शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
3
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
4
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
5
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
6
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
7
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
8
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
9
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
10
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
11
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
12
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
13
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
14
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
15
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
16
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
17
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
18
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
19
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
20
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू

परभणी : कुशल रणनीतीनेच बाजोरिया विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 00:12 IST

परभणी- हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत कुशल रणनीतीचा वापर करुन शिवसेनेचे उमेदवार विप्लव बाजोरिया यांनी विजय मिळविला आहे. काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीकडे असलेला हा मतदारसंघ शिवसेनेने पहिल्यांदाच निवडणूक लढवित आपल्याकडे खेचला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : परभणी- हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत कुशल रणनीतीचा वापर करुन शिवसेनेचे उमेदवार विप्लव बाजोरिया यांनी विजय मिळविला आहे. काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीकडे असलेला हा मतदारसंघ शिवसेनेने पहिल्यांदाच निवडणूक लढवित आपल्याकडे खेचला आहे.परभणी- हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघावर आतापर्यंत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व होते. सहा वर्षांपूर्वी आघाडीतील जागा वाटपानुसार ही जागा काँग्रेसकडून राष्ट्रवादीकडे गेली. त्यानंतर सहा वर्षानंतर राष्ट्रवादीचे आ.बाबाजानी दुर्राणी यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी राज्यस्तरावरुन घडलेल्या घडामोडीत परभणीची जागा राष्ट्रवादीकडून पुन्हा एकदा काँग्रेसकडे गेली. ऐनवेळी घडलेल्या या बदलामुळे मावळते आ.बाबाजानी दुर्राणी यांच्यासह राष्ट्रवादीचे बरेच कार्यकर्ते नाराज झाले होते; परंतु, त्यांची नाराजी दूर करण्यात काँग्रेसच्या नेत्यांना यश आले. मतदारसंघात काँग्रेसकडे १३५ व राष्ट्रवादीकडे १६२ मतदारांचे संख्याबळ होते. शिवाय घनदाट मित्र मंडळ, अपक्ष व अन्य काही सदस्यांनीही काँग्रेसला मदतीचा हात देण्याचे आश्वासन प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांच्या सभेत दिले होते. त्यामुळे आघाडीच्या तुलनेत शिवसेना-भाजपा युतीकडे फारसे संख्याबळ नव्हते. शिवसेनेचे ९७ आणि भाजपाचे ५१ असे १४८ सदस्य असताना शिवसेनेचे खा.बंडू जाधव, अकोल्याचे आ.गोपीकिशन बाजोरिया यांनी कुशल रणनितीचा वापर करीत निवडणुकीच्या विजयाची गणिते आखली. या निवडणुकीत विजयी होण्यासाठी २५१ मतांची गरज लागणार असल्याने त्यांनी ३५० मतांचे नियोजन केले. यासाठी प्रत्येक मतदाराची वैयक्तिक भेट घेतली. विनम्रतेने मतदानासाठी साकडे घातले. विशेष म्हणजे यामध्ये काँग्रेस व राष्ट्रवादीच्या सदस्यांशीही शिवसेनेच्या नेते मंडळींनी संपर्क साधला व तो संपर्क शेवटपर्यंत कायम ठेवला. त्यामुळे या मतदारसंघात शिवसेनेला विजय मिळविणे सोपे झाले. याशिवाय आ.डॉ.राहुल पाटील, आ.मोहन फड, डॉ.विवेक नावंदर यांचीही बाजोरिया यांना मदत झाली. परिणामी परभणी- हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ भाजपाकडे असताना तो शिवसेनेकडे सोडवून घेऊन पहिल्यांदाच या मतदारसंघात निवडणूक लढवून तो आपल्याकडे खेचण्यात बाजोरिया यांना यश मिळाले आहे.शिवसेनेचा विचार मतदारांपर्यंत नेल्यानेच विजय -विप्लव बाजोरियाशिवसेनेने ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण ही भूमिका कायम ठेवली आहे. पक्षाची भूमिका व आपली काम करण्याची पद्धत याबाबतची माहिती मतदारांपर्यंत पोहोचविली. त्यामुळेच मतदारांनी आपल्यावर विश्वास टाकून विजयी केले, अशी प्रतिक्रिया आ.विप्लव बाजोरिया यांनी दिली. मतदारसंघातील प्रत्येक नगरसेवक, जि.प. सदस्य यांची कामे करण्यास प्राधान्य राहील.त्यासाठी आपण कटीबद्ध राहू, असेही ते म्हणाले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आशीर्वाद आणि खा.बंडू जाधव, आ.डॉ.राहुल पाटील, आ.डॉ.जयप्रकाश मुंदडा यांचे सहकार्य लाभल्यामुळेच विजय मिळाल्याचे बाजोरिया म्हणाले.शिवसेनेची शहरात विजयी मिरवणूकविधान परिषद निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयापासून मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत नवनिर्वाचित आमदार विप्लव बाजोरिया यांच्यासह नेते, कार्यकर्ते सहभागी होते. मिरवणूक जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आल्यानंतर बाजोरिया यांनी बाबासाहेबांच्या पुतळ्यास अभिवादन केले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. त्यानंतर शिवाजी चौकापर्यंत विजयी मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या विजयाच्या घोषणा दिल्या.शिवसेनेच्या विचारांचा विजय -राहुल पाटीलविधान परिषदेत विप्लव बाजोरिया यांचा झालेला विजय हा शिवसेनेच्या विचारांचा विजय आहे. शिवसैनिकांनी घेतलेल्या मेहनतीमुळे व कुशल नियोजनामुळे हा विजय साकारता आला, असे आ.डॉ.राहुल पाटील यांनी सांगितले.निकालानंतर शिवसेनेचा जिल्हा कचेरी परिसरात जल्लोषविधान परिषद निवडणुकीची मतमोजणी सकाळी ८ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात सुरु झाली. सकाळी ९.०५ वाजता निकालाचे चित्र स्पष्ट झाले; परंतु, अधिकृत माहिती सकाळी ९.१७ वाजता बाहेर आली. त्यानंतर शिवसैनिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जोरदार जल्लोष केला. यावेळी नवनिर्वाचित आ.विप्लव बाजोरिया यांचे संपूर्ण कुटुंबीय उपस्थित होते. शिवाय अकोल्यातूनही अनेक नगरसेवक येथे आल्याचे पहावयास मिळाले. या कार्यकर्त्यानी येथे जोरदार घोषणाबाजी केली.खा.बंडू जाधव यांची केली व्यूहरचनाया निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार विप्लव बाजोरिया यांना निवडून आणण्यासाठी खा. बंडू जाधव यांनी विशेष व्यूहरचना आखली होती. परभणी व हिंगोली या दोन्ही जिल्ह्यातील शिवसेना- भाजपासह अन्य पक्षांच्या बहुतांश मतदारांशीही त्यांची ओळख असल्याने त्यांनी या मतदारांशी संपर्क साधला. त्यांना वसमतचे आ.डॉ.जयप्रकाश मुंदडा, हिंगोलीचे जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांची मदत मिळाली. यातूनच त्यांनी दोन्ही जिल्ह्यातील शिवसेनेचे मतदार एकसंघ ठेवले. याशिवाय इतर पक्षाचे मतदारही आपल्याकडे खेचले. तसेच मतदानाच्या दिवशी त्यांनी जिल्ह्यातील विविध केंद्रांना भेटी देऊन यंत्रणेवर कटाक्ष ठेवला. परिणामी बाजोरिया यांचा विजय सुकर झाला.

टॅग्स :parabhaniपरभणीElectionनिवडणूकSuresh Deshmukhसुरेश देशमुखcongressकाँग्रेसBJPभाजपा