शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

परभणी : कागदोपत्रीच केले चाऱ्याचे नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 00:43 IST

जिल्ह्यामध्ये निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीमध्ये जनावरांसाठी चारा उपलब्ध करण्यासाठी केवळ कागदोपत्रीच नियोजन करण्यात आले असून प्रत्यक्षात चारा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रशासनाकडून ठोस पाऊले उचलली जात नाहीत. परिणामी जनावरांना उपासमारीचा सामना करण्याची भिती निर्माण झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यामध्ये निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीमध्ये जनावरांसाठी चारा उपलब्ध करण्यासाठी केवळ कागदोपत्रीच नियोजन करण्यात आले असून प्रत्यक्षात चारा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रशासनाकडून ठोस पाऊले उचलली जात नाहीत. परिणामी जनावरांना उपासमारीचा सामना करण्याची भिती निर्माण झाली आहे.यावर्षी दुष्काळी परिस्थितीमध्ये जिल्ह्यात पाण्याच्या टंचाई बरोबरच चारा टंचाईचाही सामना करावा लागत आहे. यावर्षी परतीचा पाऊस झाला नसल्याने रब्बी हंगामात पेरणी झाली नाही. त्यामुळे चारा कमी प्रमाणात उपलब्ध आहे. जमिनीतील पाणीपातळी खालावल्याने ग्रामीण भागात ओला चाराही शिल्लक नाही. परिणामी जनावरांना चारा उपलब्ध करुन देताना पशूपालकाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. ही परिस्थिती सध्या निर्माण झाली असून जिल्हा प्रशासन मात्र आकडेवारीवरुन चारा मूबलक प्रमाणात उपलब्ध असल्याने सांगत आहे. जिल्हा पशूसंवर्धन विभागाने २० जूनपर्यंतच्या चाºयाचे नियोजन केले आहे. या नियोजनात खरीप हंगामातून ३ लाख ९५ हजार ८०० मेट्रीक टन, रब्बी हंगामातून ७४ हजार ५०० मे. टन, जंगल, वन क्षेत्र व पडीक जमिनीवर ३० हजार मे. टन, वैरण पिकापासून ४० हजार ३०० मे. टन आणि वैरण विकास योजनेतून उपलब्ध होणारा चारा असा ५ लाख ९० हजार ८०० मे. टन चारा उपलब्ध होईल, असा अंदाज बांधला जात आहे.चाºयाची ही उपलब्धता दर्शविताना प्रत्यक्षात पशू संवर्धन विभागाने कोणत्याही उपाययोजना केल्या नाहीत. खरीप हंगामात चारा पिकासाठी पाण्याची सुविधा केली नाही. रब्बी हंगाम पूर्णत: वाया गेला असताना या हंगामात चारा उपलब्ध करुन देण्यासाठी ठोस उपाययोजना न करताच केवळ चाºयाचा अंदाज बांधून नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे प्रशासनाचे नियोजन पूर्णत: शेतकºयांच्याच भरोस्यावर असल्याचे दिसत आहे.प्रत्यक्षात ग्रामीण भागात परिस्थिती बिकट झाली आहे. जनावरांसाठी चारा शिल्लक नसल्याने शेतकºयांना महागामोलाचा चारा विकत घ्यावा लागत आहे. तर दुसरीकडे प्रशासनाने एकाही ठिकाणी चारा छावणी सुरु केली नसल्याने हजारो जनावरे पशूपालकांच्या प्रयत्नांवरच जगत आहेत. जिल्हा प्रशासनाने ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.एकमेव चारा शिबीर४परभणी जिल्ह्यामध्ये थेट राज्य शासनामार्फत राणीसावरगाव येथे एकमेव चारा शिबीर सुरु आहे. या चारा शिबिरात ४०५ जनावरांच्या चाºयाची व्यवस्था केली आहे; परंतु, प्रत्यक्षात जनावरांची संख्या लाखात असताना उपाययोजना मात्र मोजक्याच जनावरांसाठी केली जात आहे. जिंतूर तालुक्यात आडगाव व चारठाणा मंडळात चारा छावणी सुरु करावी लागणार असल्याची शक्यता प्रशासनाने वर्तविली आहे. अद्यापपर्यंत एकाही ठिकाणी चारा छावणी सुरु केली नाही, हे विशेष.

टॅग्स :parabhaniपरभणीdroughtदुष्काळ