शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
2
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
5
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
6
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
7
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
8
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
9
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
10
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
11
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
12
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
13
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
14
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
15
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
16
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
17
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
18
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
19
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
20
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार

परभणी : आठ दिवसांपासूून सोळा गावांत अंधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 00:14 IST

जिंतूर तालुक्यातील सावंगी भांबळे व वझर परिसरातील १६ गावे आठ दिवसांपासून अंधारात आहेत. परिणामी या गावात दळणासह पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे वीज वितरण कंपनीच्या कारभाराविरुद्ध ग्रामस्थ संताप व्यक्त करीत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कबामणी : जिंतूर तालुक्यातील सावंगी भांबळे व वझर परिसरातील १६ गावे आठ दिवसांपासून अंधारात आहेत. परिणामी या गावात दळणासह पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे वीज वितरण कंपनीच्या कारभाराविरुद्ध ग्रामस्थ संताप व्यक्त करीत आहेत.दरवर्षी वीज वितरण कंपनीकडून मान्सूनपूर्व दुरुस्तीची लाखो रुपयांची कामे केली जातात; परंतु, ही कामे दर्जेदार होत नसल्याने प्रत्येक पावसाळ्यात वीज गूल होण्याचे प्रकार नेहमीचेच झाले आहेत. वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना मात्र याचे कोणतेही सोयरसूतक नसल्याचे दिसून येते.जिंंतूर तालुक्यातील सावंगी भांबळे, वझर परिसरात १७ एप्रिल रोजी वादळी वाºयासह पाऊस झाला. या वादळी वाºयात वझर येथील ३३ के.व्ही. उपकेंद्रावरील विजेची ५० खांब तर गावठाण लाईनवरील ४५ खांब उन्मळून पडले. त्यामुळे सावंगी भांबळे, वझर, सायखेडा, उमरद, बेलखेडा, कवडा, धमधम, असोला, कोरवाडी, संक्राळा, कोलपा, कुंभेफळ, बनबरडा, कुटे वझर, पिंपरी, बरडा आदी १६ गावात अंधार पसरला आहे. त्याचबरोबर या गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासह दळणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.सावंगी भांबळे व वझर परिसरात वादळी वाºयात वीज वितरण कंपनीचे नुकसान होऊन आठ दिवसांचा कालावधी लोटला आहे; परंतु, अद्याप एकाही गावचा वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला नाही. त्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून १६ गावांतील ग्रामस्थांंना अंधारात रात्र काढावी लागत आहे.तसेच पाण्यासाठी दोन ते तीन कि.मी. पायपीट करावी लागत आहे. याचे कोणतेही सोयरसूतक महावितरण कंपनीला दिसत नसल्याचे पहावयास मिळत आहे. त्यामुळे अधीक्षक अभियंत्यांनी याकडे लक्ष देऊन वादळी वाºयात नुकसान झालेल्या वीज खाबांची तत्काळ दुरुस्ती करावी आणि १६ गावांचा खंडीत झालेला वीजपुरवठा तत्काळ सुरळीत करावा, अशी मागणी होत आहे.४तहसील : कार्यालयाने केले दुर्लक्षजिंंतूर तालुक्यातील सावंगी भांबळे येथे १७ एप्रिल रोजी झालेल्या वादळी वाºयात गावातील परमेश्वर भांबळे, दिलीप खाडे, कमलाबाई खरात यांच्या घरांच्या भिंती पडून मोठे नुकसान झाले. तसेच ग्यानोजी मोरे (वय ७०) यांचा मृत्यू झाला. एवढे होऊनही महसूल प्रशासन मात्र सावंगी भांबळे गावाकडे आठ दिवसांचा कालावधी उलटूनही फिरकले नाहीत. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी सावंगी येथील घटनेचा पंचनामा करून नुकसानग्रस्त कुटुंबियांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.गेल्या आठ दिवसांपासून वीज खांब पडले आहेत. वीज वितरण कंपनीकडून दुरुस्तीची कामे सुरू आहेत. २३ एप्रिल रोजी रात्री १० वाजेपर्यंत वझर येथील ३३ के.व्ही. पर्यंत वीज लाईनची दुरुस्ती करण्यात आली आहे. सावंगी परिसरातील लाईनच्या दुुरुस्तीची कामे सुरू आहेत. त्यामुळे लवकरच वीजपुरवठा पूर्ववत होईल.-ज्ञानदेव सावंत,वरिष्ठ तंत्रज्ञंिजंतूर तालुक्यातील वझर येथील मुख्य लाईनचे काम पूर्ण झाले आहे. आठ दिवसात २४ वीज खांब उभे केले आहेत. ६५ वीज खांब दुरुस्त करण्याचे काम बाकी आहे. त्यामुळे वीजपुरवठा सुरळीत होण्यासाठी किमान ७ दिवसांचा कालावधी लागेल.-विजय मुंडे, कंत्राटदार

टॅग्स :parabhaniपरभणीmahavitaranमहावितरणPower Shutdownभारनियमन