शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

परभणी: डिझेलअभावी थांबली एस.टी. बसची चाके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 00:00 IST

येथील एस.टी. महामंडळाच्या परभणी आगारातील डिझेल संपल्याने मंगळवारी आणि बुधवारी दुपारपर्यंत सुमारे दीड हजार कि.मी.च्या बसफेऱ्या रद्द कराव्या लागल्याची नामुष्की महामंडळावर ओढावली. त्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांची चांगलीच गैरसोय झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील एस.टी. महामंडळाच्या परभणी आगारातील डिझेल संपल्याने मंगळवारी आणि बुधवारी दुपारपर्यंत सुमारे दीड हजार कि.मी.च्या बसफेऱ्या रद्द कराव्या लागल्याची नामुष्की महामंडळावर ओढावली. त्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांची चांगलीच गैरसोय झाली.एस.टी. महामंडळाच्या परभणी येथील आगारातून दररोज शेकडो बसेस ग्रामीण भागातील वेगवेगळ्या मार्गावर धावतात. या बसेसना परभणी आगारातूनच डिझेलचा पुरवठा केला जातो. सोमवारी सायंकाळी आगारातील डिझेलचा साठा संपत आल्याने आॅनलाईन पद्धतीने डिझेलची नोंदणी करण्यात आली. मात्र डिझेल घेऊन येणारा टँकर बुधवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास परभणी आगारात पोहोचला. मंगळवारी पहाटेच्या सुमारास या आगारातील डिझेलचा साठा संपला. त्यामुळे ग्रामीण भागात बस घेऊन जाणाऱ्या चालक आणि वाहकांना डिझेल उपलब्ध झाले नाही. परिणामी बसगाड्या जागेवरच उभ्या करण्यात आल्या. परभणीतून आगारातून मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी सकाळी ४ मार्गावरील बसफेºया रद्द झाल्या. सुमारे ५०० कि.मी. अंतरावर बसेस धावल्या नाहीत. तर बुधवारी देखील हीच समस्या उद्भवली. सकाळी ७ वाजेपासून आगारातून ग्रामीण भागात बसफेºया सोडल्या जातात. मात्र डिझेल नसल्याने बुधवारी देखील बसेस धावल्या नाहीत. त्यामुळे सकाळपासून चालक-वाहक आगारात ठाण मांडून बसले होेते. बुधवारी दिवसभरात १० बसफेºया रद्द झाल्या असून, साधारणत: १ हजार कि.मी. प्रवासाचा फटका महामंडळाला सहन करावा लागला.दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास डिझेलचे टँकर आगारात दाखल झाल्यानंतर डिझेल उतरवून घेण्यात आले. त्यानंतर ग्रामीण भागातील बससेवा सुरळीत झाली. परभणी आगाराच्या या ढिसाळ कारभाराचा फटका ग्रामीण भागातील हजारो प्रवाशांना सहन कराव लागला. विशेष म्हणजे, ग्रामीण भागातील प्रवासी हेच एस.टी. महामंडळाचे मुख्य ग्राहक आहेत. शहरी भागातील बहुतांश प्रवासी रेल्वे, खाजगी वाहतुकीचा पर्याय निवडतात; परंतु ज्या प्रवाशांच्या भरोस्यावर महामंडळ उत्पन्न घेते, त्याच प्रवाशांना वाºयावर सोडल्याने प्रवाशांतून संताप व्यक्त होत आहे.आगारप्रमुखांची बघ्याची भूमिकाआगारातील डिझेल संपत असल्याचे लक्षात आल्यानंतर सोमवारी रात्री जिंतूर आगारातून सुमारे साडेतीन हजार लिटर डिझेल मागवून घेण्यात आले होेते. त्यामुळे मंगळवारी दिवसभराच्या बसफेºया करणे शक्य झाले असते; परंतु आगारप्रमुखांनी हे प्रकरण गांभिर्याने घेतले नाही. डिझेल उपलब्ध असतानाही संपल्याचे सांगत वाहक आणि चालकांना डिझेल देण्यात आले नाही. जिंतूरहून आणलेले डिझेल बसगाड्यांमध्ये भरायचे कोणी? असा प्रश्न होता. त्यामुळे हे डिझेल वापरलेच नाही. परिणामी हजारो प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागला. आगार प्रमुखाच्या या भोंगळ कारभाराविषयी संताप व्यक्त केला जात आहे.पैसे नसल्याने ओढवला प्रसंगएस.टी. महामंडळाच्या परभणी आगाराच्या इतिहासात प्रथमच डिझेलसाठी पैसे नसल्याने वेळेत डिझेल खरेदी करता आले नाही. परिणामी डिझेलअभावी बसेस धावल्या नसल्याचे समोर आले आहे. परभणी आगाराला दोन दिवसांना १२ हजार लिटर डिझेल लागते. जवळपास ८ लाख ८४ हजार रुपये भरल्यानंतर डिझेल उपलब्ध होते. मात्र सोमवारी आगारात डिझेलसाठी पैसे उपलब्ध नसल्याने वेळेत डिझेलची नोंदणी झाली नाही. त्यामुळेच बसफेºया रद्द करण्याची वेळ आगारावर ओढावली.

टॅग्स :parabhaniपरभणीDieselडिझेलstate transportराज्य परीवहन महामंडळ