शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

परभणी : एक लाख रोपे करपण्याच्या स्थितीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 00:49 IST

एक महिन्यापासून पाऊस नसल्याने शासनाची शतकोटी वृक्ष लागवड योजना अडचणीत सापडली असून तालुक्यातील सुमारे एक लाख रोपे जळून जाण्याच्या मार्गावर आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपालम (परभणी) : एक महिन्यापासून पाऊस नसल्याने शासनाची शतकोटी वृक्ष लागवड योजना अडचणीत सापडली असून तालुक्यातील सुमारे एक लाख रोपे जळून जाण्याच्या मार्गावर आहेत.राज्य शासनाच्या १३ कोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत जून महिन्यामध्ये तालुक्यात ६४ ग्रामपंचायतींतर्गत शाळा, अंगणवाडी, आरोग्य उपकेंद्र, रस्ते, स्मशानभूमी आदी ठिकाणी वृक्ष लागवड करण्यात आली. पंचायत समिती, कृषी विभाग, शिक्षण विभाग, आरोग्य विभागाने तालुक्यात सुमारे एक लाख झाडे लावली. दरवर्षी वृक्ष लागवड योजना राबविली जाते. मात्र संवर्धनासाठी कोणीही पुढाकार घेत नाही.त्यामुळे वर्षानुवर्षापासून गाजावाजा करून केवळ अभियान राबविले जात असून वृक्षांचे संवर्धन मात्र होत नाही. यावर्षी या योजनेत निसर्गानेही खोडा घातला आहे. तालुक्यात एक महिन्यापासून पाऊस झाला नसल्याने लावलेली झाडे वाळत आहेत. त्यामुळे या अभियानाचाच बोजवारा उडण्याची स्थिती पालम तालुक्यात निर्माण झाली आहे.लोकसहभाग मिळूनही यंत्रणेचे दुर्लक्षतालुक्यातील आरखेड, पेठशिवणी व कापसी ग्रामपंचायतींनी प्रत्येकी ५ हजार या प्रमाणे १५ हजार रोपांची लागवड लोकसहभागातून केली. यासाठी ५० ते १ लाख रुपयांची पदरमोडही ग्रामस्थांनी केली. मात्र वृक्ष संगोपन करताना ग्रामपंचायतीची दमछाक होत आहे. निधी नसल्याने झाडांना पाणी घालणे, कुंंपन लावणे, काठीचा आधार देणे ही कामे ठप्प पडली आहेत. लोकसहभागातून लावलेली रोपे जगावीत यासाठी सरपंच, उपसरपंच प्रयत्न करीत असले तरी प्रशासकीय पातळीवर सहकार्य मिळत नसल्याने नाराजीचा सूर उमटत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीwater scarcityपाणी टंचाईRainपाऊस