शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

परभणी शहर : १५ दिवसांनी मिळते पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 00:08 IST

शहरातील पाण्याची वितरण व्यवस्था कोलमडली असून १५ दिवसांतून एकवेळ पाणी मिळत असल्याने शहरवासियांना सध्या कृत्रिम पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी: शहरातील पाण्याची वितरण व्यवस्था कोलमडली असून १५ दिवसांतून एकवेळ पाणी मिळत असल्याने शहरवासियांना सध्या कृत्रिम पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.परभणी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राहटी बंधाºयात मूबलक पाणीसाठा उपलब्ध असतानाही शहरवासियांना १५ दिवसांपर्यंत पाणी मिळत नसल्याची स्थिती सध्या निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे भर उन्हाळ्यामध्ये शहरवासियांना १० दिवसाआड पाणी मिळत होते. पावसाळा सुरु झाल्यानंतर पाणीटंचाई कमी होण्याऐवजी वाढली आहे.शहरवासियांना १५ दिवसांपर्यंत पाणी मिळत नसल्याने पाण्यासाठी ओरड वाढत आहे. महानगरपालिकेचे आयुक्त राहुल रेखावार यांची बदली झाल्यानंतर मनपाचा कारभार ढिसाळ झाला आहे. शहरवासियांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असून त्यात पाण्याची समस्या गंभीर झाली आहे. चार दिवसांपूर्वी राहटी बंधाºयातून पाणी उपसा करण्यासाठी उभारण्यात आलेल्या एक्सप्रेस फिडरवरील विद्युत रोहित्र जळाल्याने शहराचा पाणीपुरवठा आणखीच विस्कळीत झाला होता. हे विद्युत रोहित्र दुरुस्त करण्यासाठी दोन दिवसांचा कालावधी लागला. विद्युत रोहित्र दुरुस्त होऊन पाण्याचा उपसा सुरु झाला असला तरी अनेक प्रभागांना १५-१५ दिवसांपासून पाणी मिळत नसल्याने पाण्यासाठीची ओरड वाढत आहे. केवळ नियोजनाचा अभाव असल्यामुळेच शहरवासियांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.महानगरपालिका प्रशासनाने पाणी वितरणाचे नियोजन करावे, अशी मागणी होत आहे.परभणीसाठी मूबलक पाणीशहराला पाणीपुरवठा करणाºया राहटी बंधाºयात मूबलक पाणीसाठा उपलब्ध आहे. सेलू तालुक्यातील निम्न दुधना प्रकल्पात शहरासाठी पाणी आरक्षित करण्यात आले असून बंधाºयातील पाणीसाठा संपल्यास निम्न दुधना प्रकल्पातून पाणी घेतले जात आहे. मूबलक पाणीसाठा उपलब्ध असतानाही शहरवासियांना मात्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. पाणीपुरवठा करण्याचे नियोजन विस्कळीत झाल्यानेच शहरवासियांना १५ दिवसांतून एकवेळ पाणी उपलब्ध होत आहे. मनपाने पाणी सोडण्याचे नियोजन करुन किमान चार ते पाच दिवसाआड पाणीपुरवठा करावा, अशी मागणी होत आहे.नव्या आयुक्तांसमोर आव्हाने४परभणी महानगरपालिकेसाठी आयुक्त म्हणून रमेश पवार यांच्या नियुक्तीचे आदेश निघाले आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत नवीन आयुक्त रुजू होतील. शहरातील स्वच्छतेबरोबरच नागरिकांना नियमित पाणीपुरवठा करण्याचे आव्हान नवीन आयुक्तांसमोर असणार आहे. ते या समस्या कशा पद्धतीने हाताळतात, याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे.जलवाहिनीला गळतीशहरात जलवाहिनीला अनेक ठिकाणी गळती आहे. वर्षभरापासून दुरुस्तीची कामे झाली नाहीत. त्यामुळे पाण्याचा अपव्यय होतो. शिवाय गळतीमुळे टेलपर्यंत पाणी पोहचण्यासाठी अडथळे निर्माण होत आहेत.विजेच्या कमी दाबामुळे वाढले रोटेशनराहटी येथील विद्युत रोहित्रावर वीज पडल्याने तो जळाला होता. त्यानंतर ग्रामीण भागातून वीज जोडणी घेतली आहे. परंतु, आवश्यक तेवढ्या दाबाने वीज पुरवठा होत नसल्याने शहराचा पाणीपुरवठा १४ ते १५ दिवसाआड होण्याची शक्यता असल्याचे महापालिकेने पत्रक काढून कळविले.

टॅग्स :parabhaniपरभणीwater scarcityपाणी टंचाई