शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

परभणी :२३० योजनांचे अस्तित्व आले धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2019 00:06 IST

येलदरी धरणाच्या ५० वर्षांच्या इतिहास दुसऱ्यांदा हे धरण मृतसाठ्यात गेले आहे. मृतसाठ्यात १०२ दलघमी पाणी असून, त्यात १४ टक्के गाळ असल्याचे २०११ मधील सर्वेक्षणात म्हटले होते. त्यामुळे या धरणातील पाणी प्रथमच मोठ्या प्रमाणात कमी झाल्याने परभणी, जिंतूर, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यातील २३० पाणीपुरवठा योजनांचे अस्तित्वच धोक्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कयेलदरी (परभणी): येलदरी धरणाच्या ५० वर्षांच्या इतिहास दुसऱ्यांदा हे धरण मृतसाठ्यात गेले आहे. मृतसाठ्यात १०२ दलघमी पाणी असून, त्यात १४ टक्के गाळ असल्याचे २०११ मधील सर्वेक्षणात म्हटले होते. त्यामुळे या धरणातील पाणी प्रथमच मोठ्या प्रमाणात कमी झाल्याने परभणी, जिंतूर, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यातील २३० पाणीपुरवठा योजनांचे अस्तित्वच धोक्यात आले आहे.अर्ध्याहून अधिक मराठवाड्याची तहान भागविणाऱ्या पूर्णा प्रकल्पाच्या येलदरी धरणात उपयुक्त पाणीसाठा शून्य टक्क्याच्या खाली असून धरणात सद्य स्थितीत मृत साठ्यात गाळयुक्त १०३ दलघमी एवढेच पाणी शिल्लक आहे. जलसंपदा विभागाने पुढील उन्हाळ्याची कोणतीही परवा न करता धरणाच्या उपयुक्त पाणीसाठ्यातील ७२ दलघमी पाणी ३१ डिसेंबर २०१८ ते १४ जानेवारी २०१९ या काळात सिद्धेश्वर धरणात सोडले. प्रशासन एवढ्यावरच थांबले नाही तर येलदरीच्या मृत साठ्यातील १२४ दलघमी पैकी २० दलघमी पाणी सिद्धेश्वर धरणात पुन्हा हलविण्यात आले. यामुळे येलदरी धरणाच्या ५० वर्षाच्या इतिहासात १९७२ चा अपवाद वगळता यावेळी अत्यंत कमी पाणीसाठा राहण्याची ही पहिलीच वेळ आहे.आणखी तीव्र उन्हाळ्याची चारही महिने बाकी असून परभणी, हिंगोली व नांदेड जिल्ह्यातील सर्व लहान तलावातील पाणीसाठा संपत आला आहे. आशा वेळी येलदरी सारख्या धरणात पाणीसाठा शिल्लक ठेवणे गरजेचे होते; परंतु, जलसंपदा विभागाने येथील पाण्याचे कोणतेही नियोजन न करता धरणातील पाणी पिण्याच्या नावाखाली सिद्धेश्वर धरणात हलविले. सिद्धेश्वर धरणातून या पाण्याचा उपयोग पिण्यासाठी कमी आणि पिकांसाठी जास्त झाला, असे नागरिकांतून बोलले जात आहे.येलदरी धरणाने तळ गाठल्याने मराठवाड्यातील परभणी, हिंगोली व नांदेड या तिन्ही जिल्ह्यातील ३० हून अधिक गावांना पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याच बरोबर परभणी, हिंगोली, पूर्णा, जिंतूर, वसमत या शहरातील नगरपालिका या पाण्याची मागणी करतात. मात्र आता आडातच नाही तर पोहºयात येणार कोठून, या म्हणीप्रमाणे पाणीटंचाईच्या काळात प्रशासन हतबल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ग्रामस्थांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जाण्याची भीती व्यक्त होत आहे.९३४ दलघमीची क्षमता४येलदरी धरणाची एकूण पाणीसाठवण क्षमता ९३४ दलघमी एवढी आहे. यामध्ये ८१० दलघमी एवढा उपयुक्त पाणीसाठा समावतो. तर १२४ दलघमी एवढा मृत पाणीसाठा शिल्लक राहतो. यावर्षी जानेवारी महिन्यातच धरणातील उपयुक्त पाणीसाठा सोडून देण्यात आला. व मृतसाठ्यातीलही २० दलघमी पाणी काढून देण्यात आले. आता धरणात केवळ १०३ दलघमी एवढाच मृत पाणीसाठा शिल्लक आहे. या पाणीसाठ्यात एकूण क्षमतेच्या म्हणजेच ९३४ दलघमी १४ टक्के गाळ असल्याचे २०११ च्या सर्वेक्षणानुसार समोर आले आहे. त्यामुळे सध्या येलदरी धरणात जे शिल्लक पाणी आहे, ते पूर्णपणे गाळयुक्त आहे. त्यामुळे जलसंपदा विभागाला पुढील काळात पाण्याचे नियोजन करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. त्यातच एप्रिल-मे या दोन महिन्यात धरण क्षेत्रातील पाणीसाठ्यावर अवलंबून असलेल्या ग्रामस्थांना पाणीटंचाईचे चटके सहन करावे लागणार आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीDamधरण