शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
2
VIDEO: पंतप्रधान मोदी नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनावेळी मराठीत काय बोलले? ऐका...
3
थायलंडमध्ये मसाज घेण्यासाठी जाणं होणार महाग, जाणून घ्यावा हा नियम, अन्यथा ऐनवेळी बसेल भुर्दंड   
4
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
5
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
6
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
7
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
8
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
9
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
10
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
11
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
12
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
13
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
14
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
15
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
16
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
17
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
18
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
19
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
20
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री

परभणी : दुष्काळी अनुदान वाटपात बँकेकडून होतेय दिरंगाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 23:09 IST

दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन शासनाने शेतकऱ्यांसाठीची दोन टप्प्यामध्ये दुष्काळी अनुदानाची रक्कम बँकेत जमा करून दोन महिन्यांचा कालावधी उलटला आहे; परंतु, अद्यापही चारठाणा येथील मध्यवर्ती बँक शाखेतून अनुदानाचे वाटप झाले नसल्याने शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कदेवगावफाटा (परभणी) : दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन शासनाने शेतकऱ्यांसाठीची दोन टप्प्यामध्ये दुष्काळी अनुदानाची रक्कम बँकेत जमा करून दोन महिन्यांचा कालावधी उलटला आहे; परंतु, अद्यापही चारठाणा येथील मध्यवर्ती बँक शाखेतून अनुदानाचे वाटप झाले नसल्याने शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे.सेलू तालुक्यातील देवगावफाटा येथील ५३३ शेतकºयांना दुष्काळी अनुदानाचा पहिला हप्ता म्हणून १९ लाख २८ हजार ३९५, दुसरा हप्ता १८ लाख ९४ हजार २८७ असे एकूण ३८ लाख २२ हजार ६८२ रुपयांचे अनुदान मार्च महिन्याअगोदर जिंतूर तालुक्यातील चारठाणा येथील जिल्हा मध्यवर्ती बँक शाखेत सेलू येथील तहसील कार्यालयाच्या वतीने जमा करण्यात आले. शेतकºयांनी हे अनुदान मिळावे, यासाठी लाभार्थी शेतकºयांनी बँकेत वारंवार चकरा मारल्या; परंतु, बँक शाखाधिकाºयांनी दिलेल्या उडवाउडवीच्या उत्तराखेरीज लाभार्थी शेतकºयांना काही मिळाले नाही. सेलू तालुक्यात सध्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. विशेष म्हणजे राज्य शासनानेही या तालुक्याची निवड गंभीर दुष्काळाच्या यादीत केली आहे. या दुष्काळामुळे शेतकºयांनी पेरणी केलेल्या खरीप व रबी हंगामातून काहीच हाती लागले नाही. त्यामुळे सध्या तरी शेतकरी आर्थिक कोंडीत सापडले आहेत. या शेतकºयांना मदत व्हावी, यासाठी राज्य शासनाने तातडीचे पावले उचलत अनुदानाच्या पहिल्या व दुसºया टप्याचा निधीचे बँकेकडे वर्ग केले आहेत; परंतु, दोन महिने उलटून बँकांकडून अनुदान वाटप न झाल्याने लाभार्थ्यांमधून संताप व्यक्त होत आहे.उपविभागीय अधिकाºयांकडे तक्रारसेलू तालुक्यातील देवगावफाटा येथील दुष्काळापासून वंचित राहिलेल्या शेतकºयांनी २ मे रोजी उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांची भेट घेऊन एका निवेदनाद्वारे आपले म्हणणे मांडले. या निवेदनावर चेअरमन बापूअप्पा साळेगावकर, मोकिंद मोरे, भगवान सातपुते, प्रकाश मोरे, केशव मोरे, संतोष गरड आदींच्या सह्या आहेत.जिल्हाधिकाºयांनी लक्ष देण्याची गरजदुष्काळी अनुदानाचा निधी बँकांकडे वर्ग होऊन दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी लोटला आहे. मात्र बहुतांश ठिकाणी हे अनुदान शेतकºयांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले नाही. त्यामुळे लाभार्थी शेतकºयांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. जिल्हाधिकाºयांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीdroughtदुष्काळbankबँक