शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : आठ दिवसांपासूून सोळा गावांत अंधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 00:14 IST

जिंतूर तालुक्यातील सावंगी भांबळे व वझर परिसरातील १६ गावे आठ दिवसांपासून अंधारात आहेत. परिणामी या गावात दळणासह पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे वीज वितरण कंपनीच्या कारभाराविरुद्ध ग्रामस्थ संताप व्यक्त करीत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कबामणी : जिंतूर तालुक्यातील सावंगी भांबळे व वझर परिसरातील १६ गावे आठ दिवसांपासून अंधारात आहेत. परिणामी या गावात दळणासह पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे वीज वितरण कंपनीच्या कारभाराविरुद्ध ग्रामस्थ संताप व्यक्त करीत आहेत.दरवर्षी वीज वितरण कंपनीकडून मान्सूनपूर्व दुरुस्तीची लाखो रुपयांची कामे केली जातात; परंतु, ही कामे दर्जेदार होत नसल्याने प्रत्येक पावसाळ्यात वीज गूल होण्याचे प्रकार नेहमीचेच झाले आहेत. वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना मात्र याचे कोणतेही सोयरसूतक नसल्याचे दिसून येते.जिंंतूर तालुक्यातील सावंगी भांबळे, वझर परिसरात १७ एप्रिल रोजी वादळी वाºयासह पाऊस झाला. या वादळी वाºयात वझर येथील ३३ के.व्ही. उपकेंद्रावरील विजेची ५० खांब तर गावठाण लाईनवरील ४५ खांब उन्मळून पडले. त्यामुळे सावंगी भांबळे, वझर, सायखेडा, उमरद, बेलखेडा, कवडा, धमधम, असोला, कोरवाडी, संक्राळा, कोलपा, कुंभेफळ, बनबरडा, कुटे वझर, पिंपरी, बरडा आदी १६ गावात अंधार पसरला आहे. त्याचबरोबर या गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासह दळणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.सावंगी भांबळे व वझर परिसरात वादळी वाºयात वीज वितरण कंपनीचे नुकसान होऊन आठ दिवसांचा कालावधी लोटला आहे; परंतु, अद्याप एकाही गावचा वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला नाही. त्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून १६ गावांतील ग्रामस्थांंना अंधारात रात्र काढावी लागत आहे.तसेच पाण्यासाठी दोन ते तीन कि.मी. पायपीट करावी लागत आहे. याचे कोणतेही सोयरसूतक महावितरण कंपनीला दिसत नसल्याचे पहावयास मिळत आहे. त्यामुळे अधीक्षक अभियंत्यांनी याकडे लक्ष देऊन वादळी वाºयात नुकसान झालेल्या वीज खाबांची तत्काळ दुरुस्ती करावी आणि १६ गावांचा खंडीत झालेला वीजपुरवठा तत्काळ सुरळीत करावा, अशी मागणी होत आहे.४तहसील : कार्यालयाने केले दुर्लक्षजिंंतूर तालुक्यातील सावंगी भांबळे येथे १७ एप्रिल रोजी झालेल्या वादळी वाºयात गावातील परमेश्वर भांबळे, दिलीप खाडे, कमलाबाई खरात यांच्या घरांच्या भिंती पडून मोठे नुकसान झाले. तसेच ग्यानोजी मोरे (वय ७०) यांचा मृत्यू झाला. एवढे होऊनही महसूल प्रशासन मात्र सावंगी भांबळे गावाकडे आठ दिवसांचा कालावधी उलटूनही फिरकले नाहीत. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी सावंगी येथील घटनेचा पंचनामा करून नुकसानग्रस्त कुटुंबियांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.गेल्या आठ दिवसांपासून वीज खांब पडले आहेत. वीज वितरण कंपनीकडून दुरुस्तीची कामे सुरू आहेत. २३ एप्रिल रोजी रात्री १० वाजेपर्यंत वझर येथील ३३ के.व्ही. पर्यंत वीज लाईनची दुरुस्ती करण्यात आली आहे. सावंगी परिसरातील लाईनच्या दुुरुस्तीची कामे सुरू आहेत. त्यामुळे लवकरच वीजपुरवठा पूर्ववत होईल.-ज्ञानदेव सावंत,वरिष्ठ तंत्रज्ञंिजंतूर तालुक्यातील वझर येथील मुख्य लाईनचे काम पूर्ण झाले आहे. आठ दिवसात २४ वीज खांब उभे केले आहेत. ६५ वीज खांब दुरुस्त करण्याचे काम बाकी आहे. त्यामुळे वीजपुरवठा सुरळीत होण्यासाठी किमान ७ दिवसांचा कालावधी लागेल.-विजय मुंडे, कंत्राटदार

टॅग्स :parabhaniपरभणीmahavitaranमहावितरणPower Shutdownभारनियमन