शहरं
Join us  
Trending Stories
1
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
2
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
3
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
4
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
5
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
6
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
7
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
8
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
9
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
10
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
11
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
12
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
13
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
14
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
15
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
16
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
17
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
18
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
19
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
20
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?

परभणी : भौतिक सुविधांअभावी परीक्षार्थ्यांची गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 23:52 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येत असलेल्या बारावीच्या परिक्षेंतर्गत संबंधित परीक्षा केंद्रावरील भौतिक सुविधा अपुऱ्या पडल्याने एका-एका बेंचवर दोन-दोन विद्यार्थ्यांना बसवून परीक्षा द्यावी लागल्याचा प्रकार इंग्रजी पेपरच्या वेळी निदर्शनास आला आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येत असलेल्या बारावीच्या परिक्षेंतर्गत संबंधित परीक्षा केंद्रावरील भौतिक सुविधा अपुऱ्या पडल्याने एका-एका बेंचवर दोन-दोन विद्यार्थ्यांना बसवून परीक्षा द्यावी लागल्याचा प्रकार इंग्रजी पेपरच्या वेळी निदर्शनास आला आहे़जिल्ह्यात बारावीच्या परीक्षांना २१ फेब्रुवारीपासून प्रारंभ झाला आहे़ जिल्ह्यातील ५६ केंद्रांवर २४ हजार २६७ विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत़ ५६ केंद्रांपैकी काही परीक्षा केंद्रांमध्ये भौतिक सुविधांची कमतरता असल्याने त्याचा फटका परीक्षार्थ्यांना बसल्याची बाब पहिल्याच पेपरच्या दिवशी उघडकीस आली़ विशेष म्हणजे काही परीक्षा केंद्रांची चुकीची माहिती शिक्षण मंडळाला दिली असल्याने अधिकच्या विद्यार्थ्यांची व्यवस्था करताना संबंधित केंद्रप्रमुखांच्या नाकीनऊ आल्याचे स्पष्ट झाले आहे़ २१ फेब्रुवारी रोजी इंग्रजी विषयाचा पेपर होता़ त्यावेळी परभणी तालुक्यातील पेडगाव येथील कै़ हरिबाई वरपूडकर उच्च माध्यमिक विद्यालयात एकूण ७७४ विद्यार्थ्यांसाठी २४ वर्ग खोल्या असताना एका बेंचवर दोन-दोन विद्यार्थी बसल्याचे आढळून आले़ या शिवाय पालम शहरातील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या केंद्रावरही ३ हॉलमध्ये एका बेंचवर दोन-दोन विद्यार्थी बसले होते़ अशीच स्थिती या तालुक्यातील मार्तंडवाडी येथील संत गाडगे बाबा ज्युनिअर कॉलेज येथे होती़या केंद्रावर दोन हॉलमध्ये एका बेंचवर दोन-दोन विद्यार्थी बसले होते़ जिंतूर तालुक्यातील बोरी येथील श्रीमती शकुंतलाबाई कदम बोर्डीकर कनिष्ठ महाविद्यालयाच्या केंद्रावरील १० वर्ग खोल्यांमध्ये एका बेंचवर दोन-दोन विद्यार्थी बसले होते़ ऐन वेळी विद्यार्थ्यांची बसण्याबाबत गैरसोय झाली असली तरी वेळेचे भान व परीक्षेची घाई यामुळे परिक्षार्थ्यांनी यासंदर्भात अधिकृतपणे कोणाकडेही तक्रार केलेली नाही.जिल्ह्यातील सर्व केंद्रांवरील भौतिक सुविधांचा वस्तुनिष्ठ अहवाल पुन्हा एकदा मागवून घेण्याची गरज शिक्षण मंडळाला भासणार आहे़ शिवाय या केंद्रांची पुनर्रचनाही आगामी काळात करावी लागणार आहे़ संबंधित परीक्षा केंद्रावर परीक्षा देणाºया विद्यार्थ्यांची संख्या अगोदरच केंद्रप्रमुखांना कळविली जाते़ मग त्या परीक्षार्थ्यांची बसण्याची व्यवस्था का केली गेली नाही, असा सवाल उपस्थित होत आहे़शाळांच्या तक्रारीनंतरही पाठविले विद्यार्थीजिल्ह्यातील काही शाळांनी आपल्याकडे कमी वर्ग खोल्या असल्याने ठराविक संख्येत विद्यार्थी परीक्षेसाठी पाठवावेत, असे पत्र शिक्षणाधिकाºयांना व शिक्षण बोर्डाला दिले आहे़ परंतु, या शाळांच्या परस्परच त्यांच्या केंद्रावर विद्यार्थी पाठविल्याचा प्रकारही यानिमित्ताने समोर आला आहे़ त्यामुळेच वाढलेल्या विद्यार्थ्यांची गैरसोय होत असल्याचे स्पष्ट झाले आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीexamपरीक्षा