शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
2
त्रिभाषा धोरणाला राज्यभरात कसा प्रतिसाद? डॉ. नरेंद्र जाधव म्हणाले, “पहिलीपासून हिंदी सक्ती...”
3
टिंडरवरची गर्लफ्रेंड महागात पडली! तोंडओळखीतच इंजिनियर तरुण लट्टू झाला अन् कंगाल होऊन बसला! 
4
₹३४,००० पगार असेल तर ८ व्या वेतन आयोगानंतर किती होईल? जाणून घ्या कॅलक्युलेशन
5
चीन-पाकिस्तानसह अमेरिकेलाही एकाचवेळी बसेल चाप; 'बगराम एअरबेस' भारतासाठी किती महत्त्वपूर्ण?
6
OPEC+ Oil Output: आणखी एक अग्निपरीक्षा; ८ देशांनी मिळून घेतला असा निर्णय ज्याचा थेट भारतावर होणार परिणाम, का वाढलं टेन्शन?
7
देशातील सर्वात श्रीमंत राजघराणे! अजूनही जगतात राजेशाही जीवन! कमाईचे मुख्य साधन कोणतं?
8
Afghanistan Earthquake : भीषण! भूकंपाने हादरला अफगाणिस्तान; ७ जणांचा मृत्यू, १५० जखमी; मजार-ए-शरीफचं नुकसान
9
क्रिकेट लीगसाठी गेल, गप्टिलसह ७० क्रिकेटपटूंना श्रीनगरला नेले, अन् आयोजकच फरार झाले, नेमकं प्रकरण काय? 
10
IAS Anuradha Pal : स्वप्न होती मोठी! घरची परिस्थिती बिकट, वडील विकायचे दूध; लेक झाली IAS, डोळे पाणावणारी गोष्ट
11
Lifelesson: प्रत्येकाची वेळ येते, पण तयारी असावी लागते शेफाली वर्मासारखी आणि 'या' गोष्टीसारखी!
12
जामताडा बनण्याच्या मार्गावर 'हे' शहर; 615 सायबर ठगांना अटक, 100 कोटींची फसवणूक उघड
13
ICC Women's World Cup Winners : "विजयी विश्व तिरंगा प्यारा..." भारतीय 'रन'रागणींनी रचला इतिहास
14
"मला २० लाख कॅश द्या, तरच वरात घेऊन येईन"; नवरदेवाचा ऐनवेळी लग्नास नकार, मागितला हुंडा
15
स्मृती मंधानाचा ट्रॉफी सोबतचा फोटो, हातावर टॅटू..., होणारा नवरा पलाश मुच्छलची पोस्ट व्हायरल
16
VIDEO: "दीदी, हा कप तुमच्यासाठी....", हरमनप्रीतचा माजी दिग्गजांसोबत मैदानात जल्लोष
17
कशी आहे प्रणित मोरेची तब्येत? 'बिग बॉस'मधून बाहेर पडल्यावर टीमने केली पोस्ट
18
एका पैशाचा खर्च नाही, संकटे-समस्या संपतील; २१ दिवस १ मंत्राचा जप करा, अशक्यही शक्य होईल!
19
३० कोटींच्या उधळपट्टीचा घोटाळा सिद्ध, मुख्यमंत्र्यांचीही परवानगी नाही; रोहित पवार म्हणाले, 'हिवाळी अधिवेशनात सरकारची धिंड काढणार'
20
वैकुंठ चतुर्दशी २०२५: श्रीविष्णू-महादेवांचे वरदान, पुण्य लाभेल; ‘असे’ करा व्रत, शुभच घडेल!

परभणी : मासोळी प्रकल्पाने गाठली पन्नाशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 00:21 IST

तालुक्यातील डोंगरी भागात असलेल्या मासोळी प्रकल्पाने चार वर्षानंतर पन्नाशी गाठल्याने दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या गावातील व गंगाखेड शहरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही अंशी सुटला आहे. त्यामुळे शेतकरी व नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड (परभणी): तालुक्यातील डोंगरी भागात असलेल्या मासोळी प्रकल्पाने चार वर्षानंतर पन्नाशी गाठल्याने दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या गावातील व गंगाखेड शहरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही अंशी सुटला आहे. त्यामुळे शेतकरी व नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.गंगाखेड तालुक्यात असलेल्या डोंगर भागातील ४०० एकर जमिनीवर १९७२ सालच्या दुष्काळात उभारण्यात आलेला मासोळी प्रकल्प गेल्या चार वर्षात अत्यल्प प्रमाणात झालेल्या पर्जन्यमानामुळे कोरडाच राहिला होता.गतवर्षी १७ सप्टेंबर २०१८ रोजी या प्रकल्पात केवळ ९ टक्केच एवढाच पाणीसाठा उपलब्ध होता. डिसेंबर २०१८ च्या अखेरीस हा प्रकल्प मृतसाठ्यात गेल्याने चालू वर्षात आॅगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत या मृतसाठ्यातील पाण्यावरच गंगाखेड शहर व परिसरातील गावांची तहान भागविण्यात आली. चालू वर्षात आॅगस्ट महिन्याच्या अखेरच्या दोन दिवसात व सप्टेंबर महिन्याच्या प्रारंभी तालुका व परिसरात झालेल्या दमदार पावसामुळे तसेच अधूनमधून कोसळत असलेल्या पावसाच्या सरीमुुळे मासोळी प्रकल्पात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली. १७ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजता मासोळी प्रकल्पात ५० टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला.मासोळी प्रकल्पाने पन्नाशी ओलांडल्याने परिसरातील माखणी, खोकलेवाडी, सुप्पा, इसाद, सिरसम आदी गावांसह गंगाखेड शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघाला आहे. त्याच बरोबर मासोळी प्रकल्पात उपलब्ध असलेल्या पाण्याचा सिंचनासाठी मोठा फायदा होणार असल्याने परिसरातील शेतकरी समाधानी झाले आहेत. आगामी काळात डोंगर भागातील कोद्री, बडवणी, डोंगरजवळा, पिंपळदरी, सुप्पा आदी भागात दमदार पाऊस झाल्यास मासोळी प्रकल्प १०० टक्के भरेल, असा आशावाद मासोळी प्रकल्पात कार्यरत अधिकारी व परिसरातील नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे.२०१६ मध्ये भरभरून वाहिला प्रकल्पच्२०१७- १८ मध्ये पावसाने उघडीप दिल्याने मासोळी प्रकल्पात पाणीसाठा झालाच नाही. त्यामुळे १७ सप्टेंबर २०१७ पासून या प्रकल्पात केवळ १४ टक्केच पाणीसाठा शिल्लक होता. २०१७ पेक्षाही भयावह परिस्थिती २०१८ मध्ये तालुक्यात निर्माण झाली. त्यामुळे १७ सप्टेंबर २०१८ मध्ये प्रकल्पाच्या पाण्यात घट होऊन केवळ ९ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला. २०१८ च्या डिसेंबर अखेरीस मासोळी प्रकल्पाने तळ गाठत हा प्रकल्प मृतसाठ्यात गेला.च्उपलब्ध असलेल्या मृतसाठ्यातील पाण्यावरच तालुक्यातील काही गावांची व गंगाखेड शहराची आॅगस्ट महिन्यापर्यंत तहान भागविण्यात आली. आॅगस्ट महिन्याच्या शेवटच्या दोन दिवसांत सुरू झालेल्या पावसामुळे आज रोजी या प्रकल्पात ५० टक्के पाणीसाठा झाल्याने शेतकरी व आणि नागरिंकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. दरम्यान चार वर्षांच्या कालावधीत २०१६ मध्येच हा मासोळी प्रकल्प १०० टक्के भरला होता.

टॅग्स :parabhaniपरभणीIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पdroughtदुष्काळWaterपाणी