शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

परभणी : आठ दिवसांपासूून सोळा गावांत अंधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 00:14 IST

जिंतूर तालुक्यातील सावंगी भांबळे व वझर परिसरातील १६ गावे आठ दिवसांपासून अंधारात आहेत. परिणामी या गावात दळणासह पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे वीज वितरण कंपनीच्या कारभाराविरुद्ध ग्रामस्थ संताप व्यक्त करीत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कबामणी : जिंतूर तालुक्यातील सावंगी भांबळे व वझर परिसरातील १६ गावे आठ दिवसांपासून अंधारात आहेत. परिणामी या गावात दळणासह पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे वीज वितरण कंपनीच्या कारभाराविरुद्ध ग्रामस्थ संताप व्यक्त करीत आहेत.दरवर्षी वीज वितरण कंपनीकडून मान्सूनपूर्व दुरुस्तीची लाखो रुपयांची कामे केली जातात; परंतु, ही कामे दर्जेदार होत नसल्याने प्रत्येक पावसाळ्यात वीज गूल होण्याचे प्रकार नेहमीचेच झाले आहेत. वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना मात्र याचे कोणतेही सोयरसूतक नसल्याचे दिसून येते.जिंंतूर तालुक्यातील सावंगी भांबळे, वझर परिसरात १७ एप्रिल रोजी वादळी वाºयासह पाऊस झाला. या वादळी वाºयात वझर येथील ३३ के.व्ही. उपकेंद्रावरील विजेची ५० खांब तर गावठाण लाईनवरील ४५ खांब उन्मळून पडले. त्यामुळे सावंगी भांबळे, वझर, सायखेडा, उमरद, बेलखेडा, कवडा, धमधम, असोला, कोरवाडी, संक्राळा, कोलपा, कुंभेफळ, बनबरडा, कुटे वझर, पिंपरी, बरडा आदी १६ गावात अंधार पसरला आहे. त्याचबरोबर या गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासह दळणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.सावंगी भांबळे व वझर परिसरात वादळी वाºयात वीज वितरण कंपनीचे नुकसान होऊन आठ दिवसांचा कालावधी लोटला आहे; परंतु, अद्याप एकाही गावचा वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला नाही. त्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून १६ गावांतील ग्रामस्थांंना अंधारात रात्र काढावी लागत आहे.तसेच पाण्यासाठी दोन ते तीन कि.मी. पायपीट करावी लागत आहे. याचे कोणतेही सोयरसूतक महावितरण कंपनीला दिसत नसल्याचे पहावयास मिळत आहे. त्यामुळे अधीक्षक अभियंत्यांनी याकडे लक्ष देऊन वादळी वाºयात नुकसान झालेल्या वीज खाबांची तत्काळ दुरुस्ती करावी आणि १६ गावांचा खंडीत झालेला वीजपुरवठा तत्काळ सुरळीत करावा, अशी मागणी होत आहे.४तहसील : कार्यालयाने केले दुर्लक्षजिंंतूर तालुक्यातील सावंगी भांबळे येथे १७ एप्रिल रोजी झालेल्या वादळी वाºयात गावातील परमेश्वर भांबळे, दिलीप खाडे, कमलाबाई खरात यांच्या घरांच्या भिंती पडून मोठे नुकसान झाले. तसेच ग्यानोजी मोरे (वय ७०) यांचा मृत्यू झाला. एवढे होऊनही महसूल प्रशासन मात्र सावंगी भांबळे गावाकडे आठ दिवसांचा कालावधी उलटूनही फिरकले नाहीत. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी सावंगी येथील घटनेचा पंचनामा करून नुकसानग्रस्त कुटुंबियांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.गेल्या आठ दिवसांपासून वीज खांब पडले आहेत. वीज वितरण कंपनीकडून दुरुस्तीची कामे सुरू आहेत. २३ एप्रिल रोजी रात्री १० वाजेपर्यंत वझर येथील ३३ के.व्ही. पर्यंत वीज लाईनची दुरुस्ती करण्यात आली आहे. सावंगी परिसरातील लाईनच्या दुुरुस्तीची कामे सुरू आहेत. त्यामुळे लवकरच वीजपुरवठा पूर्ववत होईल.-ज्ञानदेव सावंत,वरिष्ठ तंत्रज्ञंिजंतूर तालुक्यातील वझर येथील मुख्य लाईनचे काम पूर्ण झाले आहे. आठ दिवसात २४ वीज खांब उभे केले आहेत. ६५ वीज खांब दुरुस्त करण्याचे काम बाकी आहे. त्यामुळे वीजपुरवठा सुरळीत होण्यासाठी किमान ७ दिवसांचा कालावधी लागेल.-विजय मुंडे, कंत्राटदार

टॅग्स :parabhaniपरभणीmahavitaranमहावितरणPower Shutdownभारनियमन