शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

परभणी जिल्ह्याला निम्न दूधनातून मिळणार पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 23:02 IST

जिल्ह्यात निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर निम्न दूधना प्रकल्पातून १५ दलघमी पाणी सोडण्यास मंजुरी देण्यात आली असून, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांना या संदर्भातील आदेश जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी दिले आहेत़ त्यामुळे जिल्हावासियांचा पाण्याचा प्रश्न काही अंशी निकाली निघाला आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यात निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर निम्न दूधना प्रकल्पातून १५ दलघमी पाणी सोडण्यास मंजुरी देण्यात आली असून, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांना या संदर्भातील आदेश जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी दिले आहेत़ त्यामुळे जिल्हावासियांचा पाण्याचा प्रश्न काही अंशी निकाली निघाला आहे़परभणी जिल्ह्यात दुष्काळामुळेपाणी टंचाई गंभीर झाली आहे़ आ.डॉ.राहुल पाटील यांनी ही बाब परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या निदर्शनास आणून दिली़ शेतकऱ्यांनीही रावते यांच्याशी संपर्क साधून निम्न दूधनातून पाणी सोडण्याची मागणी केली होती़ त्यानुसार दिवाकर रावते यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन जिल्ह्यातील टंचाईचा आढावा त्यांच्यासमोर मांडला़ त्यानंतर विशेष बैठक घेण्यात आली़ निम्न दूधना प्रकल्पातून पाणी सोडणे आवश्यक असल्याचे रावते यांनी निदर्शनास आणून दिले़ त्यावरून मुख्यमंत्र्यांनी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांना आदेश दिले़ त्यानुसार एक बैठक घेऊन निम्न दूधना प्रकल्पातून १५ दलघमी पाणी सोडण्याचा निर्णय झाला़ तसे आदेश विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांना देण्यात आले़ येत्या १५ मेपर्यंत प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग होईल, अशी माहिती मिळाली आहे़ दरम्यान, रावते यांच्या प्रयत्नामुळे दुष्काळग्रस्त नागरिकांना दिलासा मिळणार आहे़आ़पाटील यांनी केली होती मागणीनिम्न दूधना प्रकल्पातून पाणी सोडण्याची मागणी करीत आ़ डॉ़ राहुल पाटील यांनी या प्रश्नी आंदोलनाचा इशारा दिला होता़ तसेच परिवहन दिवाकर रावते यांच्याकडेही पाठपुरावा केला होता़ निम्न दूधना प्रकल्पात ३६ दलघमी पाणी असून, १५ दलघमी पाणी सोडणे शक्य आहे, असेही त्यांनी निदर्शनास आणून दिले होते़ पाणी सोडण्याचा निर्णय झाल्याने ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीdroughtदुष्काळWaterपाणी