शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

परभणी जिल्हा : सात हजार जलस्त्रोतांची होणार तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 00:21 IST

दूषित पाण्यापासून नागरिकांच्या आरोग्याचा बचाव व्हावा, यासाठी महाराष्ट्र शासनाच्या राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमाच्या वतीने जिल्ह्यातील ७ हजार ११५ जलस्त्रोतांची रासायनिक तपासणी केली जाणार आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : दूषित पाण्यापासून नागरिकांच्या आरोग्याचा बचाव व्हावा, यासाठी महाराष्ट्र शासनाच्या राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमाच्या वतीने जिल्ह्यातील ७ हजार ११५ जलस्त्रोतांची रासायनिक तपासणी केली जाणार आहे़या तपासणीच्या अनुषंगाने सोमवारी जि़प़चे मुख्य कार्यकारी अधिकारी बी़पी़ पृथ्वीराज यांच्या सूचनेनुसार येथील जिल्हा परिषदेत गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी, तालुकास्तरावरील गट व समूह समन्वयकांची कार्यशाळा पार पडली़ या कार्यशाळेत उपमुख्य कार्यकारी अधिकारी एम़व्ही़ करडखेलकर यांनी उपस्थितांना जिल्ह्यातील जलस्त्रोतांची माहिती देऊन पाण्याची रासायनिक तपासणी कशा पद्धतीने करावी, या विषयी मार्गदर्शन केले़ तसेच आॅनलाईन अ‍ॅप्लीकेशन संदर्भातही माहिती दिली़ जिल्ह्यातील ७ हजार ११५ जलस्त्रोतांची तपासणी या उपक्रमांतर्गत करण्यात येणार आहे़ जलस्त्रोतांच्या माध्यमातूनच साथ रोगांचा फैलाव होतो़ही बाब लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाच्या राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमाच्या वतीने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे़ विशेष म्हणजे आतापर्यंत जिल्ह्यातील १५० जलस्त्रोतांची तपासणीही पूर्ण झाली़ या कार्यशाळेमध्ये जलस्त्रोतांच्या रासायनिकत तपासणीबाबतचे तांत्रिक मुद्देही उपस्थितांना सांगण्यात आले़यावेळी अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते़

टॅग्स :parabhaniपरभणीwater scarcityपाणी टंचाईzpजिल्हा परिषद