शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

परभणी : अखेर गाढवांचा केला लिलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 00:20 IST

वाळूची वाहतूक करणाऱ्या गाढवांना महसूल प्रशासनाने पकडल्यानंतर या गाढवांचे मालक समोर न आल्याने २१ डिसेंबर रोजी या गाढवांचा लिलाव करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड (परभणी) : वाळूची वाहतूक करणाऱ्या गाढवांना महसूल प्रशासनाने पकडल्यानंतर या गाढवांचे मालक समोर न आल्याने २१ डिसेंबर रोजी या गाढवांचा लिलाव करण्यात आला.गंगाखेड शहराजवळून वाहणाºया गोदावरी नदीपात्रातून विना परवाना वाळुचा उपसा करून त्याची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेल्या २६ गाढवांना तहसीलदार स्वरुप कंकाळ यांच्या पथकाने ११ डिसेंबर रोजी ताब्यात घेतले होते. यावेळी गाढवांचे मालक मात्र फरार झाले. त्यामुळे या सर्व गाढवांना धारखेड ग्रामपंचायतीच्या आवारात बांधून ठेवण्यात आले. यातील एक गाढव कारवाईच्या दिवशीच दगावले. गाढवांना पकडून दहा दिवसांंचा काळ उलटला तरी या गाढवांवर मालकी हक्क दाखविणारे गाढवांचे मालक अथवा इतर कोणीही समोर आले नाही. शेवटी २१ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता नायब तहसीलदार किरण नारखेडे, मंडळ अधिकारी शंकर राठोड, तलाठी शिवाजी मुरकुटे, लिपिक सुरेश डिलोड, सरपंच यशोदा चोरघडे, ग्रामसेवक ज्ञानोबा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत गाढवांचा लिलाव करण्यात आला. या लिलावात आठ जणांनी सहभाग घेतला. मात्र प्रति गाढव ५०० रुपये या प्रमाणे केवळ तिघांनीच पैसे भरल्याने उर्वरित पाच जणांना बोली लावता आली नाही. महसूल प्रशासन पकडलेल्या गाढवांचे मालक समोर आले असते तर त्यांना समज देऊन, दंड आकारून वाळू तस्करीला आळा घालता आला असता; परंतु, गाढवांचे मालक समोर आले नाहीत. त्यामुळे वाळू वाहतुकीसाठी गाढवांचा वापर करणारे कोण, हा प्रश्न अनुत्तरित राहिला आहे.७६ हजार रुपयांचा मिळाला महसूलमहसूल प्रशासनाने या गाढवांचा लिलाव करण्याचे ठरविल्यानंतर प्रति गाढव ३ हजार रुपये या प्रमाणे शासकीय बोलीवर ५० रुपये बोली लावून सय्यद वसीम सय्यद दिलावर यांनी १५ हजार २५० रुपयांचे १५ गाढवं खरेदी केले. बाळासाहेब केरबा भालके यांनी शासकीय बोलीवर १० रुपये वाढ करून ३ हजार १० रुपयाप्रमाणे १५ हजार ५० रुपयांची पाच गाढवे खरेदी केली.सय्यद आसेफ सय्यद अकबर यांनी ३ हजार ५० रुपया प्रमाणे ४५ हजार ७५० रुपयांची १५ गाढवं खरेदी केली. वाळू तस्करीतून मिळालेल्या २५ गाढवांच्या लिलावातून तहसील प्रशासनाला ७५ हजार ५० रुपयांचा महसूल मिळाला आहे. यावेळी सखाराम चोरघडे, शेख युनूस, दिगंबर चोरघडे, सुदाम टोलमारे, नंदकुमार भालके, भास्कर बोबडे, सय्यद युनूस यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.गंगाखेड तालुक्यात वाळूची वाहतूक करणाºया गाढवांचा लिलाव करण्यात आला असला तरी प्रत्यक्षात वाळू वाहतूक करायला लावणारे मालक मात्र सापडले नाहीत. त्यामुळे यापुढेही गाढवांच्या साह्याने वाळूची वाहतूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गाढवांच्या मालकांना शोधण्याचे प्रशासनासमोरील आव्हान कायम आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीsandवाळू