शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

परभणी : कागदोपत्रीच केले चाऱ्याचे नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 00:43 IST

जिल्ह्यामध्ये निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीमध्ये जनावरांसाठी चारा उपलब्ध करण्यासाठी केवळ कागदोपत्रीच नियोजन करण्यात आले असून प्रत्यक्षात चारा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रशासनाकडून ठोस पाऊले उचलली जात नाहीत. परिणामी जनावरांना उपासमारीचा सामना करण्याची भिती निर्माण झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यामध्ये निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीमध्ये जनावरांसाठी चारा उपलब्ध करण्यासाठी केवळ कागदोपत्रीच नियोजन करण्यात आले असून प्रत्यक्षात चारा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रशासनाकडून ठोस पाऊले उचलली जात नाहीत. परिणामी जनावरांना उपासमारीचा सामना करण्याची भिती निर्माण झाली आहे.यावर्षी दुष्काळी परिस्थितीमध्ये जिल्ह्यात पाण्याच्या टंचाई बरोबरच चारा टंचाईचाही सामना करावा लागत आहे. यावर्षी परतीचा पाऊस झाला नसल्याने रब्बी हंगामात पेरणी झाली नाही. त्यामुळे चारा कमी प्रमाणात उपलब्ध आहे. जमिनीतील पाणीपातळी खालावल्याने ग्रामीण भागात ओला चाराही शिल्लक नाही. परिणामी जनावरांना चारा उपलब्ध करुन देताना पशूपालकाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. ही परिस्थिती सध्या निर्माण झाली असून जिल्हा प्रशासन मात्र आकडेवारीवरुन चारा मूबलक प्रमाणात उपलब्ध असल्याने सांगत आहे. जिल्हा पशूसंवर्धन विभागाने २० जूनपर्यंतच्या चाºयाचे नियोजन केले आहे. या नियोजनात खरीप हंगामातून ३ लाख ९५ हजार ८०० मेट्रीक टन, रब्बी हंगामातून ७४ हजार ५०० मे. टन, जंगल, वन क्षेत्र व पडीक जमिनीवर ३० हजार मे. टन, वैरण पिकापासून ४० हजार ३०० मे. टन आणि वैरण विकास योजनेतून उपलब्ध होणारा चारा असा ५ लाख ९० हजार ८०० मे. टन चारा उपलब्ध होईल, असा अंदाज बांधला जात आहे.चाºयाची ही उपलब्धता दर्शविताना प्रत्यक्षात पशू संवर्धन विभागाने कोणत्याही उपाययोजना केल्या नाहीत. खरीप हंगामात चारा पिकासाठी पाण्याची सुविधा केली नाही. रब्बी हंगाम पूर्णत: वाया गेला असताना या हंगामात चारा उपलब्ध करुन देण्यासाठी ठोस उपाययोजना न करताच केवळ चाºयाचा अंदाज बांधून नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे प्रशासनाचे नियोजन पूर्णत: शेतकºयांच्याच भरोस्यावर असल्याचे दिसत आहे.प्रत्यक्षात ग्रामीण भागात परिस्थिती बिकट झाली आहे. जनावरांसाठी चारा शिल्लक नसल्याने शेतकºयांना महागामोलाचा चारा विकत घ्यावा लागत आहे. तर दुसरीकडे प्रशासनाने एकाही ठिकाणी चारा छावणी सुरु केली नसल्याने हजारो जनावरे पशूपालकांच्या प्रयत्नांवरच जगत आहेत. जिल्हा प्रशासनाने ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.एकमेव चारा शिबीर४परभणी जिल्ह्यामध्ये थेट राज्य शासनामार्फत राणीसावरगाव येथे एकमेव चारा शिबीर सुरु आहे. या चारा शिबिरात ४०५ जनावरांच्या चाºयाची व्यवस्था केली आहे; परंतु, प्रत्यक्षात जनावरांची संख्या लाखात असताना उपाययोजना मात्र मोजक्याच जनावरांसाठी केली जात आहे. जिंतूर तालुक्यात आडगाव व चारठाणा मंडळात चारा छावणी सुरु करावी लागणार असल्याची शक्यता प्रशासनाने वर्तविली आहे. अद्यापपर्यंत एकाही ठिकाणी चारा छावणी सुरु केली नाही, हे विशेष.

टॅग्स :parabhaniपरभणीdroughtदुष्काळ