शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

परभणी जिल्ह्यात वर्षभरात ४१२ जणांना सर्पदंश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 00:11 IST

२०१७-१८ या वर्षांत जिल्ह्यातील ४१२ नागरिकांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात सर्पदंश झाल्याने उपचार घेतले असून, त्यापैकी ५ जणांवर उपचारा दरम्यान मृत्यू ओढावल्याची माहिती समोर आली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : २०१७-१८ या वर्षांत जिल्ह्यातील ४१२ नागरिकांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात सर्पदंश झाल्याने उपचार घेतले असून, त्यापैकी ५ जणांवर उपचारा दरम्यान मृत्यू ओढावल्याची माहिती समोर आली आहे़यावर्षी जिल्ह्याचे तापमान ४५ अंशापर्यंत पोहोचले होते़ वाढत्या तापमानापासून बचाव करण्यासाठी साप जमिनीमध्ये वारूळ करतात़ आठ दिवसांपासून जिल्ह्यात सर्वदूर पाऊस होत आहे़ या पावसामुळे साप शेतशिवारात सुरक्षित जागेचा शोध घेण्यासाठी वारुळाच्या बाहेर येतात. सध्या जिल्ह्यात ग्रामीण भागात शेतकरी शेती काम करीत असताना अनेक वेळा शेतकऱ्यांना सर्पदर्शनही होते़काही वेळा नजरचुकीने शेतकºयांना सर्पदंश होतो़ तसेच पावसाळ्याच्या सुरुवातीला वसाहतींमध्ये साप निघण्याचे प्रमाण वाढते. अशा वेळी सर्पदंश झालेल्या रुग्णांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात हलविले जाते. मागील वर्षभरात जिल्हा सामान्य रुग्णालयात असे ४१२ रुग्ण दाखल झाले होते. सर्पदंश झालेल्या रुग्णांना वाचविण्यासाठी जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी आटोकाट प्रयत्न केले. त्यामुळे मृत्यूचे प्रमाण अत्यल्प राहिले. रुग्णालयात दाखल झालेल्या ४१२ रुग्णांपैकी केवळ ५ रुग्णांवरच उपचारादरम्यान मृत्यू ओढवल्याची माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयातून देण्यात आली.एका महिन्यात२४ जणांना सर्पदंशजिल्ह्यातील सर्पदंश झालेल्या बहुतांश रुग्णांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी आणले जाते़ २०१७-१८ या वर्षांत ४१२ नागरिकांना सर्पदंश झाला असल्याची माहिती समोर आली आहे़ विशेष म्हणजे, एप्रिल २०१८ मध्ये तब्बल २४ जणांना सर्पदंश झाला होता. या रुग्णांना वाचविण्यात डॉक्टरांना यश मिळाले़ त्यामुळे सर्पदंश झालेले २४ नागरिकांना जीवदान मिळाले आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीhospitalहॉस्पिटलFarmerशेतकरीRainपाऊस