शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

परभणी: पावसाने ताण दिल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 23:29 IST

मान्सूनचा पाऊस लांबल्याने तालुक्यातील दुष्काळ अद्यापही हटलेला नाही. मृग नक्षत्र कोरडे गेले असून, पेरणीयोग्य पाऊस झाला नसल्याने पेरण्या रखडल्या आहेत. तर दुसरीकडे बँका पीक कर्ज देण्यास उदासीन असल्याने शेतकऱ्यांना पैशासाठी खाजगी सावकाराचे उंबरठे झिजवावे लागत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कमानवत (परभणी) : मान्सूनचा पाऊस लांबल्याने तालुक्यातील दुष्काळ अद्यापही हटलेला नाही. मृग नक्षत्र कोरडे गेले असून, पेरणीयोग्य पाऊस झाला नसल्याने पेरण्या रखडल्या आहेत. तर दुसरीकडे बँका पीक कर्ज देण्यास उदासीन असल्याने शेतकऱ्यांना पैशासाठी खाजगी सावकाराचे उंबरठे झिजवावे लागत आहेत.जून महिना आर्ध्यावरती आला असताना मान्सूनचे आगमन झाले नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. शेतकºयांनी मे महिन्याच्या तिसºया आठवड्यातच मशागतीची कामे उरकली आहेत. यंदाच्या उन्हाळ्यात ४३ अंशाच्या वर पारा गेला होता. रखरखत्या उन्हात शेतकºयांनी मशागतीची कामे पूर्ण केली; परंतु, जूनचा पहिला पंधरवाडा संपला तरी मान्सूनचे आगमन झाले नाही. हवामान कोरडेच असल्याने पेरणीला उशिरा सुरुवात होते की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.निसर्गाने साथ न दिल्याने तालुक्यातील शेतकरी आर्थिक कचाट्यात सापडला आहे. सतत दुष्काळी परिस्थिती निर्माण होत असल्याने शेतकºयांचे कंबरडे मोडले आहे. कर्जबाजारी शेतकरी पेरणीच्या तयारीसाठी उसनवारीने पैसे जमा करीत आहेत. राज्य शासनाने संपूर्ण तालुक्यात अति दुष्काळ असल्याचे जाहीर केले होते.संपूर्ण तालुका दुष्काळाच्या छायेत असल्याने शेतकºयांना पिण्याच्या पाण्यापासून जनावरांच्या चाºयाचा प्रश्न भेडसावत आहे. त्यामुळे जवळ असलेली सर्व पुंजी खर्च झाली असून खाजगी कर्ज काढून पारंपरिक पद्धतीने शेतीची मशागत शेतकºयांनी करुन ठेवली आहे. खरीप हंगामातील पेरणीसाठी बळीराजा सज्ज झाला असला तरी पावसाचे आगमन झाले नसल्याने खरीप हंगामाची पेरणी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. एकुणच शेतीची मशागतीचे कामे आटोपून शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत असल्याचे चित्र तालुक्यात आहे.पारंपरिक बियाणांचा झाला वापर कमी४पूर्वी शेतकरी घरातील पारंपरिक बियाणांचा वापर करीत होते; परंतु, काळाच्या ओघात काही वषार्पासून पेरणीसाठी संकरित बियाणांचा वापर वाढला आहे. शेतकºयांनी बियाणांची जमवाजमव करुन ठेवली आहे. मानवत तालुक्यात कापूस, सोयाबीनचा पेरा सर्वाधिक होतो. दिवसेंदिवस पावसाचे कमी होणारे प्रमाण हे शेतकºयांसह सर्वासाठीच चिंतेची बाब ठरत आहे.४तालुक्यात वाढत असलेली पाणी टंचाईची दाहकता आणि पावसाभावी रखडत असलेली पेरणी शेतकºयांसमोर चिंता उभी करीत आहे. यामुळे बियाणे घरात येऊन पडलेली असतानाही जमिनीत ओल नसल्यामुळे पेरणी करणार कशी? असा असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे संपुर्ण तालुक्यात पेरण्या रखडल्या आहेत.खताच्या किंमतीमध्ये झाली वाढ४निसर्गाचे संकट समोर असताना यंदा खताच्या किंमती वाढल्या आहेत. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.४शासनाने रासायनिक खताचे दर जाहीर केले असून खताच्या किंमती मागील वर्षी पेक्षा १० ते २५ टक्यांनी वाढल्या आहेत. त्यामुळे शेतकºयांना चांगल्या प्रतिचा खत घेणे अशक्य होणार आहे.बाजार थंडावलापाऊस लांबल्याने बियाणे खते, यासह शेतीसाठी लागणारे विविध साहित्य, खरेदीसाठी होणारी गर्दी सध्या तरी दिसत नाही. आठवड्यापासून परिसरात ढगाळ वातावरण तयार होत आहे. मात्र पाऊस पडत नाही.

टॅग्स :parabhaniपरभणीRainपाऊसFarmerशेतकरी