शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विजयाच्या पडद्यामागे विनोद तावडेंचा हात; भाजपा मोठे बक्षीस देण्याची शक्यता...
2
“निवडणूक आयुक्तांना नेपाळला पाठवा, तिथेही भाजपा सरकार स्थापन करेल”; कुणाल कामराची टीका
3
कॅश-कट्टा डावानं तेजस्वींचं स्वप्न उधळलं; पण विजयानंतरही भाजपला मोठं टेंशन! नीतीश कुमारांशिवाय सरकार बनू शकतं, पण...
4
बिहारमध्ये आज जे तेजस्वी यादवांसोबत घडलं, तेच २०१०मध्ये लालू प्रसादांसोबतही घडलं होतं...
5
उपमुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मुकेश साहनींच्या पदरी भोपळा; VIP चा दारुण पराभव...
6
मी काय बोललो समजलं का? धर्मेंद्र यांच्या प्रकरणावरुन 'भिडू'ने पापाराझींची मराठीत घेतली शाळा
7
सोन्या-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात घसरले, खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट Gold ची नवी किंमत
8
Kuldeep Yadav: कुलदीप यादवच्या नावावर नव्या विक्रमाची नोंद, घरच्या मैदानावर घेतल्या १५० विकेट्स!
9
Delhi Blast : दिल्ली स्फोटानंतर काश्मीरचा 'टिकिंग टाईम बॉम्ब' डॉक्टर बेपत्ता; उमरसोबत केलं होतं काम
10
कोण आहेत नागपूरचे सुपुत्र आयपीएस विजय साखरे ? मराठमोळ्या अधिकाऱ्याकडे दिल्लीतील स्फोटप्रकरणी एनआयए पथकाचे नेतृत्व
11
"एनडीए जोरदार आघाडीवर...": बिहार निकालांवर शशी थरूर यांचे मोठे विधान; काँग्रेसला दिला सल्ला
12
पर्सनल लोन घेताय? केवळ व्याजदर नका पाहू! 'या' Hidden Charges मुळे कर्ज बनते डोकेदुखी!
13
अंता पोटनिवडणुकीत १५९ मतांमुळे भाजपाची लाज राखली; मात्र काँग्रेस उमेदवारानं मारली बाजी
14
"नितीश कुमार मुख्यमंत्री होते, आहेत अन् राहतील..."; JDU नं केलेली पोस्ट काही मिनिटांतच डिलीट
15
Nitin Gilbile: कारमध्येच मित्राला घातल्या गोळ्या, नितीन गिलबिले हत्या प्रकरणात लोणावळ्यात एकाला अटक
16
ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल यांचं निधन, वयाच्या ९८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
आरोग्य विमा घेताना धूम्रपान, मद्यपान या सवयी जाहीर करणे का महत्त्वाचे आहे? काय म्हणताहेत एक्सपर्ट
18
कोटींचा आकडा गाठायचा आहे? 'हॉट स्टॉक टिप्स' सोडा, फक्त 'या' २ सवयी पाळा; तज्ञांनी सांगितला 'श्रीमंतीचा मंत्र'!
19
Bihar Election 2025 Result: धीरेंद्र शास्त्रींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “राष्ट्रवाद...”
20
Turmeric Coffee : हटके ट्रेंड! कॉफीला द्या हळदीचा तडका; आश्चर्यकारक फायदे समजल्यावर रोजच न चुकता प्याल
Daily Top 2Weekly Top 5

परभणी जिल्ह्यात वर्षभरात ४१२ जणांना सर्पदंश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 00:11 IST

२०१७-१८ या वर्षांत जिल्ह्यातील ४१२ नागरिकांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात सर्पदंश झाल्याने उपचार घेतले असून, त्यापैकी ५ जणांवर उपचारा दरम्यान मृत्यू ओढावल्याची माहिती समोर आली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : २०१७-१८ या वर्षांत जिल्ह्यातील ४१२ नागरिकांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात सर्पदंश झाल्याने उपचार घेतले असून, त्यापैकी ५ जणांवर उपचारा दरम्यान मृत्यू ओढावल्याची माहिती समोर आली आहे़यावर्षी जिल्ह्याचे तापमान ४५ अंशापर्यंत पोहोचले होते़ वाढत्या तापमानापासून बचाव करण्यासाठी साप जमिनीमध्ये वारूळ करतात़ आठ दिवसांपासून जिल्ह्यात सर्वदूर पाऊस होत आहे़ या पावसामुळे साप शेतशिवारात सुरक्षित जागेचा शोध घेण्यासाठी वारुळाच्या बाहेर येतात. सध्या जिल्ह्यात ग्रामीण भागात शेतकरी शेती काम करीत असताना अनेक वेळा शेतकऱ्यांना सर्पदर्शनही होते़काही वेळा नजरचुकीने शेतकºयांना सर्पदंश होतो़ तसेच पावसाळ्याच्या सुरुवातीला वसाहतींमध्ये साप निघण्याचे प्रमाण वाढते. अशा वेळी सर्पदंश झालेल्या रुग्णांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात हलविले जाते. मागील वर्षभरात जिल्हा सामान्य रुग्णालयात असे ४१२ रुग्ण दाखल झाले होते. सर्पदंश झालेल्या रुग्णांना वाचविण्यासाठी जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी आटोकाट प्रयत्न केले. त्यामुळे मृत्यूचे प्रमाण अत्यल्प राहिले. रुग्णालयात दाखल झालेल्या ४१२ रुग्णांपैकी केवळ ५ रुग्णांवरच उपचारादरम्यान मृत्यू ओढवल्याची माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयातून देण्यात आली.एका महिन्यात२४ जणांना सर्पदंशजिल्ह्यातील सर्पदंश झालेल्या बहुतांश रुग्णांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी आणले जाते़ २०१७-१८ या वर्षांत ४१२ नागरिकांना सर्पदंश झाला असल्याची माहिती समोर आली आहे़ विशेष म्हणजे, एप्रिल २०१८ मध्ये तब्बल २४ जणांना सर्पदंश झाला होता. या रुग्णांना वाचविण्यात डॉक्टरांना यश मिळाले़ त्यामुळे सर्पदंश झालेले २४ नागरिकांना जीवदान मिळाले आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीhospitalहॉस्पिटलFarmerशेतकरीRainपाऊस