शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : टंचाई निवारणासाठी ३४ लाखांच्या कामांना मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 00:48 IST

पावसाने पाठ फिरविल्यामुळे जिल्ह्यात अनेक गावांमधील पाणीटंचाई कायम आहे़ या गावांमधील पाणीटंचाई निवारणाची कामे करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ३४ लाख ५७ हजार ४४० रुपयांच्या कामांना जून महिन्यात मंजुरी दिली आहे़ ही कामे तातडीने पूर्ण झाली तर ग्रामीण भागातील पाणीटंचाई निकाली निघू शकते़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : पावसाने पाठ फिरविल्यामुळे जिल्ह्यात अनेक गावांमधील पाणीटंचाई कायम आहे़ या गावांमधील पाणीटंचाई निवारणाची कामे करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ३४ लाख ५७ हजार ४४० रुपयांच्या कामांना जून महिन्यात मंजुरी दिली आहे़ ही कामे तातडीने पूर्ण झाली तर ग्रामीण भागातील पाणीटंचाई निकाली निघू शकते़यावर्षी जिल्ह्यामध्ये आॅक्टोबर महिन्यापासून पाणीटंचाईने डोके वर काढल्याने ग्रामीण भाग टंचाईच्या समस्येने होरपळून निघाला होता़ टंचाईग्रस्त भागास पाणीपुरवठा करण्यासाठी यावर्षी प्रथमच जिल्हा प्रशासनाने नऊ महिन्यांचा टंचाई कृती आराखडा तयार केला होता़ जून अखेरपर्यंत प्रशासनाला पाणीटंचाईच्या कामांवर भर द्यावा लागला़ पावसाचे वेळेत आगमन झाले नाही़ त्यामुळे जिल्ह्यातील भूजल पातळीतही फारशी वाढ झाली नसल्याने अनेक गावांत टंचाईचे संकट कायम आह़े़ जिल्हा प्रशासनाने पाणीटंचाईच्या कामांसाठी दोन वेळा मुदत वाढ दिली आहे़ त्यानुसार ३१ जुलैपर्यंत जिल्ह्यामध्ये पाणीटंचाई निवारणाची कामे हाती घेतली जाणार आहेत़ जून महिन्यापासून पावसाळ्याला प्रारंभ होतो़ मात्र संपूर्ण जून महिन्यात सरासरीच्या तुलनेत ६० टक्केच पाऊस झाला़ परिणामी टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी प्रशासनाला उपाययोजना कराव्या लागल्या़जून महिन्यात जिल्हा प्रशासनाने तात्पुरत्या पूरक नळ योजना आणि विशेष नळ योजना दुरुस्तीच्या ९ कामांना मंजुरी दिली आहे़एकूण ३४ लाख ५७ हजार ४४० रुपयांची ही कामे असून, जिल्ह्यात टंचाई जाणवणाऱ्या भागात या कामांच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न केला जात आहे़ परभणी तालुक्यातील भोगाव येथे १ लाख ६८ हजार ६०० रुपये खर्चाच्या नळ योजनेच्या विशेष दुरुस्तीच्या कामाला ११ जून रोजी प्रशासकीय मान्यता देण्यात आली़ तसेच पेडगाव येथील २ लाख ६० हजार रुपये, सिंगणापूर येथील १ लाख ७८ हजार २०० रुपये, इस्माईलपूर येथील १ लाख ७ हजार २००, नांदापूर येथील १ लाख ३१ हजार ४०० रुपयांच्या कामांना जून महिन्यामध्ये प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे़ त्याचप्रमाणे पूर्णा तालुक्यातील आहेरवाडी येथे ६ लाख ३१ हजार ४०० रुपये खर्चाच्या तात्पुरत्या पूरक नळ योजनेच्या कामाला ९ जून रोजी प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे़ याच तालुक्यातील गौर येथे पाणीटंचाई निर्माण झाल्याने १५ लाख ६९ हजार ४४० रुपये खर्चाच्या तात्पुरत्या पूरक नळ योजनेच्या कामाला जिल्हा प्रशासनाने १२ जून रोजी मंजुरी दिली आहे तर मुंबर येथे २ लाख ४८ हजार ८०० रुपये खर्चाच्या कामालाही १५ जून रोजी मंजुरी देण्यात आली आहे़ पूर्णा तालुक्यातील वाईलासिना येथे ३ लाख ८ हजार २०० रुपये खर्चाच्या नळ योजना विशेष दुरुस्तीच्या कामाला १५ जून रोजी प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे़जून महिन्यात शक्यतो पाणीटंचाई शिथील होते़ मात्र यावर्षी पाऊस झाला नसल्याने जून महिन्यातही टंचाई निवारणाची कामे हाती घ्यावी लागली आहेत़ विशेष म्हणजे, जुलै महिना अर्धा सरला तरी पाऊस नसल्याने जिल्हा प्रशासनातील महसूल विभाग अजूनही पाणीटंचाई निवारणाचीच कामे प्राधान्याने करीत आहे़ त्यावरून जिल्ह्यातील पाणी टंचाईचे संकट किती गंभीर आहे, हे दिसून येत आहे़१०० गावांमध्ये टंचाई निवारणाची कामे४जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागातील १०९ गावांमध्ये प्रशासनाने नळ योजनांच्या दुरुस्तीची कामे हाती घेतली आहेत़ या कामांपैकी अनेक कामे पूर्णही झाली आहेत़ त्यामुळे अनेक गावांमधील पाणीटंचाई शिथील झाली असली तरी संपूर्ण उन्हाळ्यात नळ योजना दुरुस्तीच्या कामांमधून प्रशासनाने पाणीटंचाई निवारणाचा प्रयत्न केला आहे़४सेलू तालुक्यातील १३, मानवत तालुक्यातील १२, पालम तालुक्यातील ६, पाथरी तालुक्यातील ६, जिंतूर तालुक्यातील ११, गंगाखेड तालुक्यातील ६, सोनपेठ तालुक्यातील २, परभणी तालुक्यातील १८, पूर्णा तालुक्यातील ६ अशा १०९ गावांमध्ये आतापर्यंत तात्पुरती पूरक नळ पाणीपुरवठा योजना आणि नळ योजनेच्या विशेष दुरुस्तीची कामे जिल्हा प्रशासनाने हाती घेतली आहेत़पावसाची प्रतीक्षा कायम४जिल्ह्यात दोन दिवसांपासून पाऊस होत असला तरी हा पाऊस समाधानकारक नाही़ या पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले आहे़ परंतु, भूजल पातळीत वाढ होण्यासाठी मोठ्या पावसाची आवश्यकता आहे़४जिल्ह्यातील सर्व प्रकल्प कोरडेठाक असून, या प्रकल्पात पाणीसाठा जमा होण्यासाठी वाहवणी पाऊस होणे आवश्यक आहे़४सध्या होत असलेला पाऊस अल्प स्वरुपाचा असून, या पावसामुळे जमिनीतील पाणी पातळीतही वाढ होत नसल्याने जिल्हावासियांना मोठ्या दमदार पावसाची प्रतीक्षा लागली आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीRainपाऊसwater scarcityपाणी टंचाई