शहरं
Join us  
Trending Stories
1
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
2
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
3
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
4
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
5
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
6
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
7
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
8
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
9
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
10
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
11
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
12
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
13
महामुंबईसाठी पद्मश्री पुरस्कार विजेत्यांचा जाहीरनामा
14
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
15
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
16
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
17
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
18
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
19
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
20
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा

परभणी: पावसाने ताण दिल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 23:29 IST

मान्सूनचा पाऊस लांबल्याने तालुक्यातील दुष्काळ अद्यापही हटलेला नाही. मृग नक्षत्र कोरडे गेले असून, पेरणीयोग्य पाऊस झाला नसल्याने पेरण्या रखडल्या आहेत. तर दुसरीकडे बँका पीक कर्ज देण्यास उदासीन असल्याने शेतकऱ्यांना पैशासाठी खाजगी सावकाराचे उंबरठे झिजवावे लागत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कमानवत (परभणी) : मान्सूनचा पाऊस लांबल्याने तालुक्यातील दुष्काळ अद्यापही हटलेला नाही. मृग नक्षत्र कोरडे गेले असून, पेरणीयोग्य पाऊस झाला नसल्याने पेरण्या रखडल्या आहेत. तर दुसरीकडे बँका पीक कर्ज देण्यास उदासीन असल्याने शेतकऱ्यांना पैशासाठी खाजगी सावकाराचे उंबरठे झिजवावे लागत आहेत.जून महिना आर्ध्यावरती आला असताना मान्सूनचे आगमन झाले नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. शेतकºयांनी मे महिन्याच्या तिसºया आठवड्यातच मशागतीची कामे उरकली आहेत. यंदाच्या उन्हाळ्यात ४३ अंशाच्या वर पारा गेला होता. रखरखत्या उन्हात शेतकºयांनी मशागतीची कामे पूर्ण केली; परंतु, जूनचा पहिला पंधरवाडा संपला तरी मान्सूनचे आगमन झाले नाही. हवामान कोरडेच असल्याने पेरणीला उशिरा सुरुवात होते की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.निसर्गाने साथ न दिल्याने तालुक्यातील शेतकरी आर्थिक कचाट्यात सापडला आहे. सतत दुष्काळी परिस्थिती निर्माण होत असल्याने शेतकºयांचे कंबरडे मोडले आहे. कर्जबाजारी शेतकरी पेरणीच्या तयारीसाठी उसनवारीने पैसे जमा करीत आहेत. राज्य शासनाने संपूर्ण तालुक्यात अति दुष्काळ असल्याचे जाहीर केले होते.संपूर्ण तालुका दुष्काळाच्या छायेत असल्याने शेतकºयांना पिण्याच्या पाण्यापासून जनावरांच्या चाºयाचा प्रश्न भेडसावत आहे. त्यामुळे जवळ असलेली सर्व पुंजी खर्च झाली असून खाजगी कर्ज काढून पारंपरिक पद्धतीने शेतीची मशागत शेतकºयांनी करुन ठेवली आहे. खरीप हंगामातील पेरणीसाठी बळीराजा सज्ज झाला असला तरी पावसाचे आगमन झाले नसल्याने खरीप हंगामाची पेरणी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. एकुणच शेतीची मशागतीचे कामे आटोपून शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत असल्याचे चित्र तालुक्यात आहे.पारंपरिक बियाणांचा झाला वापर कमी४पूर्वी शेतकरी घरातील पारंपरिक बियाणांचा वापर करीत होते; परंतु, काळाच्या ओघात काही वषार्पासून पेरणीसाठी संकरित बियाणांचा वापर वाढला आहे. शेतकºयांनी बियाणांची जमवाजमव करुन ठेवली आहे. मानवत तालुक्यात कापूस, सोयाबीनचा पेरा सर्वाधिक होतो. दिवसेंदिवस पावसाचे कमी होणारे प्रमाण हे शेतकºयांसह सर्वासाठीच चिंतेची बाब ठरत आहे.४तालुक्यात वाढत असलेली पाणी टंचाईची दाहकता आणि पावसाभावी रखडत असलेली पेरणी शेतकºयांसमोर चिंता उभी करीत आहे. यामुळे बियाणे घरात येऊन पडलेली असतानाही जमिनीत ओल नसल्यामुळे पेरणी करणार कशी? असा असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे संपुर्ण तालुक्यात पेरण्या रखडल्या आहेत.खताच्या किंमतीमध्ये झाली वाढ४निसर्गाचे संकट समोर असताना यंदा खताच्या किंमती वाढल्या आहेत. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.४शासनाने रासायनिक खताचे दर जाहीर केले असून खताच्या किंमती मागील वर्षी पेक्षा १० ते २५ टक्यांनी वाढल्या आहेत. त्यामुळे शेतकºयांना चांगल्या प्रतिचा खत घेणे अशक्य होणार आहे.बाजार थंडावलापाऊस लांबल्याने बियाणे खते, यासह शेतीसाठी लागणारे विविध साहित्य, खरेदीसाठी होणारी गर्दी सध्या तरी दिसत नाही. आठवड्यापासून परिसरात ढगाळ वातावरण तयार होत आहे. मात्र पाऊस पडत नाही.

टॅग्स :parabhaniपरभणीRainपाऊसFarmerशेतकरी