शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकात्यात हायव्होल्टेज ड्रामा; ममता बॅनर्जींकडून ईडीविरोधात FIR वर FIR; प्रकरण कोर्टात पोहोचले...
2
तेलंगणा, पंजाबमध्ये बॅलेट पेपरवर मतदान झाले, तिथे भाजप चौथ्या, सातव्या नंबरवर फेकला गेला : राज ठाकरे
3
'या' ६ सरकारी स्कीम्समध्ये मिळतो लाखोंचा लाभ, प्रीमिअम ₹१०० पेक्षाही कमी; गरीब असो वा श्रीमंत सर्वच घेऊ शकतात फायदा
4
हॅलो, इसको भेज, उसको भेज...! पाकिस्तानने युपीआयपेक्षा फास्ट पेमेंट सिस्टीम शोधली; बोलताच पैसे ट्रान्सफर होणार
5
Lokmat Exclusive: ठाकरे मुंबई नक्कीच गमावतील, महापालिकांमध्ये निवडणुकोत्तर नवीन समीकरणे: CM देवेंद्र फडणवीस
6
१० जानेवारी: गुरु-आदित्य योग: तुमच्या आयुष्यातील अडचणी निवारणासाठी उत्तम योग; करा 'हा' उपाय 
7
व्हेनेझुएलाचं कच्चं तेल खरेदी करू शकते रिलायन्स इंडस्ट्रीज; का आणि कशी बदलली परिस्थिती?
8
क्रूरतेचा कळस! जेवण वाढायला उशीर झाला म्हणून पतीने पत्नीला संपवलं; मृतदेहापाशीच बसून राहिला अन्..
9
Stock Market Today: सततच्या घसरणीनंतर आज शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स १५० अंकांनी वधारला; Vodafone-Idea मध्ये ५% ची तेजी
10
"सगळ्या योजना आखल्या पण याची कधी अपेक्षाच केली नाही"; ठाकरे बंधुंच्या युतीवर राज ठाकरेंचा पलटवार
11
IT हब की नरकाचे द्वार? बेंगळुरूत पहाटे ३:३० वाजताही वाहतूक कोंडी सुटेना; दोन-दोन तास...
12
५ वर्षांचं अफेअर, ३ मुलं, पण इन्स्टावरील प्रेमासाठी घर सोडलं; पतीनेच स्वहस्ते लावून दिलं पत्नीचं दुसरं लग्न!
13
Crypto वर देखरेख ठेवणं कठीण! RBI नंतर आता आयकर विभागानंही हात वर केले, प्रकरण काय?
14
रिमांड संपली, पाप उघडं पडलं! बांगलादेश दिपू हत्या प्रकरणातील १८ जण कोठडीत; त्यांनी जे कारण सांगितलं..
15
आजचे राशीभविष्य : शुक्रवार ९ जानेवारी २०२६; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
16
९ वर्षांत ७५ हजार कोटी खर्च केले तर मग विकास कुठे?: अजितदादांचा भाजपा नेत्यांना थेट सवाल
17
तू तिच्या गाडीला अपघात कर, मी तिला वाचवतो...; तरुणीला इम्प्रेस करण्याचा प्लॅन, सफलही झाला पण...
18
“स्वत:च्या भरवशावर बहुमत मिळवू; परंतु साथीदारांना सोडणार नाही”; CM फडणवीस यांचा टॉक शो
19
ठाकरेंच्या गुहेत एकनाथ शिंदे यांची कठीण परीक्षा; भाजपा मदतीने तगडे आव्हान पार केले तर...
20
आंदोलकांचा इराणच्या राजधानीवर कब्जा! रात्रीच्या अंधारात सरकारी कार्यालये ताब्यात, तेहरानने हवाई क्षेत्र बंद केले...
Daily Top 2Weekly Top 5

परभणी जिल्ह्यात वर्षभरात ४१२ जणांना सर्पदंश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 00:11 IST

२०१७-१८ या वर्षांत जिल्ह्यातील ४१२ नागरिकांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात सर्पदंश झाल्याने उपचार घेतले असून, त्यापैकी ५ जणांवर उपचारा दरम्यान मृत्यू ओढावल्याची माहिती समोर आली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : २०१७-१८ या वर्षांत जिल्ह्यातील ४१२ नागरिकांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात सर्पदंश झाल्याने उपचार घेतले असून, त्यापैकी ५ जणांवर उपचारा दरम्यान मृत्यू ओढावल्याची माहिती समोर आली आहे़यावर्षी जिल्ह्याचे तापमान ४५ अंशापर्यंत पोहोचले होते़ वाढत्या तापमानापासून बचाव करण्यासाठी साप जमिनीमध्ये वारूळ करतात़ आठ दिवसांपासून जिल्ह्यात सर्वदूर पाऊस होत आहे़ या पावसामुळे साप शेतशिवारात सुरक्षित जागेचा शोध घेण्यासाठी वारुळाच्या बाहेर येतात. सध्या जिल्ह्यात ग्रामीण भागात शेतकरी शेती काम करीत असताना अनेक वेळा शेतकऱ्यांना सर्पदर्शनही होते़काही वेळा नजरचुकीने शेतकºयांना सर्पदंश होतो़ तसेच पावसाळ्याच्या सुरुवातीला वसाहतींमध्ये साप निघण्याचे प्रमाण वाढते. अशा वेळी सर्पदंश झालेल्या रुग्णांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात हलविले जाते. मागील वर्षभरात जिल्हा सामान्य रुग्णालयात असे ४१२ रुग्ण दाखल झाले होते. सर्पदंश झालेल्या रुग्णांना वाचविण्यासाठी जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी आटोकाट प्रयत्न केले. त्यामुळे मृत्यूचे प्रमाण अत्यल्प राहिले. रुग्णालयात दाखल झालेल्या ४१२ रुग्णांपैकी केवळ ५ रुग्णांवरच उपचारादरम्यान मृत्यू ओढवल्याची माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयातून देण्यात आली.एका महिन्यात२४ जणांना सर्पदंशजिल्ह्यातील सर्पदंश झालेल्या बहुतांश रुग्णांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी आणले जाते़ २०१७-१८ या वर्षांत ४१२ नागरिकांना सर्पदंश झाला असल्याची माहिती समोर आली आहे़ विशेष म्हणजे, एप्रिल २०१८ मध्ये तब्बल २४ जणांना सर्पदंश झाला होता. या रुग्णांना वाचविण्यात डॉक्टरांना यश मिळाले़ त्यामुळे सर्पदंश झालेले २४ नागरिकांना जीवदान मिळाले आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीhospitalहॉस्पिटलFarmerशेतकरीRainपाऊस