शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

परभणी :पारदर्शक तपासणीच्या दुर्लक्षामुळेच धान्य घोटाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 12:28 AM

सखोल व पारदर्शक तपासणी झाली नसल्यामुळेच पालम येथील पुरवठा विभागाच्या गोदामात ३४ लाख रुपयांचा धान्य घोटाळा झाल्याची बाब समोर आली आहे़ त्यामुळे या तपासणीकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाºयांवरही कार्यवाही होणे गरजेचे आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : सखोल व पारदर्शक तपासणी झाली नसल्यामुळेच पालम येथील पुरवठा विभागाच्या गोदामात ३४ लाख रुपयांचा धान्य घोटाळा झाल्याची बाब समोर आली आहे़ त्यामुळे या तपासणीकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाºयांवरही कार्यवाही होणे गरजेचे आहे़पालम येथील पुरवठा विभागाच्या गोदामात ३४ लाखांचा घोटाळा झाल्याची बाब १० जानेवारी रोजी उघडकीस आली होती़ या संदर्भातील वृत्त ११ जानेवारी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली होती़ या प्रकरणात जिल्हाधिकाºयांनी गोदामपाल एस़एम़ कांबळे यांना निलंबित केले आहे; परंतु, येथील गोदामाची नियमित तपासणी करण्याची जबाबदारी ज्या अधिकाºयांवर होती, त्या अधिकाºयांवर मात्र अद्याप कार्यवाही झालेली नाही़ या प्रकरणी जिल्हाधिकाºयांनी पालमचे पुरवठा निरीक्षक तथा प्रभारी तहसीलदार श्रीरंग कदम यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती़ त्यानुसार कदम यांनी जिल्हाधिकाºयांना मंगळवारी खुलासा सादर केला आहे़ या खुलाशात त्यांनी स्वत:चीच बाजू मांडल्याचे समजते़ त्यामुळे त्यांचा खुलासा जिल्हाधिकारी कितपत स्वीकारणार याविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे़ मुळातच पालम येथील गोदामाची नियमितपणे तपासणी होणे आवश्यक होते़ परंतु, तशी तपासणी झाली नसल्यामुळेच धान्य अपहाराचा प्रकार झाल्याची चर्चा होवू लागली आहे़ जून २०१७ पासून गोदामपाल कांबळे यांच्याकडे पदभार होता़ त्यानंतरच गेल्या सहा महिन्यांमध्ये धान्य अपहाराचा प्रकार झाल्याचे समजते़ त्यामुळे गेल्या सहा महिन्यांमध्ये ज्या ज्या अधिकाºयांनी या गोदामाची तपासणी केली व पारदर्शकता बाळगली नाही, असे सर्व अधिकारी या प्रकरणात दोषी आढळत आहेत; परंतु, त्यांच्यावरील दोषारोप प्रशासनालाच सिद्ध करावा लागणार आहे़ अन्यथा केवळ एका कर्मचाºयावर कार्यवाही करून धान्य घोटाळ्याचे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न प्रशासकीय स्तरावरून होवू शकतो. तशी भीतीही कर्मचाºयांनी व्यक्त केली आहे़ आतापर्यंत उघडकीस आलेल्या धान्य घोटाळ्यात कर्मचाºयांबरोबरच अधिकाºयांवरही कार्यवाही होणे अपेक्षित होते; परंतु, तशी कार्यवाही झालेली नाही.मुंबईच्या पथकाने ओढले ताशेरेपरभणी येथील पुरवठा विभागाच्या गोदामातील धान्य घोटाळा दोन वर्षापूर्वी मुंबईच्या पथकानेच उघडकीस आणला होता़ या पथकाची नियमितपणे गोदाम तपासणी होत असते़ त्या अनुषंगाने २५ डिसेंबर ते १५ जानेवारी या कालावधीत या पथकाने जिल्ह्यातील १० गोदामांची तपासणी केली़ सर्वात शेवटी या पथकाने पालम येथील पुरवठा विभागाच्या गोदामाची तपासणी केली़ त्यानंतर तयार केलेल्या अहवालात पथकाने गोदामाची सखोल आणि पारदर्शक तपासणी झाली नसल्यामुळेच धान्य घोटाळा घडल्याचे नमूद केले आहे़ त्यामुळे गेल्या सहा महिन्यांत या पारदर्शकतेकडे दुर्लक्ष करणाºया अधिकाºयांवरही कार्यवाहीचा बडगा उगारणे आवश्यक आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीfraudधोकेबाजी