शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाची वाढली डोकेदुखी; मंत्रिपदाचा फॉर्म्युला बदलावा लागणार?
2
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
3
अमेरिकेत महागाईनं हाहाकार! ट्रम्प यांनी अनेक वस्तूंवरील टॅरिफ केलं कमी, स्वस्त होणार 'या' गोष्टी
4
Shubman Gill Injury Update : शुभमन गिलनं मैदान सोडलं! पंत झाला कॅप्टन, नेमकं काय घडलं?
5
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
6
लाल किल्ल्याजवळील स्फोटाने जमीन हादरली; मेट्रो स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज आले समोर
7
बिहारमध्ये सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते मिळवणारा RJD ठरला नंबर वन पक्ष; भाजपा-जेडीयूला किती मते?
8
कुणी २७, कुणी ९५ मतांनी, तर..., बिहारमधील या मतदारसंघांत माफक फरकाने झाला जय-पराजयाचा फैसला
9
'मारुती सुझुकी'च्या या कारमध्ये मोठा बिघाड, ३९ हजारांहून अधिक गाड्या परत मागवल्या
10
धक्कादायक...! मध्यरात्रीचा थरार...! पूर्वजांना मोक्ष मिळावा म्हणून आईनं पोटच्या २ चिमुकल्यांची केली हत्या, सासरे थोडक्यात बचावले
11
मुदतीपूर्वीच Gen Z कर्मचाऱ्यांना कंपनीतून का काढलं जातंय?; स्टडी रिपोर्टमधून समोर आलं कारण
12
धर्मेंद्र यांच्या ९० व्या वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन होणार! हेमा मालिनी म्हणाल्या- "आता प्रत्येक दिवस..."
13
New Fastag Rule: आजपासून फास्टॅगच्या नियमांत झाला मोठा बदल; याकडे लक्ष दिलं नाही तर भरावा लागेल दुप्पट टोल
14
"पैसे वाटून निवडणुका होत असतील आयोगाने विचार करावा"; बिहार निकालावर शरद पवारांचे गंभीर भाष्य
15
बिहार निकालानंतर काँग्रेसचा 'एकला चलो रे'चा नारा; मुंबई महापालिका स्वबळावर लढवण्याचे संकेत
16
Astro Tips: मनासारखा जोडीदार नशिबात आहे की नाही हे कसे ओळखावे? ज्योतिष शास्त्रानुसार... 
17
“भाजपाने आता अमेरिकेत राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवावी अन् टॅरिफचा घोळ संपवावा”: आदित्य ठाकरे
18
SBI चा ग्राहकांना झटका! १ डिसेंबरपासून बंद होणार 'ही' लोकप्रिय सेवा; बँकेच्या कामांवर होणार परिणाम
19
"विवाहित मुलांना वडिलांच्या मालमत्तेत राहण्याचा कोणताही अधिकार नाही"; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
20
Rishabh Pant Record : टेस्टमध्ये टी-२० चा तडका! सेहवागचा १२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडत पंतनं रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : अखेर गाढवांचा केला लिलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 00:20 IST

वाळूची वाहतूक करणाऱ्या गाढवांना महसूल प्रशासनाने पकडल्यानंतर या गाढवांचे मालक समोर न आल्याने २१ डिसेंबर रोजी या गाढवांचा लिलाव करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड (परभणी) : वाळूची वाहतूक करणाऱ्या गाढवांना महसूल प्रशासनाने पकडल्यानंतर या गाढवांचे मालक समोर न आल्याने २१ डिसेंबर रोजी या गाढवांचा लिलाव करण्यात आला.गंगाखेड शहराजवळून वाहणाºया गोदावरी नदीपात्रातून विना परवाना वाळुचा उपसा करून त्याची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेल्या २६ गाढवांना तहसीलदार स्वरुप कंकाळ यांच्या पथकाने ११ डिसेंबर रोजी ताब्यात घेतले होते. यावेळी गाढवांचे मालक मात्र फरार झाले. त्यामुळे या सर्व गाढवांना धारखेड ग्रामपंचायतीच्या आवारात बांधून ठेवण्यात आले. यातील एक गाढव कारवाईच्या दिवशीच दगावले. गाढवांना पकडून दहा दिवसांंचा काळ उलटला तरी या गाढवांवर मालकी हक्क दाखविणारे गाढवांचे मालक अथवा इतर कोणीही समोर आले नाही. शेवटी २१ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता नायब तहसीलदार किरण नारखेडे, मंडळ अधिकारी शंकर राठोड, तलाठी शिवाजी मुरकुटे, लिपिक सुरेश डिलोड, सरपंच यशोदा चोरघडे, ग्रामसेवक ज्ञानोबा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत गाढवांचा लिलाव करण्यात आला. या लिलावात आठ जणांनी सहभाग घेतला. मात्र प्रति गाढव ५०० रुपये या प्रमाणे केवळ तिघांनीच पैसे भरल्याने उर्वरित पाच जणांना बोली लावता आली नाही. महसूल प्रशासन पकडलेल्या गाढवांचे मालक समोर आले असते तर त्यांना समज देऊन, दंड आकारून वाळू तस्करीला आळा घालता आला असता; परंतु, गाढवांचे मालक समोर आले नाहीत. त्यामुळे वाळू वाहतुकीसाठी गाढवांचा वापर करणारे कोण, हा प्रश्न अनुत्तरित राहिला आहे.७६ हजार रुपयांचा मिळाला महसूलमहसूल प्रशासनाने या गाढवांचा लिलाव करण्याचे ठरविल्यानंतर प्रति गाढव ३ हजार रुपये या प्रमाणे शासकीय बोलीवर ५० रुपये बोली लावून सय्यद वसीम सय्यद दिलावर यांनी १५ हजार २५० रुपयांचे १५ गाढवं खरेदी केले. बाळासाहेब केरबा भालके यांनी शासकीय बोलीवर १० रुपये वाढ करून ३ हजार १० रुपयाप्रमाणे १५ हजार ५० रुपयांची पाच गाढवे खरेदी केली.सय्यद आसेफ सय्यद अकबर यांनी ३ हजार ५० रुपया प्रमाणे ४५ हजार ७५० रुपयांची १५ गाढवं खरेदी केली. वाळू तस्करीतून मिळालेल्या २५ गाढवांच्या लिलावातून तहसील प्रशासनाला ७५ हजार ५० रुपयांचा महसूल मिळाला आहे. यावेळी सखाराम चोरघडे, शेख युनूस, दिगंबर चोरघडे, सुदाम टोलमारे, नंदकुमार भालके, भास्कर बोबडे, सय्यद युनूस यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.गंगाखेड तालुक्यात वाळूची वाहतूक करणाºया गाढवांचा लिलाव करण्यात आला असला तरी प्रत्यक्षात वाळू वाहतूक करायला लावणारे मालक मात्र सापडले नाहीत. त्यामुळे यापुढेही गाढवांच्या साह्याने वाळूची वाहतूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गाढवांच्या मालकांना शोधण्याचे प्रशासनासमोरील आव्हान कायम आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीsandवाळू