शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

परभणी: घरकुल बांधकामासाठी लाभार्थ्यांना मिळेना वाळू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 00:03 IST

राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनांमधून गोरगरिबांसाठी येथील पंचायत समितीने मंजूर केलेल्या घरकुलाच्या बांधकामासाठी मागील दोन महिन्यांपासून वाळू मिळेनाशी झाली आहे. त्यामुळे घरकुलांची कामे अर्धवट अवस्थेत असल्यामुळे लाभार्थ्यांमध्ये तालुका प्रशासनाविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपालम (परभणी): राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनांमधून गोरगरिबांसाठी येथील पंचायत समितीने मंजूर केलेल्या घरकुलाच्या बांधकामासाठी मागील दोन महिन्यांपासून वाळू मिळेनाशी झाली आहे. त्यामुळे घरकुलांची कामे अर्धवट अवस्थेत असल्यामुळे लाभार्थ्यांमध्ये तालुका प्रशासनाविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.पालम तालुक्यात शासनाच्या विविध योजनेंतर्गत ३४० घरकुलांना पंचायत समितीने मंजूरी दिलेली आहे. लाभार्थ्यांनी या घरकुलाची कामेही सुरू केली होती; परंतु, वाळूची मोठी अडचण निर्माण झाली आहे. गोदावरी पात्रातील वाळूचे धक्के सुटूनही उपसा करण्यास वेळ लागत आहे. त्यामुळे वाळू उपलब्ध होत नाही. यामुळे वाळूचे भाव गगनाला भिडले आहेत. महागड्या दराने वाळू घेणे गोरगरिबांना परवडत नाही. त्यामुळे घरकुलांची कामे अर्धवट अवस्थेत ठप्प झाली आहेत. पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी ११ फेब्रुवारी रोजी महसूल प्रशासनाकडे ९७५ ब्रास वाळूची मागणी नोंदविली आहे; परंतु, अजूनही वाळू उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. गोदावरीच्या पात्रातील वाळू साठ्यांचे लिलाव झालेले आहेत. मात्र अद्यापही या ठिकाणाहून वाळू उपसा सुरू झालेला नाही. घरकुलांसाठी पूर्णा तालुक्यातील धक्यावरून वाळू उचलण्यास लाभार्थ्यांना सांगितले जात आहे; परंतु, वाहतुकीसाठी मोठा भूर्दंड लागत असल्याने तेथून वाळू आणणे लाभार्थ्यांसाठी कठीण बनले आहे. त्यामुळे पंचायत समिती प्रशासनाने याकडे लक्ष देऊन लाभार्थ्यांच्या परिसरातील वाळू धक्यावरून वाळू पुरवठ्याची सोय करावी, अशी मागणी लाभार्थ्यांमधून केली जात आहे.पाणीटंचाईचा बसतोय फटका४पालम तालुक्यात दिवसेंदिवस पाणीटंचाईत वाढ होत आहे. पिण्याचे पाणी व जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. घरकुलाच्या लाभार्थ्यांसाठी चार महिन्यांपासून वाळूचा प्रश्न निर्माण झाला आहे.४आता वाळू मिळाली तरीही पाणीटंचाईचा जबर फटका घरकूल लाभार्थ्यांना बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे शासनाच्या २०२२ पर्यंत सर्वांनाच हक्कांची घरे या योजनेला स्थानिक प्रशासनाकडून मात्र केराची टोपली दाखविली जात असल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीsandवाळू