शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
16
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
17
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
18
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
19
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
20
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय

परभणी शहर : १५ दिवसांनी मिळते पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 00:08 IST

शहरातील पाण्याची वितरण व्यवस्था कोलमडली असून १५ दिवसांतून एकवेळ पाणी मिळत असल्याने शहरवासियांना सध्या कृत्रिम पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी: शहरातील पाण्याची वितरण व्यवस्था कोलमडली असून १५ दिवसांतून एकवेळ पाणी मिळत असल्याने शहरवासियांना सध्या कृत्रिम पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.परभणी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राहटी बंधाºयात मूबलक पाणीसाठा उपलब्ध असतानाही शहरवासियांना १५ दिवसांपर्यंत पाणी मिळत नसल्याची स्थिती सध्या निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे भर उन्हाळ्यामध्ये शहरवासियांना १० दिवसाआड पाणी मिळत होते. पावसाळा सुरु झाल्यानंतर पाणीटंचाई कमी होण्याऐवजी वाढली आहे.शहरवासियांना १५ दिवसांपर्यंत पाणी मिळत नसल्याने पाण्यासाठी ओरड वाढत आहे. महानगरपालिकेचे आयुक्त राहुल रेखावार यांची बदली झाल्यानंतर मनपाचा कारभार ढिसाळ झाला आहे. शहरवासियांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असून त्यात पाण्याची समस्या गंभीर झाली आहे. चार दिवसांपूर्वी राहटी बंधाºयातून पाणी उपसा करण्यासाठी उभारण्यात आलेल्या एक्सप्रेस फिडरवरील विद्युत रोहित्र जळाल्याने शहराचा पाणीपुरवठा आणखीच विस्कळीत झाला होता. हे विद्युत रोहित्र दुरुस्त करण्यासाठी दोन दिवसांचा कालावधी लागला. विद्युत रोहित्र दुरुस्त होऊन पाण्याचा उपसा सुरु झाला असला तरी अनेक प्रभागांना १५-१५ दिवसांपासून पाणी मिळत नसल्याने पाण्यासाठीची ओरड वाढत आहे. केवळ नियोजनाचा अभाव असल्यामुळेच शहरवासियांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.महानगरपालिका प्रशासनाने पाणी वितरणाचे नियोजन करावे, अशी मागणी होत आहे.परभणीसाठी मूबलक पाणीशहराला पाणीपुरवठा करणाºया राहटी बंधाºयात मूबलक पाणीसाठा उपलब्ध आहे. सेलू तालुक्यातील निम्न दुधना प्रकल्पात शहरासाठी पाणी आरक्षित करण्यात आले असून बंधाºयातील पाणीसाठा संपल्यास निम्न दुधना प्रकल्पातून पाणी घेतले जात आहे. मूबलक पाणीसाठा उपलब्ध असतानाही शहरवासियांना मात्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. पाणीपुरवठा करण्याचे नियोजन विस्कळीत झाल्यानेच शहरवासियांना १५ दिवसांतून एकवेळ पाणी उपलब्ध होत आहे. मनपाने पाणी सोडण्याचे नियोजन करुन किमान चार ते पाच दिवसाआड पाणीपुरवठा करावा, अशी मागणी होत आहे.नव्या आयुक्तांसमोर आव्हाने४परभणी महानगरपालिकेसाठी आयुक्त म्हणून रमेश पवार यांच्या नियुक्तीचे आदेश निघाले आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत नवीन आयुक्त रुजू होतील. शहरातील स्वच्छतेबरोबरच नागरिकांना नियमित पाणीपुरवठा करण्याचे आव्हान नवीन आयुक्तांसमोर असणार आहे. ते या समस्या कशा पद्धतीने हाताळतात, याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे.जलवाहिनीला गळतीशहरात जलवाहिनीला अनेक ठिकाणी गळती आहे. वर्षभरापासून दुरुस्तीची कामे झाली नाहीत. त्यामुळे पाण्याचा अपव्यय होतो. शिवाय गळतीमुळे टेलपर्यंत पाणी पोहचण्यासाठी अडथळे निर्माण होत आहेत.विजेच्या कमी दाबामुळे वाढले रोटेशनराहटी येथील विद्युत रोहित्रावर वीज पडल्याने तो जळाला होता. त्यानंतर ग्रामीण भागातून वीज जोडणी घेतली आहे. परंतु, आवश्यक तेवढ्या दाबाने वीज पुरवठा होत नसल्याने शहराचा पाणीपुरवठा १४ ते १५ दिवसाआड होण्याची शक्यता असल्याचे महापालिकेने पत्रक काढून कळविले.

टॅग्स :parabhaniपरभणीwater scarcityपाणी टंचाई