्यांदाच पक्षाचा महापौर बनला; विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठा संकेत
5
"आम्हाला मुलांमध्ये अजिबात रस नाही"; २ मैत्रिणी एकमेकींच्या प्रेमात झाल्या वेड्या, बांधली लग्नगाठ
6
Swami Samartha: आपल्यावर सद्गुरू कृपा आहे की नाही हे ओळखण्याचा सोपा मार्ग जाणून घ्या
7
५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर 'हा' शेअर; आज जोरदार तेजी, चांदीतील तेजी ठरतेय कारण
8
जयंत पाटील 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंच्या भेटीला; मुंबईत NCP शरद पवार गट ठाकरे बंधूंसोबत येणार?
9
"हॉस्पिटलनेच माझ्या पतीला मारलं, मला म्हणाले..."; पत्नीने सांगितली काळजात चर्र करणारी गोष्ट
10
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, मुंबईत जागावाटपाचा तिढा सुटला; भाजपा-शिंदेसेना किती जागा लढणार?
11
२ देशांसोबत मिळून चीननं शेजारील देशात चढवला जोरदार हल्ला, ४५४ इमारती उद्ध्वस्त; शेकडो अटकेत
12
नोकरी गेली तरी आर्थिक चक्र थांबू नका! संकटकाळात EMI आणि SIP चे व्यवस्थापन कसे कराल? तज्ज्ञांचा सल्ला
13
मोहम्मद युनूस यांचा तो एक निर्णय, ज्यामुळे बांगलादेश आज हिंसाचाराच्या आगीत होरपळतोय...
14
कोणती सरकारी बँक देतेय सर्वात स्वस्त पर्सनल लोन? कोणत्याही बँकेतून कर्ज घेण्यापूर्वी पाहा डिटेल्स
15
UPSC यशानंतर IPS अधिकारी बनली पूर्वा चौधरी, सौंदर्यासोबतच वादामुळे चर्चेत, जाणून घ्या प्रकरण
16
कोकण रेल्वेची प्रवाशांना मोठी भेट; मुंबईतून सुटणाऱ्या ‘या’ ट्रेनचे कोच कायमस्वरुपी वाढले
17
सोनं विक्रमी उच्चांकावर, चांदी एका झटक्यात १३११७ रुपयांनी उसळली! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
काँग्रेसची १२५हून अधिक तिकिटे फायनल; प्रदेश निवड समितीच्या बैठकीत १५ मिनिटांत आटोपली चर्चा
19
"२१ कोटींची मागणी आणि...", अक्षय खन्नाची 'दृश्यम ३' सिनेमातून एक्झिट, अखेर खरं कारण समोर
20
MS Dhoni Pension: बीसीसीआय महेंद्रसिंह धोनीला किती पेन्शन देते? जाणून घ्या!
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : पाच लाख शेतकऱ्यांनी भरला पीक विमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 00:37 IST

प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ५ लाख २५ हजार ४८४ शेतकºयांनी यावर्षीच्या खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, मूग, उडीद आदी पिकांचा विमा इफ्को टोकियो विमा कंपनीकडे ३१ जुलैपर्यंत भरला आहे. जिल्हाबंद, सर्व्हर डाऊन आदी कारणांनी जिल्ह्यातील अनेक शेतकरी पीक विमा भरण्यापासून वंचित राहिल्याचे दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी: प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ५ लाख २५ हजार ४८४ शेतकºयांनी यावर्षीच्या खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, मूग, उडीद आदी पिकांचा विमा इफ्को टोकियो विमा कंपनीकडे ३१ जुलैपर्यंत भरला आहे. जिल्हाबंद, सर्व्हर डाऊन आदी कारणांनी जिल्ह्यातील अनेक शेतकरीपीक विमा भरण्यापासून वंचित राहिल्याचे दिसून येत आहे.जिल्ह्यातील शेतकºयांची भिस्त ही खरीप हंगामातील पिकांवर अवलंबून असते; परंतु, गेल्या चार वर्षापासून सुलतानी व अस्मानी संकटामुळे शेतकºयांनी खरीप हंगामात पेरणी व लागवड केलेल्या पिकावर केलेला खर्चही उत्पन्नातून निघत नाही.शेतकºयांना आर्थिक बळ देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१५ मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना अंमलात आणली. या योजनेंतर्गत पिकांच्या नुकसानीपोटी शेतकºयांना नुकसान भरपाई दिली जाते.२०१६ मध्ये जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच ४२९ कोटी रुपयांच्या पीक विम्याची रक्कम प्राप्त झाली होती. त्यामुळे नैसर्गिक संकटाने शेतकºयांची पिके हिरावून नेली असली तरी विमा कंपनीने केलेल्या मदतीमुळे अनेक शेतकºयांना आर्थिक पाठबळ मिळाले; परंतु, २०१७ मध्ये रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीने शेतकºयांच्या पिकांचे नुकसान होऊनही मदत नाकारली. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकºयांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत होता. त्यानंतर राज्य शासनाने याची दखल घेऊन रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीकडून जिल्ह्याचे काम काढून २०१८ वर्षासाठी या खरीप हंगामातील पिकांचा विमा उतरविण्यासाठी इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनीकडे देण्यात आला. त्यासाठी १ ते ३१ जुलै अशी मुदत देण्यात आली. अखेरच्या दिवशी मंगळवारपर्यंत जिल्ह्यातील ५ लाख २५ हजार ४८४ शेतकºयांनी आपल्या पिकाचा विमा उतरविला आहे. दरम्यान, जिल्हाबंद, सर्व्हर डाऊन या तांत्रिक कारणामुळे जिल्ह्यातील अनेक शेतकरी विमा कंपनीने दिलेल्या मुदतीत आपले प्रस्ताव दाखल करु शकले नाहीत. त्यामुळे विमा कंपनीने किमान ८ आॅगस्टपर्यंत विमा प्रस्ताव सादर करण्यासाठी मुदत द्यावी, अशी मागणी जिल्ह्यातील शेतकºयांमधून होत आहे.सीएससी केंद्रांचा पुढाकारप्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत यावर्षीपासून आॅनलाईन अर्ज दाखल करण्याचे आवाहन विमा कंपनीने केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत आतापर्यंत ५ लाख २५ हजार ४८४ शेतकºयांनी विमा प्रस्ताव दाखल केले आहेत. सीएससी केंद्रांनी ४ लाख ६८ हजार ५४७ शेतकºयांचा २१ कोटी २२ लाख ४४ हजार ८५५ रुपयांचा पीक विमा भरुन घेतला आहे. त्या पाठोपाठ जिल्ह्यातील बँकांनी ४४ हजार ४९५ शेतकºयांचा २ कोटी ९४ लाख ४८ हजार ४४३ रुपयांचा पीक विमा भरुन घेतला आहे. तर १२ हजार ४४२ शेतकºयांनी डिजीटल यंत्रणेचा वापर करुन ६५ लाख ८४ हजार ७३१ रुपयांचा विमा भरला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सीएसीसी केंद्रांनी पीक विमा प्रस्ताव स्वीकारण्यास पुढाकार घेतल्याचे वरील आकडेवारीवरुन दिसून येत आहे.मंगळवारी शेतकºयांनी केली गर्दीजिल्ह्यातील पीक विम्याचे काम पाहणाºया इफ्को टोकियो या कंपनीने ३१ जुलै ही विमा प्रस्ताव सादर करण्यास मुदत दिली होती. गेल्या काही दिवसांपासून कापूस पिकावर विविध अळ्यांनी हल्ला चढविला आहे. त्यामुळे शेवटच्या दिवशीच म्हणजे मंगळवारी अनेक शेतकºयांनी अळ्यांची धास्ती घेऊन कापूस पिकाचा पीक विमा उतरविण्यासाठी सीएसी केंद्र, बँक व डिजीटल यंत्रणेकडे गर्दी केल्याचे दिसून आले.

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीCrop Insuranceपीक विमा