शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

परभणी : टंचाई निवारणासाठी ३४ लाखांच्या कामांना मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 00:48 IST

पावसाने पाठ फिरविल्यामुळे जिल्ह्यात अनेक गावांमधील पाणीटंचाई कायम आहे़ या गावांमधील पाणीटंचाई निवारणाची कामे करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ३४ लाख ५७ हजार ४४० रुपयांच्या कामांना जून महिन्यात मंजुरी दिली आहे़ ही कामे तातडीने पूर्ण झाली तर ग्रामीण भागातील पाणीटंचाई निकाली निघू शकते़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : पावसाने पाठ फिरविल्यामुळे जिल्ह्यात अनेक गावांमधील पाणीटंचाई कायम आहे़ या गावांमधील पाणीटंचाई निवारणाची कामे करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ३४ लाख ५७ हजार ४४० रुपयांच्या कामांना जून महिन्यात मंजुरी दिली आहे़ ही कामे तातडीने पूर्ण झाली तर ग्रामीण भागातील पाणीटंचाई निकाली निघू शकते़यावर्षी जिल्ह्यामध्ये आॅक्टोबर महिन्यापासून पाणीटंचाईने डोके वर काढल्याने ग्रामीण भाग टंचाईच्या समस्येने होरपळून निघाला होता़ टंचाईग्रस्त भागास पाणीपुरवठा करण्यासाठी यावर्षी प्रथमच जिल्हा प्रशासनाने नऊ महिन्यांचा टंचाई कृती आराखडा तयार केला होता़ जून अखेरपर्यंत प्रशासनाला पाणीटंचाईच्या कामांवर भर द्यावा लागला़ पावसाचे वेळेत आगमन झाले नाही़ त्यामुळे जिल्ह्यातील भूजल पातळीतही फारशी वाढ झाली नसल्याने अनेक गावांत टंचाईचे संकट कायम आह़े़ जिल्हा प्रशासनाने पाणीटंचाईच्या कामांसाठी दोन वेळा मुदत वाढ दिली आहे़ त्यानुसार ३१ जुलैपर्यंत जिल्ह्यामध्ये पाणीटंचाई निवारणाची कामे हाती घेतली जाणार आहेत़ जून महिन्यापासून पावसाळ्याला प्रारंभ होतो़ मात्र संपूर्ण जून महिन्यात सरासरीच्या तुलनेत ६० टक्केच पाऊस झाला़ परिणामी टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी प्रशासनाला उपाययोजना कराव्या लागल्या़जून महिन्यात जिल्हा प्रशासनाने तात्पुरत्या पूरक नळ योजना आणि विशेष नळ योजना दुरुस्तीच्या ९ कामांना मंजुरी दिली आहे़एकूण ३४ लाख ५७ हजार ४४० रुपयांची ही कामे असून, जिल्ह्यात टंचाई जाणवणाऱ्या भागात या कामांच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न केला जात आहे़ परभणी तालुक्यातील भोगाव येथे १ लाख ६८ हजार ६०० रुपये खर्चाच्या नळ योजनेच्या विशेष दुरुस्तीच्या कामाला ११ जून रोजी प्रशासकीय मान्यता देण्यात आली़ तसेच पेडगाव येथील २ लाख ६० हजार रुपये, सिंगणापूर येथील १ लाख ७८ हजार २०० रुपये, इस्माईलपूर येथील १ लाख ७ हजार २००, नांदापूर येथील १ लाख ३१ हजार ४०० रुपयांच्या कामांना जून महिन्यामध्ये प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे़ त्याचप्रमाणे पूर्णा तालुक्यातील आहेरवाडी येथे ६ लाख ३१ हजार ४०० रुपये खर्चाच्या तात्पुरत्या पूरक नळ योजनेच्या कामाला ९ जून रोजी प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे़ याच तालुक्यातील गौर येथे पाणीटंचाई निर्माण झाल्याने १५ लाख ६९ हजार ४४० रुपये खर्चाच्या तात्पुरत्या पूरक नळ योजनेच्या कामाला जिल्हा प्रशासनाने १२ जून रोजी मंजुरी दिली आहे तर मुंबर येथे २ लाख ४८ हजार ८०० रुपये खर्चाच्या कामालाही १५ जून रोजी मंजुरी देण्यात आली आहे़ पूर्णा तालुक्यातील वाईलासिना येथे ३ लाख ८ हजार २०० रुपये खर्चाच्या नळ योजना विशेष दुरुस्तीच्या कामाला १५ जून रोजी प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे़जून महिन्यात शक्यतो पाणीटंचाई शिथील होते़ मात्र यावर्षी पाऊस झाला नसल्याने जून महिन्यातही टंचाई निवारणाची कामे हाती घ्यावी लागली आहेत़ विशेष म्हणजे, जुलै महिना अर्धा सरला तरी पाऊस नसल्याने जिल्हा प्रशासनातील महसूल विभाग अजूनही पाणीटंचाई निवारणाचीच कामे प्राधान्याने करीत आहे़ त्यावरून जिल्ह्यातील पाणी टंचाईचे संकट किती गंभीर आहे, हे दिसून येत आहे़१०० गावांमध्ये टंचाई निवारणाची कामे४जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागातील १०९ गावांमध्ये प्रशासनाने नळ योजनांच्या दुरुस्तीची कामे हाती घेतली आहेत़ या कामांपैकी अनेक कामे पूर्णही झाली आहेत़ त्यामुळे अनेक गावांमधील पाणीटंचाई शिथील झाली असली तरी संपूर्ण उन्हाळ्यात नळ योजना दुरुस्तीच्या कामांमधून प्रशासनाने पाणीटंचाई निवारणाचा प्रयत्न केला आहे़४सेलू तालुक्यातील १३, मानवत तालुक्यातील १२, पालम तालुक्यातील ६, पाथरी तालुक्यातील ६, जिंतूर तालुक्यातील ११, गंगाखेड तालुक्यातील ६, सोनपेठ तालुक्यातील २, परभणी तालुक्यातील १८, पूर्णा तालुक्यातील ६ अशा १०९ गावांमध्ये आतापर्यंत तात्पुरती पूरक नळ पाणीपुरवठा योजना आणि नळ योजनेच्या विशेष दुरुस्तीची कामे जिल्हा प्रशासनाने हाती घेतली आहेत़पावसाची प्रतीक्षा कायम४जिल्ह्यात दोन दिवसांपासून पाऊस होत असला तरी हा पाऊस समाधानकारक नाही़ या पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले आहे़ परंतु, भूजल पातळीत वाढ होण्यासाठी मोठ्या पावसाची आवश्यकता आहे़४जिल्ह्यातील सर्व प्रकल्प कोरडेठाक असून, या प्रकल्पात पाणीसाठा जमा होण्यासाठी वाहवणी पाऊस होणे आवश्यक आहे़४सध्या होत असलेला पाऊस अल्प स्वरुपाचा असून, या पावसामुळे जमिनीतील पाणी पातळीतही वाढ होत नसल्याने जिल्हावासियांना मोठ्या दमदार पावसाची प्रतीक्षा लागली आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीRainपाऊसwater scarcityपाणी टंचाई