शहरं
Join us  
Trending Stories
1
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
2
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप
3
इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार...
4
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! आठवडाभरात सोन-चांदीत मोठी घसरण! काय आहेत आजचे दर?
5
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
6
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
7
आईचे दुसऱ्या महिलेशी समलैंगिक संबंध, प्रेमासाठी चिमुकल्याची हत्या; पतीच्या हाती लागला व्हिडिओ अन् मग...
8
कधीकाळी चालवायचे रिक्षा, आता मुलाच्या वाढदिवशी लग्झरी कार दिली भेट; VIP नंबरसाठी मोजले ३१ लाख
9
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत
10
तुमच्या कारमधील परफ्यूम दरवळतोय पण ठरतोय 'सायलेंट किलर'! श्वास आणि मायग्रेनचा गंभीर धोका
11
Nuclear warfare: भविष्य स्फोटक आहे...
12
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
13
अर्धा तास तडफडला! फी न भरल्याने प्राध्यापकाने केला अपमान, विद्यार्थ्याने कॅम्पसमध्ये स्वतःला पेटवले
14
"तुमच्यातले शारीरिक संबंध कसे आहेत?", आंतरधर्मीय लग्न करताना मराठी गायिकेला आईने विचारलेला बोल्ड प्रश्न
15
सोनं की रिअल इस्टेट? गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय ठरेल जास्त फायदेशीर? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
16
मराठी अभिनेत्रीला डेट करतोय सुनील शेट्टीचा लेक अहान; कोण आहे ती सुंदरा?
17
जेल की रिसॉर्ट? ISIS रिक्रूटर आणि सीरियल किलरकडे मोबाईल; अधिकाऱ्यांच्या मदतीने कैद्यांची मजा
18
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
19
प्रदूषणकारी रसायनांचे उत्पादन करणारा कारखाना रत्नागिरीच्या लोटे वसाहतीत
20
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक

परभणी :पावसाळ्यातही ३५ टँकर सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2019 00:02 IST

पावसाळा सुरू झाल्यानंतरही शहरातील अनेक भागातील पाणी टंचाई कमी झाली नसून, ३५ टँकरच्या साह्याने शहरवासियांना पाणीपुरवठा केला जात आहे. विश्ेष म्हणजे, नळ योजनेद्वारे पाणीपुरवठ्याचे नियोजन विस्कळीत झाल्याने मनपाला टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : पावसाळा सुरू झाल्यानंतरही शहरातील अनेक भागातील पाणी टंचाई कमी झाली नसून, ३५ टँकरच्या साह्याने शहरवासियांना पाणीपुरवठा केला जात आहे. विश्ेष म्हणजे, नळ योजनेद्वारे पाणीपुरवठ्याचे नियोजन विस्कळीत झाल्याने मनपाला टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे.यावर्षीच्या उन्हाळ्यात परभणी शहरासह जिल्ह्यातचा पाण्याचा प्रश्न गंभीर झाला होता. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राहाटी येथील बंधाºयात मुबलक पाणीसाठा असतानाही नागरिकांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागले. मागील चार महिन्यांपासून शहरात १५ ते २० दिवसांतून एक वेळा पाणीपुरवठा केला जात आहे. शहराला पाणीपुरवठा करणारी नवी योजना अद्याप कार्यान्वित झाली नाही. तर जुनी योजना अपुरी ठरत आहे. परिणामी टंचाईमध्ये भर पडली आहे.जुन्या पाणीपुरवठा योजनेद्वारे केला जाणारा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. उन्हाळ्यात अनेक भागातील हातपंप आटले. त्यामुळे पाण्यासाठी नागरिकांना धावपळ करावी लागली. जलवाहिनी नसलेल्या भागात पाणीटंचाई अधिकच तीव्र झाली होती. या पार्श्वभूमीवर एप्रिल महिन्यातच शहरात टँकरच्या साह्याने पाणीपुरवठा करण्यात आला. संपूर्ण उन्हाळ्यात मनपाला ४४ टँकर लावावे लागले. १ जूनपासून प्रत्यक्ष पावसाळ्याला सुरुवात झाली आहे.पावसाळ्याचा एक महिना उलटला तरीही शहरातील पाणी टंचाई हटली नाही. परिणामी टँकरने पाणीपुरवठा सुरूच आहे. सद्यस्थितीत शहरात एकूण ३५ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. त्यात प्रभाग समिती अ मध्ये ८, प्रभाग समिती ब मध्ये ९ आणि प्रभाग समिती क मध्ये १३ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. याशिवाय मनपाच्या मालकीचे १३ टँकर सुरू आहेत. एकंदर शहरात निर्माण झालेली पाणी टंचाई अद्यापही कमी झाली नसून मनपाला टंचाईग्रस्त भागास अजूनही टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे.मनपाच्या सूचनांना दिला फाटा४शहरात १२ हजार लिटर आणि सहा हजार लिटर क्षमतेच्या टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला़ किरायाने टँकर लावताना संबंधित टँकरवर परभणी शहर महापालिका मोफत पाणीपुरवठा असे ठळक अक्षरात लिहावे, असे बंधनकारक करण्यात आले होते़ परंतु, अजूनही बहुतांश टँकरवर हा फलक आढळत नाही़ ज्या टँकरवर परभणी मनपाच्या नावाने फलक नाही अशा टँकरवर कारवाई देखील झाली नाही़ त्यामुळे मोफत पाणीपुरवठ्याच्या नावाखाली काहींनी आपला खिसाही गरम करून घेतल्याचे दिसून येत आहे.जिल्ह्यात ८० टँकर सुरूच४जिल्ह्यातील ग्रामीण भागात यावर्षी मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई निर्माण झाली होती़ जिल्हा प्रशासनाने १०९ टँकरच्या सहाय्याने ग्रामीण भागात पाणीपुरवठा केला़ पावसाळा सुरू होवून एक महिन्याचा कालावधी उलटला आहे़४परंतु, समाधानकारक पाऊस झाला नाही़ त्यामुळे ग्रामीण भागातील पाणीटंचाई देखील कायम असून, सद्यस्थितीला ८० टँकरच्या सहाय्याने टंचाईग्रस्त भागाला पाणीपुरवठा केला जात आहे़टँकरवर राहिले नाही नियंत्रण४शहरात निर्माण झालेल्या पाणीटंचाईमुळे टँकर सुरू करण्यात आले़ हे टँकर सुरू करताना प्रत्येक टँकर समवेत मनपाचा एक कर्मचारीही देण्यात आला होता़ मात्र संपूर्ण उन्हाळ्यात या टँकरवर मनपातील अधिकाऱ्यांचे नियंत्रण नसल्याचे दिसून आले़४टँकर चालकांना पाणी वाटपासाठी पॉर्इंटही निश्चित करून दिले होते़ मात्र अनेक भागांत नेमून दिलेल्या पॉर्इंटवर पाण्याचे वाटप झाले नाही़ ज्या भागातून अधिकची रक्कम मिळते त्याच ठिकाणी अधिक पाणी वाटप होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.४त्यामुळे नोंदणी केलेल्या ठिकाणापेक्षा इतर ठिकाणीही पाण्याचे वाटप झाल्याने टंचाईग्रस्त भागातील नागरिकांची पाण्यासाठी हेळसांड होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीwater scarcityपाणी टंचाईdroughtदुष्काळRainपाऊस