शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
विराट कोहलीचा भन्नाट रन आऊट! नाका तोंडाशी पाणी आल्यावर RCB कडून झाली सांघिक कामगिरी
3
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
4
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
5
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
6
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

परभणी : ई-आॅफिसच्या साडेतीन महिन्यांच्या फाईली गहाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 11:10 PM

मुंबई येथील मंत्रालयातील ई-आॅफिस प्रणालीच्या मुख्य सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने परभणी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या १ फेब्रुवारी ते २४ मे या कालावधीतील जवळपास १ हजार पेक्षा अधिक फाईल्स गहाळ झाल्या आहेत़ त्यामुळे या कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी नागरिकांच्या कामाच्या तगाद्यामुळे त्रस्त झाले आहेत़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : मुंबई येथील मंत्रालयातील ई-आॅफिस प्रणालीच्या मुख्य सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने परभणीजिल्हाधिकारी कार्यालयाच्या १ फेब्रुवारी ते २४ मे या कालावधीतील जवळपास १ हजार पेक्षा अधिक फाईल्स गहाळ झाल्या आहेत़ त्यामुळे या कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी नागरिकांच्या कामाच्या तगाद्यामुळे त्रस्त झाले आहेत़कामात पारदर्शकपणा व गतीमानता आणण्याच्या उद्देशाने राज्यात काही जिल्ह्यांमध्ये ई-आॅफिस प्रणाली लागू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता़ ई-आॅफीस प्रणाली अंतर्गत कार्यालय पेपरलेस करून या संदर्भातील फाईल स्कॅन करून डिजीटल सहीच्या माध्यमातून एका टेबलवरून दुसऱ्या टेबलवर पाठविली जात होती़ त्यामुळे कोणत्या टेबलवर, कोणती फाईल किती दिवसांपासून प्रलंबित आहे, याची इत्यंभूत माहिती कार्यालयप्रमुखांना संगणकाच्या एका क्लिकवर उपलब्ध होत होती़ ही प्रणाली पारदर्शक असल्याने जिल्हाधिकारी पी़ शिवशंकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात ही प्रणाली लागू करण्यासाठी मंत्रालयस्तरावर पाठपुरावा केला़ ई-आॅफीस प्रणाली लागू करण्यासंदर्भातील तांत्रिक बाबींची कमतरता असताना व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणही मिळाले नसताना विशेष बाब म्हणून परभणी जिल्हाधिकारी कार्यालयास यासाठी परवानगी देण्यात आली़ त्यानुसार १ फेब्रुवारी २०१९ पासून जिल्हाधिकारी कार्यालयात ई-आॅफीस प्रणाली सुरू करण्यात आली़ त्यानंतर आलेली प्रत्येक फाईल स्कॅन करून ती डिजीटल स्वाक्षरीच्या माध्यमातून संबंधित टेबलवरून जबाबदार अधिकाºयांमार्फत पूर्ण होऊ लागली़ जवळपास २४ मेपर्यंत ही प्रक्रिया सुरळीत होती़ २४ मे रोजी अचानक मुंबईतील मंत्रालयातील ई-आॅफीस प्रणालीच्या सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड झाला व ई-आॅफीसची संपूर्ण प्रक्रिया बंद पडली़ त्यामुळे परभणीसह औरंगाबाद, पुणे, मुंबई आदी जिल्ह्यांमधील ई-आॅफीसचे कामकाज ठप्प झाले़ १५ जून रोजी सायंकाळी ६ च्या सुमारास बºयाच प्रयत्नानंतर मुंबईतून ई-आॅफीस प्रणाली पूर्ववत झाली़ त्यानंतर एका फाईलवरून दुसरी फाईल पाठविली जाऊ लागली; परंतु, जुन्या प्रकरणातील फाईल्स व या संदर्भातील डाटा दिसेनासा झाला़ गेल्या चार दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयात जुना डाटा रिकव्हर करण्यासाठी प्रयत्न होत आहेत़यासाठी मुंबईतील मुख्य सर्व्हरच्या ठिकाणी एनआयसीमार्फत संपर्क साधण्यात येत आहे; परंतु, जुना डाटा रिकव्हरच होत नाही़ त्यामुळे १ फेब्रुवारी ते २४ मेपर्यंतच्या १ हजारापेक्षा अधिक फाईल्स गहाळ झाल्या आहेत़ अशातच आता लोकसभेच्या आचारसंहितेपूर्वी व त्यानंतरच्या प्रकरणातील फाईल्सवर काय निर्णय झाले? यासाठीचा पाठपुरावा संबंधित गावातील लोकप्रतिनिधी, नागरिक जिल्हाधिकारी कार्यालयाकडे करू लागले आहेत़ अशा नागरिकांना किंवा लोकप्रतिनिधींना या संदर्भात उत्तरे देताना अधिकारी व कर्मचाºयांच्या नाकी नऊ येत आहेत़ यातून वादावादीचे प्रकार घडत आहेत़ १९ जून रोजीही जिल्हाधिकारी कार्यालयात असाच प्रकार घडला़ त्यामुळे काय करावे? असा प्रश्न अधिकारी व कर्मचाºयांसमोर उपस्थित झाला आहे़विविध विभागांच्या कामकाजावर होतोय परिणामच्जिल्हाधिकारी कार्यालयातील ई-आॅफीस प्रणालीचे कामकाज १५ जून रोजी सायंकाळी ६ नंतर पूर्ववत झाले़ त्यानंतर गेल्या १७ जूनपासून ई-आॅफीस प्रणाली अंतर्गत कामकाज सुरू आहे़च्असे असले तरी १ फेब्रुवारी ते २४ मेपर्यंतच्या जुन्या फाईल्स कोणाच्या टेबलवर प्रलंबित आहेत, हेच कळेनासे झाले आहे़ त्यामुळे या फाईल्सवरील कारवाईबाबत विचारणा करण्यासाठी नागरिक जिल्हाधिकारी कार्यालयात येत आहेत़च्यावेळी या नागरिकांच्या प्रश्नांना उत्तरे देताना अधिकारी- कर्मचारी हतबल होत आहेत़ यातून वादा-वादीचे प्रकार घडत आहेत़ परिणामी दैनंदिन कामकाजावर त्याचा परिणाम दिसून येत आहे़मुंबईहून सुरळीत होण्याचाच सातत्याने मिळतोय निरोपजिल्हा कचेरीतील जिल्हा सूचना अधिकारी सुनील पोटेकर यांच्यापर्यंत सोमवारी जिंतूर तालुक्यातील एक प्रकरण गेले़ यावेळी त्यांनी मुंबई येथील प्रमुख कार्यालयाशी संपर्क साधला असता त्यांना लवकरच जुना डाटा रिकव्हर करून दिला जाईल, असे सांगण्यात आले़ प्रत्यक्षात दिवसभर तसे घडलेच नाही़

टॅग्स :parabhaniपरभणीcollectorजिल्हाधिकारी