शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
3
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
4
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
5
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
6
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
7
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
8
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
9
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
10
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
11
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
12
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
13
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
14
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
15
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
16
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
17
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
18
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
19
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
20
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 

परभणी : भर रस्त्यावरुन पळविले पन्नास हजार रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 00:05 IST

बँक खात्यातून काढलेले ५० हजार रुपये एका थैलीत टाकून घेऊन जात असताना चोरट्यांनी पाळत ठेवून ही थैली पळविल्याची घटना २१ मे रोजी सकाळी ११ वाजता गंगाखेड शहरात घडली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड : बँक खात्यातून काढलेले ५० हजार रुपये एका थैलीत टाकून घेऊन जात असताना चोरट्यांनी पाळत ठेवून ही थैली पळविल्याची घटना २१ मे रोजी सकाळी ११ वाजता गंगाखेड शहरात घडली आहे.येथील व्यापारी सय्यद जैनू सय्यद युसूफ यांनी सोमवारी सकाळी स्टेट बँक आॅफ इंडिया येथील खात्यातून ५० हजार रुपये काढून घेतले. हे पैसे एका थैलीत टाकून ते सायकलवरुन घरी जात असताना डॉ.हेडगेवार चौक परिसरात चोरट्यांनी सायकलला अडकविलेली थैली हिसका देऊन पळविली. पैसे चोरीला गेल्याचे लक्षात येताच सय्यद जैनू यांनी पोलीस ठाण्याकडे धाव घेऊन घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. मात्र पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांचीच उलट तपासणी केली. बँकेतून खरेच पैसे काढले का, असे विचारत पैसे काढण्यासाठी भरुन दिलेली पावती बँकेतून आणण्याचे सांगितले व पावती मिळाल्यानंतरच पुढील कारवाई करु, असे सांगून साधा तक्रार अर्ज लिहून घेतला. या प्रकरणी गुन्हा नोंद झाला नाही.तक्रार नोंदविण्यातच पोलिसांची धन्यताशहरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. रात्रीच्या वेळी होणाºया चोºयांबरोबरच भर दिवसाही लुटमारीच्या घटना घडत असताना पोलीस प्रशासन मात्र गुन्हे नोंदविण्याऐवजी केवळ तक्रार घेऊन तक्रारकर्त्याची बोळवण करीत असल्याने चोरट्यांचे मनोबल उंचावत आहे. दोन दिवसांपूर्वी न्यायाधीशांच्या निवासस्थानासह पाच घरे फोडल्याची घटना घडली होती. तर यापूर्वी देखील शहरात अनेक ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या आहेत.सोमवारी एका व्यापाºयाचे ५० हजार रुपये पळविल्याची घटना घडल्यानंतरही गुन्हा नोंदविण्यात आला नाही. यापर्वूी ८ फेब्रुवारी रोजी भंडारी कॉलनीतील उमदाबी शेख करीम यांच्या अंगावर घाण पडल्याचे सांगून त्यांच्याकडील ३० हजार रुपये पळविल्याची घटना घडली होती. चोरटा सीसीटीव्ही कॅमेºयात कैदही झाला होता. परंतु, पोलिसांनी त्यावेळेसही गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली होती.मोबाईल चोरीचे प्रकारगंगाखेड शहरातील आठवडी बाजारात मोबाईल चोरीचे प्रकारही वाढले आहेत. प्रत्येक बाजाराच्या दिवशी मोबाईलच्या चोरी होत आहेत. या प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल करण्याऐवजी केवळ तक्रार अर्जच घेतले जातात. त्यामुळे चोरीच्या तपासाकडे दुर्लक्ष होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीPoliceपोलिसtheftचोरीMONEYपैसा