शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

परभणी शहर : १५ दिवसांनी मिळते पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 00:08 IST

शहरातील पाण्याची वितरण व्यवस्था कोलमडली असून १५ दिवसांतून एकवेळ पाणी मिळत असल्याने शहरवासियांना सध्या कृत्रिम पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी: शहरातील पाण्याची वितरण व्यवस्था कोलमडली असून १५ दिवसांतून एकवेळ पाणी मिळत असल्याने शहरवासियांना सध्या कृत्रिम पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.परभणी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राहटी बंधाºयात मूबलक पाणीसाठा उपलब्ध असतानाही शहरवासियांना १५ दिवसांपर्यंत पाणी मिळत नसल्याची स्थिती सध्या निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे भर उन्हाळ्यामध्ये शहरवासियांना १० दिवसाआड पाणी मिळत होते. पावसाळा सुरु झाल्यानंतर पाणीटंचाई कमी होण्याऐवजी वाढली आहे.शहरवासियांना १५ दिवसांपर्यंत पाणी मिळत नसल्याने पाण्यासाठी ओरड वाढत आहे. महानगरपालिकेचे आयुक्त राहुल रेखावार यांची बदली झाल्यानंतर मनपाचा कारभार ढिसाळ झाला आहे. शहरवासियांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असून त्यात पाण्याची समस्या गंभीर झाली आहे. चार दिवसांपूर्वी राहटी बंधाºयातून पाणी उपसा करण्यासाठी उभारण्यात आलेल्या एक्सप्रेस फिडरवरील विद्युत रोहित्र जळाल्याने शहराचा पाणीपुरवठा आणखीच विस्कळीत झाला होता. हे विद्युत रोहित्र दुरुस्त करण्यासाठी दोन दिवसांचा कालावधी लागला. विद्युत रोहित्र दुरुस्त होऊन पाण्याचा उपसा सुरु झाला असला तरी अनेक प्रभागांना १५-१५ दिवसांपासून पाणी मिळत नसल्याने पाण्यासाठीची ओरड वाढत आहे. केवळ नियोजनाचा अभाव असल्यामुळेच शहरवासियांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.महानगरपालिका प्रशासनाने पाणी वितरणाचे नियोजन करावे, अशी मागणी होत आहे.परभणीसाठी मूबलक पाणीशहराला पाणीपुरवठा करणाºया राहटी बंधाºयात मूबलक पाणीसाठा उपलब्ध आहे. सेलू तालुक्यातील निम्न दुधना प्रकल्पात शहरासाठी पाणी आरक्षित करण्यात आले असून बंधाºयातील पाणीसाठा संपल्यास निम्न दुधना प्रकल्पातून पाणी घेतले जात आहे. मूबलक पाणीसाठा उपलब्ध असतानाही शहरवासियांना मात्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. पाणीपुरवठा करण्याचे नियोजन विस्कळीत झाल्यानेच शहरवासियांना १५ दिवसांतून एकवेळ पाणी उपलब्ध होत आहे. मनपाने पाणी सोडण्याचे नियोजन करुन किमान चार ते पाच दिवसाआड पाणीपुरवठा करावा, अशी मागणी होत आहे.नव्या आयुक्तांसमोर आव्हाने४परभणी महानगरपालिकेसाठी आयुक्त म्हणून रमेश पवार यांच्या नियुक्तीचे आदेश निघाले आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत नवीन आयुक्त रुजू होतील. शहरातील स्वच्छतेबरोबरच नागरिकांना नियमित पाणीपुरवठा करण्याचे आव्हान नवीन आयुक्तांसमोर असणार आहे. ते या समस्या कशा पद्धतीने हाताळतात, याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे.जलवाहिनीला गळतीशहरात जलवाहिनीला अनेक ठिकाणी गळती आहे. वर्षभरापासून दुरुस्तीची कामे झाली नाहीत. त्यामुळे पाण्याचा अपव्यय होतो. शिवाय गळतीमुळे टेलपर्यंत पाणी पोहचण्यासाठी अडथळे निर्माण होत आहेत.विजेच्या कमी दाबामुळे वाढले रोटेशनराहटी येथील विद्युत रोहित्रावर वीज पडल्याने तो जळाला होता. त्यानंतर ग्रामीण भागातून वीज जोडणी घेतली आहे. परंतु, आवश्यक तेवढ्या दाबाने वीज पुरवठा होत नसल्याने शहराचा पाणीपुरवठा १४ ते १५ दिवसाआड होण्याची शक्यता असल्याचे महापालिकेने पत्रक काढून कळविले.

टॅग्स :parabhaniपरभणीwater scarcityपाणी टंचाई