शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: हत्येच्या कटावरुन मनोज जरांगेंचा थेट धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, '२.५ कोटींची डील आणि...'
2
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
3
कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ होणार! पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर ठेवण्यासाठी सरकारचा मास्टरप्लॅन
4
Axar Patel: विराट कोहली, ख्रिस गेलनंतर फक्त अक्षर पटेलच करू शकला 'अशी' कामगिरी!
5
Wife सोबत मिळून Post Office च्या या स्कीममध्ये ₹४ लाख जमा करा, पाहा महिन्याला किती मिळेल व्याज?
6
अजित पवारांचा घूमजाव, आधी म्हणाले कल्पना होती, आता म्हणतात, "पार्थच्या जमीन व्यवहाराची माहिती नाही"
7
‘तू बघत राहा, मी खोलीत गुदमरून मरेन’, पत्नीला  मेसेज पाठवून पतीने दरवाजा केला बंद, त्यानंतर...
8
महामार्गांवरून भटक्या कुत्र्यांना हटवा, त्यांचे लसीकरण आणि नसबंदी करून...; सर्वोच्च न्यायालयाचे तीन आदेश
9
Larissa Nery : "मी राहुल गांधींना ओळखत नाही, भारतात..."; ब्राझिलियन महिलेला वाटली भीती, केला मोठा खुलासा
10
दुकानातून हळूहळू कमी होत होता दारूचा स्टॉक; कपल करत होतं भरलेल्या बाटल्यांची चोरी! कसं पकडलं?
11
२५ लाख ते ६० लाख... गृहकर्जावर महिन्याचा खर्च किती? तुमचा EMI कमी करण्यासाठी 'हा' कालावधी निवडा
12
मारुतीने व्हिक्टोरिस लाँच केली अन् या कारवर बंपर सूट दिली; ऑक्टोबरपेक्षा आणखी ५४,००० रुपयांनी स्वस्त केली...
13
पहिल्याच दिवशी जमिनीवर आला 'हा' आयपीओ; गुंतवणूकदारांना मोठं नुकसान, GMP नं केला 'विश्वासघात'
14
Jasprit Bumrah Record : बुमराहचा मोठा पराक्रम! पाकिस्तानी गोलंदाजाला धोबीपछाड देत बनला 'नंबर वन'
15
Astro Tips: काही जातकांच्या पत्रिकेत विवाह योगच नसतो; त्यांनी कोणता उपाय करावा? पाहू 
16
२०२६ हे पाकिस्तानसाठी 'प्रलयाचे वर्ष'? ज्योतिषांचा धक्कादायक अंदाज; भारतासोबत मोठ्या युद्धाचे संकेत...
17
शनिवारी संकष्ट चतुर्थी, ३ राशींना साडेसाती; ‘हे’ ५ उपाय नक्की करा, शनिदोषातून मुक्तता मिळवा!
18
Video - बॅकबेंचर ते चार्टर्ड अकाउंटंट... लेक CA होताच बापाने मारली घट्ट मिठी, डोळ्यांत आनंदाश्रू
19
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
20
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल

परभणी जिल्ह्यात २ लाख हेक्टर क्षेत्र बोंडअळीने बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 00:47 IST

जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकरी बोंडअळीने त्रस्त झाले असून कृषी विभागाने केलेल्या प्रत्यक्ष पाहणीमध्ये जिल्ह्यातील १ लाख ९१ हजार ७०९ हेक्टर क्षेत्रावरील कापसाला बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या संदर्भात कृषी विभागाने एक अहवाल तयार केला असून त्यात ही माहिती नमूद केली आहे. विशेष म्हणजे, प्रादुर्भावग्रस्त २१ हजार २९ हेक्टरवरील पिकांचे पंचनामेही पूर्ण झाले आहेत.

मारोती जुंबडे।लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकरी बोंडअळीने त्रस्त झाले असून कृषी विभागाने केलेल्या प्रत्यक्ष पाहणीमध्ये जिल्ह्यातील १ लाख ९१ हजार ७०९ हेक्टर क्षेत्रावरील कापसाला बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या संदर्भात कृषी विभागाने एक अहवाल तयार केला असून त्यात ही माहिती नमूद केली आहे. विशेष म्हणजे, प्रादुर्भावग्रस्त २१ हजार २९ हेक्टरवरील पिकांचे पंचनामेही पूर्ण झाले आहेत.यावर्षीच्या खरीप हंगामात २ लाख ९ हजार ४८ हेक्टर क्षेत्र कापसासाठी प्रस्तावित केले होते. प्रत्यक्षात १ लाख ९१ हजार ७०९ हेक्टरवर कापसाची लागवड झाली. प्रस्तावित क्षेत्रापैकी ९१ टक्के कापसाची लागवड झाली आहे. विशेष म्हणजे, मागील वर्षी सोयाबीनला भाव मिळाला नसल्याने यंदाच्या खरीप हंगामात शेतकरी कापूस लागवडीकडे वळाले होते. इतर पिकांच्या तुलनेत जिल्ह्यात कापसाची लागवड सर्वाधिक झाली आहे. त्यामुळे शेतकºयांच्या सर्व आशा या पिकांवर होत्या. खरीप हंगामातील पिके काढणीला आल्यानंतर सुरुवातीला सोयाबीन, मूग, उडीद या पिकांची काढणी झाली. त्या पाठोपाठ कापसाचीही वेचणी करण्यास शेतकºयांनी सुरुवात केली. खरीप हंगामातील हा शेवटचा टप्पा होता. जिल्हाभरातील बहुतांश शेतकºयांची वेचणी पूर्ण झाल्यानंतर कापसावर बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसू लागला. बोंडअळीच्या नियंत्रणासाठी शेतकºयांनी विविध प्रयत्न केले. मात्र ही अळी नियंत्रणात येण्याऐवजी वाढतच गेली. परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर बनू लागली.बोंडअडळीच्या प्रादुर्भावासंदर्भात सर्वच तालुक्यातून कृषी विभागाकडे तक्रारी दाखल होत गेल्या. वाढत्या तक्रारी लक्षात घेऊन कृषी विभागानेही या संकटाचे गांभीर्य ओळखले. तक्रारीचा अहवाल शासनाकडे पाठविल्यानंतर सुरुवातीला शेतकºयांकडून रितसर तक्रारी दाखल करुन घेण्यात आल्या आणि आता तर थेट पंचनामेच करण्याचे आदेश कृषी विभागाला मिळाले आहेत.याच दरम्यानच्या काळात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने कृषी सहाय्यकांच्या माध्यमातून जिल्ह्यातील बोंडअळीच्या प्रादूर्भावाचे सर्व्हेक्षण करण्यात आले. आठ दिवसांपूर्वी हे सर्व्हेक्षण पूर्ण झाले असून त्याचा अहवाल कृषी विभागाने तयार केला आहे. या अहवालानुसार जिल्ह्यात लागवड झालेल्या १ लाख ९१ हजार ७०९ हेक्टरवरील कापूस पिकापैकी सर्वच्या सर्व क्षेत्र या अळीने वेढले आहे. त्यामुळे १०० टक्के पीक प्रादूर्भावग्रस्त असल्याचेच यावरुन दिसत आहे.यावर्षी सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाला असला तरी पिकांचे उत्पादन बºयापैकी होईल, अशी शेतकºयांना अपेक्षा होती. मात्र, शेतकºयांना यावर्षीही नुकसान सहन करावे लागत आहे.सोयाबिनचे उत्पादन चांगले झाले परंतु सोयाबिनला हमी भाव मिळाला नाही. तर दुसरीकडे कापसावर बोंडअळीचा प्रादूर्भाव झाल्याने शेतकºयांच्या संकटात भर पडली आहे. दोन्ही नगदी पिकांनी धोका दिल्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा आर्थिक अडचणीत सापडला आहे. जिल्ह्यातील शेतकºयांची ही परिस्थिती लक्षात घेता कापसाला शासनाने नुकसान भरपाई द्यावी, अशी अपेक्षा शेतकरी बाळगून आहेत.१०० टक्के क्षेत्र प्रादुर्भावग्रस्तकृषी विभागाने बीटी कापसावर झालेल्या अळीच्या प्रादूर्भावाचे सर्व्हेक्षण केले असून त्यात आर्थिक नुकसानीच्या पातळीमध्ये (ईटीएल) पिकांचे सर्व्हेक्षण करण्यात आले. तेव्हा जिल्ह्यातील सर्वच्या सर्व क्षेत्र प्रादूर्भावग्रस्त असल्याचे या विभागाने जाहीर केले आहे. त्यानुसार परभणी तालुक्यात ३४ हजार ४१७ हेक्टर, गंगाखेड १६ हजार ८९०, पाथरी २३ हजार ५४०, जिंतूर २५ हजार ३८१, पूर्णा ११ हजार ४७१, पालम १२ हजार ७९१, सेलू २९ हजार ६४३, सोनपेठ १७ हजार ४० आणि मानवत तालुक्यातील २० हजार ५५६ हेक्टर कापसाचे क्षेत्र प्रादूर्भावग्रस्त असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.२० हजार शेतकºयांच्या पिकांचा पंचनामाजिल्ह्यातील कापूस उत्पादकांपैकी २० हजार ६६६ शेतकºयांच्या प्रत्यक्ष शेतावर जाऊन कृषी विभागाने पिकांचा पंचनामा केला आहे. १६ डिसेंबरपर्यंत २१ हजार २९ हेक्टर क्षेत्रावरील कापसाचा पंचनामा पूर्ण झाला होता. त्यात सेलू तालुक्यातील सर्वाधिक ७ हजार ९५० हेक्टर, पूर्णा तालुक्यातील ६ हजार १९७ हेक्टर.परभणी तालुक्यातील १ हजार ४४८ हेक्टर, जिंतूर १ हजार ४१० हेक्टर, पाथरी १ हजार १३२ हेक्टर, मानवत १ हजार ८९ हेक्टर, गंगाखेड ८३० हेक्टर, सोनपेठ ७८५ हेक्टर आणि पालम तालुक्यातील ३२९ शेतकºयांच्या १८८ हेक्टर क्षेत्रावरील कापसाचा पंचनामा पूर्ण झाला आहे.आणखी १ लाख ७० हजार हेक्टर क्षेत्रावरील कापसाचे पंचनामे करण्याचे काम शिल्लक असून कृषी विभागाची यंत्रणा पंचनामे करण्याच्या कामात गुंतली आहे. येत्या आठ दिवसात पंचनामे पूर्ण होतील. त्यानंतर पंचनाम्यांचा अहवाल शासनाकडे पाठविला जाणार असून शासन यावर काय निर्णय घेते, याकडे शेतकºयांचे लक्ष लागले आहे.