शहरं
Join us  
Trending Stories
1
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
2
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
3
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
4
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
5
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
6
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
7
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
8
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
9
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
10
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
11
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
12
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
13
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
14
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
15
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
16
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
17
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
18
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
19
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
20
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत

परभणी : साडेअठरा कोटींचा विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2019 23:51 IST

खरीप हंगाम २०१८ मधील पिकांचा विमा मंजूर झाला असून, सोयाबीन, मूग, उडीद, मका, बाजरा व ज्वारी या पिकांच्या नुकसानीपोटी विमा कंपनीने १८ कोटी ६० लाख रुपयांची रक्कम ५८ हजार ४८० शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग केली आहे़ त्यामुळे दुष्काळाच्या गर्तेत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे़

मारोती जुंबडे ।लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : खरीप हंगाम २०१८ मधील पिकांचा विमा मंजूर झाला असून, सोयाबीन, मूग, उडीद, मका, बाजरा व ज्वारी या पिकांच्या नुकसानीपोटी विमा कंपनीने १८ कोटी ६० लाख रुपयांची रक्कम ५८ हजार ४८० शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग केली आहे़ त्यामुळे दुष्काळाच्या गर्तेत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे़यावर्षी जिल्ह्यामध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे़ राज्य शासनाने ९ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला असून, परतीचा पाऊस न झाल्याने पिकांच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे़ २०१८ च्या खरीप हंगामात शेतकºयांनी पिकांची लागवड करताना विमाही उतरविला होता़ इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनीकडे परभणी जिल्ह्यातील ५ लाख ८६ हजार १४४ शेतकºयांनी खरीप हंगामातील सोयाबीन, मूग, उडीद, मका, बाजरी, ज्वारी, तूर व कापूस या पिकांसाठी २८८ कोटी ७२ लाख ४९६ रुपयांचा पीकविमा भरला होता़महसूल प्रशासनाने जिल्ह्यातील पिकांची आणेवारी जाहीर केली़ नजर आणेवारी आणि अंतीम आणेवारीमध्ये पिकांच्या उत्पादनात ५० टक्क्यांपेक्षा अधिक घट झाल्याची नोंद झाली होती़ शासनाच्या निर्णयानुसार विमा काढलेल्या क्षेत्रामध्ये पिकांच्या उत्पादनात ५० टक्क्यांपेक्षा अधिक घट असेल तर त्या भागातील शेतकºयांना विमा नुकसान भरपाई देण्यात येते़ दुष्काळी परिस्थिती पाहून विमा कंपनीकडून शेतकºयांना विम्याची रक्कम देण्यासाठी हालचाली सुरू करण्यात आल्या होत्या़राज्य शासनाने परभणी जिल्ह्यातील नऊही तालुक्यांत दुष्काळ जाहीर केल्याने शेतकºयांना पीक विमा मिळण्याच्या हालचालींना वेग आला होता़ त्यानुसार इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनीने खरीप हंगामातील सोयाबीन, मूग, उडीद, मका, बाजरी व ज्वारी या पिकांचा विमा काढलेल्या जिल्ह्यातील ५८ हजार ४८० शेतकºयांचा पीक विमा मंजूर करून लाभार्थी शेतकºयांच्या खात्यावर १८ कोटी ६० लाख रुपयांची रक्कम वर्ग केली आहे़ त्यामुळे खरीप हंगामातील पिकांवर खर्च करून उत्पन्न मिळाले नसल्याने आर्थिक कोंडीत सापडलेल्या शेतकºयांना विमा कंपनीच्या मदतीमुळे दिलासा मिळाला आहे़साडेअठरा कोटी तूर पिकाचे अग्रीमही मंजूर४शासनाच्या निर्णयानुसार विमा काढलेल्या क्षेत्रामध्ये पिकांच्या उत्पादनात ५० टक्क्यांपेक्षा अधिक घट आली असेल तर त्या भागातील शेतकºयांना विमा नुकसान भरपाईपोटी आग्रीम देण्याची तरतूद आहे़ या तरतुदीनुसार जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांनी ३१ डिसेंबर रोजी एक आदेश काढून परभणी जिल्ह्यातील तूर उत्पादक शेतकºयांना विमा नुकसान भरपाई पोटी २५ टक्के अग्रीम रक्कम एक महिन्याच्या आत अदा करावी, असे निर्देश दिले होते़ या निर्देशानुसार इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनीच्या अधिकाºयांनी तातडीने पावले उचलत जिल्ह्यातील जवळपास ७८ हजार तूर उत्पादक शेतकºयांसाठी १८ कोटी ५० लाख रुपयांची अग्रीम रक्कम मंजूर केली आहे़ एवढ्यावरच न थांबता १६ कोटी २१ लाख रुपयांची रक्कम ६८ हजार ३२४ शेतकºयांच्या खात्यावर वर्गही केली आहे़ त्यामुळे विमा रक्कम मंजूर होण्याआधीच विमा कंपनीने नुकसान भरपाईपोटी २५ टक्के रक्कम शेतकºयांच्या खात्यावर टाकल्याने तूर उत्पादक शेतकºयांत समाधान आहे़तूर, कापूस पिकांनाही लाभजिल्ह्यातील ५ लाख ८६ हजार १४४ शेतकºयांनी २८८ कोटी ७२ लाख ४९६ ुरुपयांची रक्कम इफ्को टोकीयो विमा कंपनीकडे भरली होती़ या विमा कंपनीने जिल्ह्यात दुष्काळात शेतकºयांच्या झालेल्या नुकसानीपोटी खरीप हंगाम २०१८ मधील सोयाबीन, मूग, उडीद, मका, बाजरी, ज्वारी या पिकांचा विमा मंजूर करून शेतकºयांच्या खात्यावर वर्गही केला आहे़ त्याचपाठोपाठ खरीप हंगामातील तूर व कापूस या पिकांचाही विमा या कंपनीने मंजूर केला आहे़ येत्या काही दिवसांत शेतकºयांच्या खात्यावर या दोन पिकांच्या नुकसानीपोटीची रक्कमही वर्ग केली जाणार असल्याची माहिती इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनीचे विभागीय अधिकारी अभिजीत नांदोडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली़२०१७ च्या खरीप हंगामातील विम्याचा गोंधळ कायम४खरीप हंगाम २०१७ मध्ये जिल्ह्यातील जवळपास ७ लाख शेतकºयांनी रिलायन्स विमा कंपनीकडे विमा उतरविला होता; परंतु, या कंपनीने शेतकºयांना मदत देताना महसूल घटक गृहित न धरता तालुका घटक गृहित धरून जवळपास ४ लाख शेतकºयांना विमा मदतीपासून वंचित ठेवले आहे़४विमा कंपनीच्या या कारभाराबद्दल जिल्ह्यातील लाभार्थी शेतकºयांसह राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, शेतकरी संघटनांनी वेळोवेळी आंदोलन करून वंचित शेतकºयांना लाभ मिळावा, यासाठी प्रयत्न केले आहेत़४परंतु, याकडे मुख्यमंत्री, महसूल मंत्री व विमा कंपनीने पूर्णत: दुर्लक्ष करून आजपर्यंत पात्र ठरलेल्या शेतकºयांनाही लाभ दिला नाही़ त्यामुळे या विमा कंपनीने दुष्काळात सापडलेल्या शेतकºयांना पीक विम्याची रक्कम तातडीने वाटप करावी, अशी मागणी होत आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीCrop Insuranceपीक विमा