शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
16
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
17
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
18
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
19
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
20
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय

परभणी जिल्ह्यात वर्षभरात ४१२ जणांना सर्पदंश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 00:11 IST

२०१७-१८ या वर्षांत जिल्ह्यातील ४१२ नागरिकांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात सर्पदंश झाल्याने उपचार घेतले असून, त्यापैकी ५ जणांवर उपचारा दरम्यान मृत्यू ओढावल्याची माहिती समोर आली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : २०१७-१८ या वर्षांत जिल्ह्यातील ४१२ नागरिकांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात सर्पदंश झाल्याने उपचार घेतले असून, त्यापैकी ५ जणांवर उपचारा दरम्यान मृत्यू ओढावल्याची माहिती समोर आली आहे़यावर्षी जिल्ह्याचे तापमान ४५ अंशापर्यंत पोहोचले होते़ वाढत्या तापमानापासून बचाव करण्यासाठी साप जमिनीमध्ये वारूळ करतात़ आठ दिवसांपासून जिल्ह्यात सर्वदूर पाऊस होत आहे़ या पावसामुळे साप शेतशिवारात सुरक्षित जागेचा शोध घेण्यासाठी वारुळाच्या बाहेर येतात. सध्या जिल्ह्यात ग्रामीण भागात शेतकरी शेती काम करीत असताना अनेक वेळा शेतकऱ्यांना सर्पदर्शनही होते़काही वेळा नजरचुकीने शेतकºयांना सर्पदंश होतो़ तसेच पावसाळ्याच्या सुरुवातीला वसाहतींमध्ये साप निघण्याचे प्रमाण वाढते. अशा वेळी सर्पदंश झालेल्या रुग्णांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात हलविले जाते. मागील वर्षभरात जिल्हा सामान्य रुग्णालयात असे ४१२ रुग्ण दाखल झाले होते. सर्पदंश झालेल्या रुग्णांना वाचविण्यासाठी जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी आटोकाट प्रयत्न केले. त्यामुळे मृत्यूचे प्रमाण अत्यल्प राहिले. रुग्णालयात दाखल झालेल्या ४१२ रुग्णांपैकी केवळ ५ रुग्णांवरच उपचारादरम्यान मृत्यू ओढवल्याची माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयातून देण्यात आली.एका महिन्यात२४ जणांना सर्पदंशजिल्ह्यातील सर्पदंश झालेल्या बहुतांश रुग्णांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी आणले जाते़ २०१७-१८ या वर्षांत ४१२ नागरिकांना सर्पदंश झाला असल्याची माहिती समोर आली आहे़ विशेष म्हणजे, एप्रिल २०१८ मध्ये तब्बल २४ जणांना सर्पदंश झाला होता. या रुग्णांना वाचविण्यात डॉक्टरांना यश मिळाले़ त्यामुळे सर्पदंश झालेले २४ नागरिकांना जीवदान मिळाले आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीhospitalहॉस्पिटलFarmerशेतकरीRainपाऊस