शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
2
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
3
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
4
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
5
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
6
कोकणात आणखी सहा ग्रोथ सेंटर्स; १०६ गावांत विकास केंद्रे, पर्यटन, कृषी व्यवसायाला चालना   
7
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
8
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
9
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
10
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
13
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
14
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
15
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
16
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
17
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
18
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
19
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
20
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)

परभणी: पावसाने ताण दिल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 23:29 IST

मान्सूनचा पाऊस लांबल्याने तालुक्यातील दुष्काळ अद्यापही हटलेला नाही. मृग नक्षत्र कोरडे गेले असून, पेरणीयोग्य पाऊस झाला नसल्याने पेरण्या रखडल्या आहेत. तर दुसरीकडे बँका पीक कर्ज देण्यास उदासीन असल्याने शेतकऱ्यांना पैशासाठी खाजगी सावकाराचे उंबरठे झिजवावे लागत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कमानवत (परभणी) : मान्सूनचा पाऊस लांबल्याने तालुक्यातील दुष्काळ अद्यापही हटलेला नाही. मृग नक्षत्र कोरडे गेले असून, पेरणीयोग्य पाऊस झाला नसल्याने पेरण्या रखडल्या आहेत. तर दुसरीकडे बँका पीक कर्ज देण्यास उदासीन असल्याने शेतकऱ्यांना पैशासाठी खाजगी सावकाराचे उंबरठे झिजवावे लागत आहेत.जून महिना आर्ध्यावरती आला असताना मान्सूनचे आगमन झाले नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. शेतकºयांनी मे महिन्याच्या तिसºया आठवड्यातच मशागतीची कामे उरकली आहेत. यंदाच्या उन्हाळ्यात ४३ अंशाच्या वर पारा गेला होता. रखरखत्या उन्हात शेतकºयांनी मशागतीची कामे पूर्ण केली; परंतु, जूनचा पहिला पंधरवाडा संपला तरी मान्सूनचे आगमन झाले नाही. हवामान कोरडेच असल्याने पेरणीला उशिरा सुरुवात होते की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.निसर्गाने साथ न दिल्याने तालुक्यातील शेतकरी आर्थिक कचाट्यात सापडला आहे. सतत दुष्काळी परिस्थिती निर्माण होत असल्याने शेतकºयांचे कंबरडे मोडले आहे. कर्जबाजारी शेतकरी पेरणीच्या तयारीसाठी उसनवारीने पैसे जमा करीत आहेत. राज्य शासनाने संपूर्ण तालुक्यात अति दुष्काळ असल्याचे जाहीर केले होते.संपूर्ण तालुका दुष्काळाच्या छायेत असल्याने शेतकºयांना पिण्याच्या पाण्यापासून जनावरांच्या चाºयाचा प्रश्न भेडसावत आहे. त्यामुळे जवळ असलेली सर्व पुंजी खर्च झाली असून खाजगी कर्ज काढून पारंपरिक पद्धतीने शेतीची मशागत शेतकºयांनी करुन ठेवली आहे. खरीप हंगामातील पेरणीसाठी बळीराजा सज्ज झाला असला तरी पावसाचे आगमन झाले नसल्याने खरीप हंगामाची पेरणी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. एकुणच शेतीची मशागतीचे कामे आटोपून शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत असल्याचे चित्र तालुक्यात आहे.पारंपरिक बियाणांचा झाला वापर कमी४पूर्वी शेतकरी घरातील पारंपरिक बियाणांचा वापर करीत होते; परंतु, काळाच्या ओघात काही वषार्पासून पेरणीसाठी संकरित बियाणांचा वापर वाढला आहे. शेतकºयांनी बियाणांची जमवाजमव करुन ठेवली आहे. मानवत तालुक्यात कापूस, सोयाबीनचा पेरा सर्वाधिक होतो. दिवसेंदिवस पावसाचे कमी होणारे प्रमाण हे शेतकºयांसह सर्वासाठीच चिंतेची बाब ठरत आहे.४तालुक्यात वाढत असलेली पाणी टंचाईची दाहकता आणि पावसाभावी रखडत असलेली पेरणी शेतकºयांसमोर चिंता उभी करीत आहे. यामुळे बियाणे घरात येऊन पडलेली असतानाही जमिनीत ओल नसल्यामुळे पेरणी करणार कशी? असा असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे संपुर्ण तालुक्यात पेरण्या रखडल्या आहेत.खताच्या किंमतीमध्ये झाली वाढ४निसर्गाचे संकट समोर असताना यंदा खताच्या किंमती वाढल्या आहेत. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.४शासनाने रासायनिक खताचे दर जाहीर केले असून खताच्या किंमती मागील वर्षी पेक्षा १० ते २५ टक्यांनी वाढल्या आहेत. त्यामुळे शेतकºयांना चांगल्या प्रतिचा खत घेणे अशक्य होणार आहे.बाजार थंडावलापाऊस लांबल्याने बियाणे खते, यासह शेतीसाठी लागणारे विविध साहित्य, खरेदीसाठी होणारी गर्दी सध्या तरी दिसत नाही. आठवड्यापासून परिसरात ढगाळ वातावरण तयार होत आहे. मात्र पाऊस पडत नाही.

टॅग्स :parabhaniपरभणीRainपाऊसFarmerशेतकरी