शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
3
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
4
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
5
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
6
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
7
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
8
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
9
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
10
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
11
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
12
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
13
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
14
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
15
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
16
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
17
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
18
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
19
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
20
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?

परभणी : सिंचनाची खोटी माहिती दिल्याप्रकरणी तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 00:55 IST

जिल्ह्यातील सिंचनाबाबत गोदावरी मराठवाडा सिंचन विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांनी खोटी व बनावट दस्ताऐवजाच्या आधारे माहिती देऊन पाणी कपात केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची तक्रार भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव कॉ.राजन क्षीरसागर यांनी पोलीस अधीक्षकांकडे दिली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी: जिल्ह्यातील सिंचनाबाबत गोदावरी मराठवाडा सिंचन विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांनी खोटी व बनावट दस्ताऐवजाच्या आधारे माहिती देऊन पाणी कपात केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची तक्रार भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव कॉ.राजन क्षीरसागर यांनी पोलीस अधीक्षकांकडे दिली आहे.राज्याच्या जलसंपदा विभागाने जायकवाडी प्रकल्पाच्या पाणी वाटपाचे फेरनियोजन करीत प्रकल्पातील सिंचनासाठीचे परभणी जिल्ह्याचे ४२० दलघमी पाणी कपात करण्याचा निर्णय १२ सप्टेंबरच्या आदेशाद्वारे घेतला होता. कपात केलेले परभणी जिल्ह्याचे हे पाणी औद्योगिक क्षेत्राकडे वळविण्यात आले. या संदर्भात जिल्ह्यातील १४१ गावांमध्ये संतापाची लाट आहे. या अनुषंगाने भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव कॉ.राजन क्षीरसागर यांनी पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांच्याकडे तक्रार दिली आहे. त्यामध्ये गोदावरी मराठवाडा सिंचन विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांनी शासनाला खोटी व बनावट कागदपत्रांद्वारे माहिती दिल्याने पाणी कपात करण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी कॉ.क्षीरसागर यांनी केली आहे. शासन निर्णयात दर्शविल्याप्रमाणे गोदावरी नदीवरील आपेगाव, हिरपुडी (औरंगाबाद), जोगला देवी, मंगरुळ, राजा टाकळी, लोणी सावंगी (जालना), ढालेगाव, तारुगव्हाण, मुद्गल, मुळी, डिग्रस या ११ उच्चपातळी बंधाºयातून २७.६८ हजार हेक्टर सिंचन क्षेत्र प्रस्तावित करुन विष्णुपुरी टप्पा २ हा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला; परंतु, अद्याप सदरील प्रकल्प पूर्ण झालेला नाहीत. त्यात डिग्रस बंधाºयातील पाणीसाठा विष्णुपुरी प्रकल्पात समाविष्ट केल्याने परभणी जिल्ह्याला पाणी परवाने देण्यात आलेले नाहीत. आजवर सतत विष्णुपुरी प्रकल्पात पाणी सोडण्यात आल्याने शेतकºयांना सिंचन करता आलेले नाही. मुळी बंधाºयाचे गेट वाहून गेल्याने पुरेसा पाणीसाठा टिकवून ठेवता येत नाही. मुद्गल बांधाºयातील पाणी प्रामुख्याने परळी थर्मल वीज प्रकल्पाला देण्यासाठी असल्याने शेतकºयांना पाणी परवानगी देण्यापासून वंचित ठेवण्यात आले.तारुगव्हाण बंधाºयाचे काम निधीअभावी पूर्ण झालेले नाही. ढालेगाव बंधाºयातील पाणी पाथरी शहराच्या पिण्यासाठी वापरले जाते. त्यामुळे ते शेतकºयांना सिंचनासाठी पाणी दिले जात नाही. लोणी सावंगी बंधाºयातील पाणी माजलगाव सिंचन प्रकल्पात येण्यासाठी उपसा सिंचन योजना कार्यान्वित असल्यामुळे सिंचन सुविधेची तरतूद केलेली नाही. तसेच आपेगाव, हिरपुडी, जोगला देवी, मंगरुळ, राजा टाकळी, लोणी सावंगी याच्यासह ११ उच्च पातळी बंधाºयाचे सिंचन कायद्याच्या तरतुदीनुसार लाभक्षेत्र अधिसूचना जारी करण्यात आलेली नाही.शिवाय शेतकºयांना कायदेशीरपणे पाणी वाटा डाव्या व उजव्या बाजुला निश्चित करुन देण्यात आलेला नाही. प्रत्यक्षात कोणतेही फारसे सिंचन नसताना जायकवाडी प्रकल्पाचे पाणी पळविण्यासाठी गोदावरी मराठवाडा सिंचन विकास महामंडळाच्या उच्चपदस्थ अधिकाºयांनी शासनाला खोटी माहिती दिलेली आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा व शासनाचा १२ सप्टेंबरचा निर्णय रद्द करावा, अशी मागणी क्षीरसागर यांनी केली आहे. निवेदनावर जि.प.सदस्य श्रीनिवास जोगदंड यांचीही स्वाक्षरी आहे.१४१ गावांना बसणार फटका४जायकवाडी प्रकल्पातून परभणी जिल्ह्याला सिंचनासाठी मिळणाºया पाण्यापैकी जवळपास ४२० दलघमी पाणी कपात करण्यात आल्याने त्याचा गोदावरी पट्ट्यातील परभणी जिल्ह्यातील १४१ गावांना फटका बसणार आहे. या गावांमधील शेतकºयांना सिंचनासाठी समाधानकारक पाणी मिळणार नाही. त्यामुळे राज्याच्या जलसंपदा विभागाचा पाणी कपातीचा निर्णय १४१ गावांतील शेतकºयांच्या मुळावर आला आहे. जवळपास ५० हजार हेक्टर जमिनीवरील पिकांना याचा फटका बसणार आहे. त्यामुळे शासनाच्या या निर्णयाविरुद्ध या गावांमधील शेतकरी नाराजी व्यक्त करीत आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पMarathwadaमराठवाडा