शहरं
Join us  
Trending Stories
1
आता 'टीम इंडिया' पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणणार; श्रीकांत शिंदेंसह सुप्रिया सुळेंना जबाबदारी
2
Corona Virus : टेन्शन वाढलं! हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोनाचं थैमान, रुग्णांमध्ये मोठी वाढ; भारताला किती धोका?
3
UPI Lite, वॉलेट पेमेंट... युजर्सच्या पसंतीस का उतरत नाहीयेत हे नवे फीचर्स? कुठे येतेय समस्या
4
कारगिलमधून बेपत्ता झालेली नागपूरची महिला LOC पार करून पाकिस्तानात पोहचली, कारण...
5
'दृश्यम'पद्धतीने हत्या! प्रेयसीच्या भावाचा मृतदेह पुरला; प्लॅनमध्ये पडला 'मिठा'चा खडा आणि...
6
मुंबई विमानतळ आणि ताज हॉटेलला बॉम्बनं उडवण्याची धमकी; एअरपोर्ट पोलिसांना आला ईमेल
7
Mumbai Local: मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’ मध्य, हार्बर, पश्चिम रेल्वेमार्गावर वाहतुकीत बदल
8
भारताला तुझा अभिमान आहे... पंतप्रधान मोदींनी केलं नीरज चोप्राच्या ऐतिहासिक कामगिरीचं कौतुक
9
Beed Crime News : परळीत तरुणाला बेदम मारहाण! छातीवर बसला, सभोवती कडं केलं, काठ्यांनी बेदम मारहाण, व्हिडीओ व्हायरल
10
Tarot Card: आपल्याजवळ काय नाही, त्यापेक्षा काय आहे, यावर विचार करायला लावणारा आठवडा!
11
गौप्यस्फोट! अटकेआधी संजय राऊतांचा अमित शाहांना फोन; संतापून म्हणाले, "मला अटक करा..."
12
तुर्कस्तान-अझरबैजानसोबत सर्व प्रकारचे व्यवहार संपवणार का सरकार? काय आहे तयारी
13
पाकिस्तानची तिसऱ्या देशाच्या मदतीने भारतात माल निर्यात करण्याची तयारी; सरकारने घेतली दखल
14
उर्वरित IPL 2025 ला आजपासून होणार सुरुवात; मिचेल स्टार्कसह अनेक दिग्गज स्पर्धेतून OUT
15
"भाजपाशी अनैतिक संबंध तोडावेत, जसं 'वर्षा'वर हक्कानं जाता, तसं 'मातोश्री'वर यावं" 
16
पुढच्या वर्षी बंद होणार Vodafone Idea? सरकारकडे मागितली मदत; म्हटलं, 'काम करणं कठीण...'
17
आयुष्याचं ‘सुरक्षा चक्र' आहेत या ३ स्कीम्स, कठीण काळात साथ; कमी कमाई असणारेही करू शकतात गुंतवणूक
18
भारताच्या हल्ल्यात नूर खानसह अनेक एअरबेस उद्ध्वस्त; पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांचा कबुलीनामा
19
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
20
सुटीत गावी आलेल्या न्यायाधीशांनी स्वत: कापले गावातील मुलांचे केस; नेमकं घडलं काय?

परभणी : वाळूअभावी रखडले घरकुलांचे बांधकाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 01:15 IST

यावर्षी जिल्ह्यात वाळूची टंचाई निर्माण झाल्याने त्याचा परिणाम घरकुल बांधकामांवर झाला आहे. रमाई आवास योजनेंतर्गत शहरी भागामध्ये २ हजार ३७७ घरकुल बांधण्याचे उद्दिष्ट दिले असताना प्रत्यक्षात केवळ ६२१ घरकुलेच बांधून पूर्ण झाली आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : यावर्षी जिल्ह्यात वाळूची टंचाई निर्माण झाल्याने त्याचा परिणाम घरकुल बांधकामांवर झाला आहे. रमाई आवास योजनेंतर्गत शहरी भागामध्ये २ हजार ३७७ घरकुल बांधण्याचे उद्दिष्ट दिले असताना प्रत्यक्षात केवळ ६२१ घरकुलेच बांधून पूर्ण झाली आहेत.नागरी भागामध्ये मागासवर्गीय लाभार्थ्यांसाठी राज्य शासनाच्या वतीने रमाई आवास घरकुल योजना राबविली जाते. या योजनेंतर्गत नगरपालिकांना घरकुल लाभार्थ्यांचे उद्दिष्ट ठरवून देण्यात आले आहे. ७ नगरपालिकांसाठी २ हजार ३७७ घरकुल बांधण्याचे उद्दिष्ट यावर्षी देण्यात आले होते; परंतु, आतापर्यंत केवळ ६२१ घरकुले बांधून पूर्ण झाली असून ८७९ घरकुलांचे बांधकाम प्रगतीपथावर आहे. तर ५१० घरकुलांचे बांधकाम अद्याप सुरुच झाले नसल्याची माहिती मिळाली आहे.जिल्ह्यामध्ये यावर्षी वाळू घाटांचे लिलाव झाले नाहीत. त्यामुळे वाळू शिल्लक नाही. त्याचा परिणाम घरकुल बांधकामांवर झाल्याचे दिसत आहे.वाळू उपलब्ध नसल्याने सर्वच बांधकामे ठप्प आहेत. त्यात घरकुल बांधकामांचाही समावेश आहे. अलीकडच्या काळामध्ये जिल्हा प्रशासनाने लाभार्थ्यांना वाळू उपलब्ध करुन देण्याची योजना आखली. या योजनेंतर्गत घरकुल लाभार्थ्यांना टोकन देऊन वाळू उपलब्ध करुन दिली जात असली तरी प्रत्यक्षात वाळू मिळविण्यासाठी लाभार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.प्रशासकीय मंजुरीनंतर वाळू उपलब्ध करुन घेणे लाभार्थ्यांसाठी जिकीरीचे होत आहे. त्यामुळे घरकुल बांधकामासाठी वाळू देण्याचा निर्णय झाला असला तरी प्रत्यक्षात या बांधकामांना गती मिळाली नसल्याचे दिसत आहे.गंगाखेड शहरात सर्वाधिक घरकुले४रमाई योजनेअंतर्गत गंगाखेड शहरामध्ये ४०१ घरकुल बांधण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यापैकी १६० घरकुले बांधून पूर्ण झाली आहेत. ४७ घरकुलांचे बांधकाम प्रगतीपथावर असून ११९ घरकुलांचे बांधकाम अद्याप सुरु झाले नाही. जिंतूृर शहरात १३४ पैकी ६२, पाथरी शहरात ३३४ पैकी ८५, सेलू शहरात २९३ पैकी ७३, मानवतमध्ये २८३ पैकी ६४, पूर्णा ७०० पैकी ८७ आणि सोनपेठ शहरामध्ये २३२ पैकी ९० घरकुलांचे बांधकाम पूर्ण झाले आहे.१९ कोटी ५८ लाखांचा खर्च४रमाई आवास योजनेंतर्गत नगरपालिका क्षेत्रामध्ये घरकुल बांधकामासाठी प्राप्त झालेल्या निधीपैकी १९ कोटी ५८ लाख ९७ हजार रुपयांचा निधी खर्च झाला आहे. तर १२ कोटी २८ लाख ८३ हजार रुपये शिल्लक आहेत.४या योजनेंतर्गत गंगाखेड नगरपालिकेला ४ कोटी १६ लाख ५० हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला. त्यापैकी ३ कोटी ७० लाख ५३ हजार रुपये खर्च झाले आहेत. जिंतूर नगरपालिकेला १ कोटी ९२ लाख २५ हजार रुपये प्राप्त झाले होते. त्यापैकी १ कोटी ८७ लाख ७९ हजार रुपये खर्च करण्यात आले. पाथरी नगरपालिकेला ७ कोटी ९ लाख २८ हजार रुपये प्राप्त झाले. त्यापैकी ३ कोटी ५२ लाख १५ हजार रुपये खर्च झाला. सेलू नगरपालिकेला ५ कोटी १५ लाख ५० हजार रुपये निधी प्राप्त झाला असून ३ कोटी १९ लाख १५ हजार रुपये योजनेवर खर्च झाला आहे. पूर्णा नगरपालिकेला ७ कोटी ४६ लाख ६५ हजार रुपये निधी प्राप्त झाला असून त्यापैकी ३ कोटी २३ लाख २८ हजार रुपये खर्च करण्यात आले आहे. सोनपेठ नगरपालिकेला ३ कोटी २४ लाख ५ हजार रुपये निधी उपलब्ध झाला असून २ कोटी २७ लाख १८ हजार रुपयांचा निधी खर्च झाला आहे.४पाथरी नगरपालिकेत ३ कोटी ५७ लाख आणि पूर्णा नगरपालिकेमध्ये ३ कोटी ८३ लाख रुपयांचा निधी अद्यापही अखर्चित आहे. तर सेलू पालिकेत १ कोटी ९६ लाखांचा निधी शिल्लक आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीsandवाळूHomeघर