शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
2
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
3
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
4
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
5
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
6
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
7
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
8
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
9
जॉन अब्राहमच्या 'फोर्स ३'मध्ये साउथच्या या प्रसिद्ध अभिनेत्रीची झाली एन्ट्री, जाणून घ्या कोण आहे ती?
10
Dombivli Video: हात सोडला अन् ११व्या मजल्यावरून तरुण कोसळला; डोंबिवलीतील घटनेचा व्हिडीओ
11
दुहेरी हत्येच्या प्रयत्नाने दिल्ली हादरली, पतीने पत्नी आणि मुलावर झाडल्या गोळ्या 
12
'सोनम वांगचुकच्या संपर्कात पाकिस्तानी नागरिक, बांगलादेशातही गेले'; पोलिसांचा धक्कादायक खुलासा
13
संविधान रक्षणासाठी काँग्रेस काढणार दीक्षाभूमी ते सेवाग्राम ‘संविधान सत्याग्रह पदयात्रा’
14
"आम्ही जगायचं की नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगावं"; लक्ष्मण हाकेंचा संतप्त सवाल, हल्ल्याचा सगळा घटनाक्रम सांगितला
15
सुंदर वहिनीला नणंदेने पळवून नेले, घरदार सोडून दोघे झाले गायब, असं फुटलं बिंग   
16
लिव्हिंग रुम, किचन अन् बेडरुम! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील 'सावत्या'ने खूपच सुंदर सजवलंय मुंबईतील आलिशान घर
17
Laxman Hake: दहा-बारा पोलीस असताना लक्ष्मण हाकेंची गाडी फोडली; बांबूने हल्ला, काय घडलं?
18
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
19
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे
20
'आज आपण संघाची सुरुवात करत आहोत', ना कुठली घोषणा, ना कुठले अतिथी; शंभर वर्षांअगोदर अशी झाली संघाची सुरवात

परभणीत दुष्काळ निवारण संकल्प शिबीर :राजकारणातच काही पक्षांना रस- आदित्य ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2019 00:27 IST

मराठवाड्यासह विविध भागात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असताना काही पक्षांना दुष्काळग्रस्तांना मदत करण्याऐवजी राजकारण करण्यातच रस असल्याचा आरोप युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी येथे आयोजित जाहीर सभेत बोलताना केला़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : मराठवाड्यासह विविध भागात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असताना काही पक्षांना दुष्काळग्रस्तांना मदत करण्याऐवजी राजकारण करण्यातच रस असल्याचा आरोप युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी येथे आयोजित जाहीर सभेत बोलताना केला़पूर्णा तालुक्यातील एरंडेश्वर येथे बुधवारी दुष्काळ निवारण संकल्प शिबीर प्रसंगी आयोजित कार्यक्रमात ठाकरे बोलत होते़ यावेळी व्यासपीठावर खा़ बंडू जाधव, संयोजक आ़ डॉ़ राहुल पाटील, आ़ जयप्रकाश मुंदडा, जिल्हा सहसंपर्कप्रमुख डॉ़ विवेक नावंदर, जिल्हाप्रमुख विशाल कदम, गंगाप्रसाद आणेराव, सदाशिव देशमुख, सोपान अवचार, नंदू पाटील, समप्रिया पाटील, अंबिका डहाळे, सखूबाई लटपटे, गजानन काकडे, ज्ञानेश्वर पवार, अर्जुन सामाले आदींची उपस्थिती होती़ यावेळी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, दुष्काळ कितीही गंभीर असला तरी शिवसेना त्याला तोंड देण्यासाठी खंबीर आहे़ दुष्काळात जनतेला मदत करण्याचे काम पक्षाच्या आमदार, खासदारांकडून सुरू आहे़ त्यामध्ये सातत्य कायम राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली़ शेतीमधलं मला काही कळत नसलं तरी शेतकऱ्यांच्या व्यथा मात्र आपणाला कळतात़ त्यामुळे त्यांच्या अडचणी दूर करण्यास पक्षाचे प्राधान्य आहे, असेही ते म्हणाले़ गेल्या दोन दिवसांपासून मराठवाड्यातील पिकांची पाहणी करीत असताना आग लागून जळावीत तशी पिके दिसत आहेत़ ग्रामीण भागातील लोक शहराकडे स्थलांतर करीत आहेत; परंतु, नोटाबंदीमुळे शहरातील उद्योगधंदेही बंद पडत आहेत़ अशा अवस्थेत शेतकºयांचे हाल होत आहेत़ त्याला सरकार जबाबदार असल्याचे ते म्हणाले़ यावेळी बोलताना संयोजक आ़ डॉ़ पाटील म्हणाले की, जय भवानी महिला सहकारी सूतगिरणी ही १०० टक्के सौर उर्जेवर चालणार असून, अशी ही महाराष्ट्रातील एकमेव सूतगिरणी ठरणार आहे़ या सूतगिरणीच्या माध्यमातून साडेतीन हजार महिलांना रोजगार मिळणार आहे़ दुष्काळात शेतकºयांनी खचून न जाता व आत्महत्येचा मार्ग न अवलंबिता कुटुंबाचा विचार करून संकटांचा सामना करावा, शिवसेना त्यांच्यासोबत आहे़, असे सांगून त्यांनी शिवसेनेची बांधिलकी शेतकरी व सर्वसामान्यांशी आहे़ पोलीस भरतीसाठी शिवसेनेने १०० युवकांना दत्तक घेतले असून, मेगा भरतीसाठी युवकांना मोफत प्रशिक्षण देण्याचे कामही शिवसेनेकडून सुरू असल्याचे ते म्हणाले़यावेळी बोलताना खा़ बंडू जाधव म्हणाले की, विधायक कामे करण्यास शिवसेना कधीही मागे हटणार नाही़ सूतगिरणीचे भूमिपूजन हा त्याचाच एक भाग आहे़ जिल्ह्यातील जनता नेहमीच शिवसेनेच्या पाठीशी आहे़ त्यामुळे शिवसेनाही दुष्काळग्रस्तांच्या समस्या दूर करण्यासाठी बांधील आहे, असे सांगून त्यांनी आ़ डॉ़ पाटील यांच्या कामाचे कौतुक केले़शिलाई मशीन, शेळ्या-मेंढ्यांचे वाटपयावेळी आदित्य ठाकरे यांच्या हस्ते नियोजित जय भवानी महिला सहकारी सूतगिरणीचे भूमिपूजन करण्यात आले़ तसेच आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना शेळ्या-मेंढ्यांचे वाटप करण्यात आले़ तसेच महिलांना शिलाई मशीन, मोफत पोलीस भरती प्रशिक्षण शिबिरासाठी निवड झालेल्या १०० युवक, युवतींना साहित्याचे वाटप करण्यात आले़ तसेच जनावरांसाठी खाद्याचे वाटपही करण्यात आले़ यावेळी नागरिकांची मोठ्या प्रमाणे उपस्थिती होती़

टॅग्स :parabhaniपरभणीAditya Thackreyआदित्य ठाकरेFarmerशेतकरीdroughtदुष्काळ